शहरं
Join us  
Trending Stories
1
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
2
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
3
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
4
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
5
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
6
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
7
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
8
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
9
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
10
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
11
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
12
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
13
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
14
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
15
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
16
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
17
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
18
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
19
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
20
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    

अवकाळीने गव्हाचे पीक काळवंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असून अनेकांना पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. गत काही दिवसापासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. अवकाळी पावसाने मोहाडी तालुक्यातील करडी पालोरा परिसरात रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सण २०१९-२० या खरीप हंगामात देखील सततच्या पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते.

ठळक मुद्देउत्पादनात मोठी घट : किडीने पोखरले दाणे, शेतकरी पुन्हा संकटात

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : अवकाळी पावसाने रबी हंगामातील गहू पिकाचे नुकसान झाले असून गव्हाचे पीक काळवंडले आहे. गव्हाच्या दान्यांना असणारी चमक कमी झाली असून याचा दरावर विपरीत परिणाम होणार आहे. रबी हंगामातील हरभरा पिकावरील कीडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे रबी हंगामातील पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असून अनेकांना पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. गत काही दिवसापासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. अवकाळी पावसाने मोहाडी तालुक्यातील करडी पालोरा परिसरात रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सण २०१९-२० या खरीप हंगामात देखील सततच्या पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे मोठ्या हिंमतीने शेतकऱ्यांनी रबी हंगामात उसणवार करून पिकांची पेरणी केली. मात्र काढणीला आलेल्या विविध ठिकाणची अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.रबी हंगामातील गहू, हरभरा, लाखोरी, पोपट, करडई, जवस विविध पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य महादेव पचघरे, उपसरपंच महादेव घुसे, माजी सभापती झगडू बुद्धे यांनी केली आहे.भाजीपाला पिकावर कीडीचा प्रादूर्भाव वाढत असल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. करडी परिसरात अनेक शेतकºयांनी वांगे, टमाटर, फुलकोबी, मेथी भाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने कीडींचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याविषयी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. परिसरात विविध शेतकºयांना कृषी विभागाच्या विविध योजनांमधून मदत करण्याची गरज आहे.शेतकऱ्यांना शासनाने विविध योजना जाहीर केल्या असल्या तरी प्रत्येक्षात मात्र या योजनेचा लाभ मिळत नसल्याची ओरड शेतकºयांमधून होत आहे. कृषी विभागातील विविध योजनांना आॅनलाईन करणे गरजेचे असल्याने शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यातच सध्या कोरोना संकटामुळे मार्चअखेरपर्यंत विविध कागदपत्रांची पुर्तता करणे गरजेचे होते. मात्र सरकारी कार्यालये बंद असल्याने अनेक शेतकरी वेळेवर कागदपत्रांची पूर्तता करू शकलेले नाही. यासाठी शासनाने विविध योजनांसाठी मुदत वाढून देणे गरजेची आहे.

टॅग्स :agricultureशेती