शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

अवकाळीने गव्हाचे पीक काळवंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असून अनेकांना पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. गत काही दिवसापासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. अवकाळी पावसाने मोहाडी तालुक्यातील करडी पालोरा परिसरात रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सण २०१९-२० या खरीप हंगामात देखील सततच्या पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते.

ठळक मुद्देउत्पादनात मोठी घट : किडीने पोखरले दाणे, शेतकरी पुन्हा संकटात

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : अवकाळी पावसाने रबी हंगामातील गहू पिकाचे नुकसान झाले असून गव्हाचे पीक काळवंडले आहे. गव्हाच्या दान्यांना असणारी चमक कमी झाली असून याचा दरावर विपरीत परिणाम होणार आहे. रबी हंगामातील हरभरा पिकावरील कीडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे रबी हंगामातील पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असून अनेकांना पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. गत काही दिवसापासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. अवकाळी पावसाने मोहाडी तालुक्यातील करडी पालोरा परिसरात रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सण २०१९-२० या खरीप हंगामात देखील सततच्या पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे मोठ्या हिंमतीने शेतकऱ्यांनी रबी हंगामात उसणवार करून पिकांची पेरणी केली. मात्र काढणीला आलेल्या विविध ठिकाणची अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.रबी हंगामातील गहू, हरभरा, लाखोरी, पोपट, करडई, जवस विविध पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य महादेव पचघरे, उपसरपंच महादेव घुसे, माजी सभापती झगडू बुद्धे यांनी केली आहे.भाजीपाला पिकावर कीडीचा प्रादूर्भाव वाढत असल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. करडी परिसरात अनेक शेतकºयांनी वांगे, टमाटर, फुलकोबी, मेथी भाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने कीडींचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याविषयी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. परिसरात विविध शेतकºयांना कृषी विभागाच्या विविध योजनांमधून मदत करण्याची गरज आहे.शेतकऱ्यांना शासनाने विविध योजना जाहीर केल्या असल्या तरी प्रत्येक्षात मात्र या योजनेचा लाभ मिळत नसल्याची ओरड शेतकºयांमधून होत आहे. कृषी विभागातील विविध योजनांना आॅनलाईन करणे गरजेचे असल्याने शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यातच सध्या कोरोना संकटामुळे मार्चअखेरपर्यंत विविध कागदपत्रांची पुर्तता करणे गरजेचे होते. मात्र सरकारी कार्यालये बंद असल्याने अनेक शेतकरी वेळेवर कागदपत्रांची पूर्तता करू शकलेले नाही. यासाठी शासनाने विविध योजनांसाठी मुदत वाढून देणे गरजेची आहे.

टॅग्स :agricultureशेती