शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने गव्हाचे पीक काळवंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असून अनेकांना पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. गत काही दिवसापासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. अवकाळी पावसाने मोहाडी तालुक्यातील करडी पालोरा परिसरात रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सण २०१९-२० या खरीप हंगामात देखील सततच्या पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते.

ठळक मुद्देउत्पादनात मोठी घट : किडीने पोखरले दाणे, शेतकरी पुन्हा संकटात

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : अवकाळी पावसाने रबी हंगामातील गहू पिकाचे नुकसान झाले असून गव्हाचे पीक काळवंडले आहे. गव्हाच्या दान्यांना असणारी चमक कमी झाली असून याचा दरावर विपरीत परिणाम होणार आहे. रबी हंगामातील हरभरा पिकावरील कीडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे रबी हंगामातील पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असून अनेकांना पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. गत काही दिवसापासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. अवकाळी पावसाने मोहाडी तालुक्यातील करडी पालोरा परिसरात रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सण २०१९-२० या खरीप हंगामात देखील सततच्या पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे मोठ्या हिंमतीने शेतकऱ्यांनी रबी हंगामात उसणवार करून पिकांची पेरणी केली. मात्र काढणीला आलेल्या विविध ठिकाणची अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.रबी हंगामातील गहू, हरभरा, लाखोरी, पोपट, करडई, जवस विविध पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य महादेव पचघरे, उपसरपंच महादेव घुसे, माजी सभापती झगडू बुद्धे यांनी केली आहे.भाजीपाला पिकावर कीडीचा प्रादूर्भाव वाढत असल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. करडी परिसरात अनेक शेतकºयांनी वांगे, टमाटर, फुलकोबी, मेथी भाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने कीडींचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याविषयी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. परिसरात विविध शेतकºयांना कृषी विभागाच्या विविध योजनांमधून मदत करण्याची गरज आहे.शेतकऱ्यांना शासनाने विविध योजना जाहीर केल्या असल्या तरी प्रत्येक्षात मात्र या योजनेचा लाभ मिळत नसल्याची ओरड शेतकºयांमधून होत आहे. कृषी विभागातील विविध योजनांना आॅनलाईन करणे गरजेचे असल्याने शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यातच सध्या कोरोना संकटामुळे मार्चअखेरपर्यंत विविध कागदपत्रांची पुर्तता करणे गरजेचे होते. मात्र सरकारी कार्यालये बंद असल्याने अनेक शेतकरी वेळेवर कागदपत्रांची पूर्तता करू शकलेले नाही. यासाठी शासनाने विविध योजनांसाठी मुदत वाढून देणे गरजेची आहे.

टॅग्स :agricultureशेती