शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

दहावीच्या दाखल्यावर शेरा काय असणार? विद्यार्थी, पालक संभ्रमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:29 IST

भंडारा : कोरोनामुळे उशिरा का होईना इयत्ता दहावीचा निकाल लागला आणि इयत्ता ११ वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी दाखले जमविण्याची जणू ...

भंडारा : कोरोनामुळे उशिरा का होईना इयत्ता दहावीचा निकाल लागला आणि इयत्ता ११ वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी दाखले जमविण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. परंतु या दहावीच्या गुणपत्रिकेवर काय शेरा असणार? दाखल्यावर तारीख आणि महिना कोणता राहील? या संभ्रमात स्वत: मुख्याध्यापकही आहेत. हीच चिंता विद्यार्थी व त्यांच्या पालकांना सतावत आहे.

शिक्षण मंडळाने आतापर्यंत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली नाही. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका काढली, त्यात एप्रिल २०२१ असे नमूद आहे. परंतु दाखल्यावर तो महिना लिहायचा किंवा नाही अशा संभ्रमात मुख्याध्यापक आहेत. यामध्ये ‘शेरा’चा कॉलम सुटलेला आहे. त्यामुळे काय शेरा असणार हे सांगता येत नाही. आता बोर्डाच्या सूचना आल्यावरच संभ्रम दूर होणार आहे. काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या टीसी तयार केल्या आहेत. जगभरात कोरोनाचे संकट कायम असल्याने यातून महाराष्ट्र कसा सुटणार? तरीही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. परंतु ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना झाला नाही. शिक्षण मंडळाने नववीच्या आधारावर दहावीचा निकाल दिला; परंतु या निकालात हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. नवव्या वर्गाला गांभीर्याने न घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे या निकालाने नुकसान झाले. आता निकाल लागल्याने अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ सुरू झाली आहे. शाळा सोडण्याच्या दाखल्यावर तारीख, महिना तसेच शेरा काय लिहायचा, हा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.

पालक म्हणतात-

दहावीचा निकाल लागला; परंतु शाळेकडून गुणपत्रिकाच मिळाल्या नाहीत. त्यामुळे पुढच्या वर्गात प्रवेश कसा घ्यायचा, हा प्रश्न आहे. आता सर्व विद्यार्थी जेव्हा प्रवेश घेतील तेव्हाच आपल्या मुलीलाही शाळेत प्रवेश घेऊ.

- रोशन लांजेवार, पालक

नववीच्या आधारावर दहावीचे गुण देण्यात आले. परंतु नववीला कुणी गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. दहावीचा निकाल लागूनही गुणपत्रिका मिळाल्या नाहीत. कोरोनाच्या संकटाने आमच्या मुलांचे शिक्षण बुडाले. आता अकरावीच्या प्रवेशासाठी कामाला लागणार.

- ललीता रामटेके, पालक

मुख्याध्यापक काय म्हणतात...

विद्यार्थ्यांची टीसी तयार करताना त्या टीसीवर शेरा काय लिहायचा यासाठी आता शासनाच्या सूचनांची वाट पाहावी लागेल. आमच्या शाळेत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी आम्ही त्यांच्या व्यवहार व वागणे यावरून शेरा लिहीत होतो. आता मात्र विद्यार्थ्यांचा शेरा शासनाच्या सूचनेवरून लिहिणार आहोत. अद्यापपर्यंत शासनाच्या आदेशाची वाट पाहत आहोत.

- एक मुख्याध्यापक

दहावीची परीक्षा न देताच विद्यार्थ्यांना पास करण्यात आले. नववीच्या आधारावर दहावीचे गुणदान करण्यात आले. परंतु टीसीवर काय शेरा लिहायचा यासंदर्भात सूचना देण्यात आल्या नाहीत. तसेच टीसीवर तारीख आणि महिना काय नमूद करावा याच्याही सूचना मिळाल्या नाहीत. शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचना मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या टीसीवर शेरा लिहिण्याचा निर्णय होईल.

- एक मुख्याध्यापक

बोर्डाने या शेरासंदर्भात आतापर्यंत मार्गदर्शक सूचना पाठविलेल्या नाहीत. मार्गदर्शक सूचना येताच तशा सूचना संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात येईल. शासन सर्व गोष्टीवर माहिती देत आहे. यावरही माहिती लवकरच देईल अशी आशा आहे.

- संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक जि.प. भंडारा