शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतप ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
5
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
6
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
7
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
8
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
10
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
11
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
12
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
13
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
14
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
15
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
16
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
17
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
18
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
19
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
20
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश

मोबाईल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST

शासनाने जरी शिथिलता दिली असली तरी मात्र सर्वांनीच अजूनही काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात प्रशासनाकडून कडक ...

शासनाने जरी शिथिलता दिली असली तरी मात्र सर्वांनीच अजूनही काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात प्रशासनाकडून कडक निर्बंध लादण्यात आले होते. यावेळी बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. तर भंडारा जिल्ह्यात मृत्यूचा आकडादेखील वाढला होता. त्यानंतर आता मे महिन्यात रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सरकारकडून आधी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत त्यानंतर आता सकाळी सात ते दुपारी दोन वाजतापर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. आज प्रत्येक गोष्टीत मोबाईल ही गरजेची गोष्ट बनली असून कोरोनात अनेकांचा मोबाईल बिघडला आहे. अनेक दिवस बंद असलेली मोबाईलचे दुकाने सुरू झाल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

बॉक्स

सॅनिटायझरचा वापर वाढल्याने मोबाईलमध्ये बिघाड

स्क्रीन गार्ड बदलण्यासाठी दुकानात येणाऱ्या ग्राहकांची संख्या जास्त आहे. यासोबतच अनेक जण नवीन मोबाईल खरेदीसाठी दुकानात येत आहेत. मात्र अनेकांचे म्हणणे असे आहे की मोबाईल स्क्रीन टच खराब झाला असून त्यामुळे मोबाईल स्क्रीन टच काम करत नसल्याच्या तक्रारी आहेत.

बॉक्स

मागील दीड महिन्यापासून मोबाईलची दुकाने होती बंद

कोरोना संसर्गाची राज्यात दुसरी लाट आल्यानंतर राज्य शासनाने कडक संचारबंदी केली होती. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यातील मोबाईल दुकानांसह इतर दुकानेही बंद होती. सुरुवातीला काही तास दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी मिळाली तरी अनेकांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

बॉक्स

नवीन मोबाईल खरेदीत वाढ

मोबाईल हा आज प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येक काम हे आजकाल ऑनलाईन होत असून आता निर्बंध शिथिल केल्याने दुकानांमध्ये जात आहेत.

कोट

मोबाईल दुरुस्त करण्यासाठी आलो होतो. मोबाईल दुरुस्तीविना घरातच पडून होता. आता प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईल लागतोच, पोरांनाही मोबाईल पाहिजे. म्हणून दुरुस्त करण्यासाठी आलो होतो. मात्र घराबाहेर पडताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करत आहे.

दिनेश वासनिक, ग्राहक

कोट

मोबाईलचा स्क्रीन टच खराब झाल्याने मोबाईल काम करत नाही. कोरोना रुग्णांची संख्या आता कमी झाली आहे. त्यामुळे आता मोबाईल दुकाने उघडली असल्याने अनेकांना ग्रामीणमधील अनेकांना दिलासा मिळाला आहे.

गणेश शेंडे, ग्राहक

दीड महिन्यानंतर उघडले शटर

कोट

गरिबांपासून तर श्रीमंतांपर्यंत सर्वांचीच मोबाईल आज गरज बनली आहे. त्यामुळे अनेकजण मोबाईल दुरुस्तीसाठी किंवा नवीन मोबाईल खरेदीसाठी दुकानात येत आहेत. मात्र आल्याबरोबर मी ग्राहकांना हातावर पहिल्यांदा सॅनिटायझर व तोंडावर मास्क लावणे बंधनकारक केले आहे. संचारबंदीत दुकान बंदच होते त्यामुळे आमचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

प्रवीण बावनकर, मोबाईल विक्रेता

कोट

भंडारा जिल्ह्यात कोरोना सर्वाधिक एप्रिल महिन्यात वाढला होता. त्यामुळे दुकान बंदच ठेवले होते. आता नियमात शिथिलता मिळाल्याने दुकान सुरू केले आहे. ग्राहकही मोबाईल दुरुस्तीसाठी येत आहेत. आता दुकाने उघडली आहेत मात्र झालेले नुकसान भरून काढता येणार नाही. कोरोना नियमांचे ग्राहकांकडूनही पालन होत आहे.

संदिप दूधबरई, मोबाईल विक्रेता