शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

मोबाईल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST

शासनाने जरी शिथिलता दिली असली तरी मात्र सर्वांनीच अजूनही काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात प्रशासनाकडून कडक ...

शासनाने जरी शिथिलता दिली असली तरी मात्र सर्वांनीच अजूनही काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात प्रशासनाकडून कडक निर्बंध लादण्यात आले होते. यावेळी बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. तर भंडारा जिल्ह्यात मृत्यूचा आकडादेखील वाढला होता. त्यानंतर आता मे महिन्यात रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सरकारकडून आधी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत त्यानंतर आता सकाळी सात ते दुपारी दोन वाजतापर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. आज प्रत्येक गोष्टीत मोबाईल ही गरजेची गोष्ट बनली असून कोरोनात अनेकांचा मोबाईल बिघडला आहे. अनेक दिवस बंद असलेली मोबाईलचे दुकाने सुरू झाल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

बॉक्स

सॅनिटायझरचा वापर वाढल्याने मोबाईलमध्ये बिघाड

स्क्रीन गार्ड बदलण्यासाठी दुकानात येणाऱ्या ग्राहकांची संख्या जास्त आहे. यासोबतच अनेक जण नवीन मोबाईल खरेदीसाठी दुकानात येत आहेत. मात्र अनेकांचे म्हणणे असे आहे की मोबाईल स्क्रीन टच खराब झाला असून त्यामुळे मोबाईल स्क्रीन टच काम करत नसल्याच्या तक्रारी आहेत.

बॉक्स

मागील दीड महिन्यापासून मोबाईलची दुकाने होती बंद

कोरोना संसर्गाची राज्यात दुसरी लाट आल्यानंतर राज्य शासनाने कडक संचारबंदी केली होती. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यातील मोबाईल दुकानांसह इतर दुकानेही बंद होती. सुरुवातीला काही तास दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी मिळाली तरी अनेकांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

बॉक्स

नवीन मोबाईल खरेदीत वाढ

मोबाईल हा आज प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येक काम हे आजकाल ऑनलाईन होत असून आता निर्बंध शिथिल केल्याने दुकानांमध्ये जात आहेत.

कोट

मोबाईल दुरुस्त करण्यासाठी आलो होतो. मोबाईल दुरुस्तीविना घरातच पडून होता. आता प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईल लागतोच, पोरांनाही मोबाईल पाहिजे. म्हणून दुरुस्त करण्यासाठी आलो होतो. मात्र घराबाहेर पडताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करत आहे.

दिनेश वासनिक, ग्राहक

कोट

मोबाईलचा स्क्रीन टच खराब झाल्याने मोबाईल काम करत नाही. कोरोना रुग्णांची संख्या आता कमी झाली आहे. त्यामुळे आता मोबाईल दुकाने उघडली असल्याने अनेकांना ग्रामीणमधील अनेकांना दिलासा मिळाला आहे.

गणेश शेंडे, ग्राहक

दीड महिन्यानंतर उघडले शटर

कोट

गरिबांपासून तर श्रीमंतांपर्यंत सर्वांचीच मोबाईल आज गरज बनली आहे. त्यामुळे अनेकजण मोबाईल दुरुस्तीसाठी किंवा नवीन मोबाईल खरेदीसाठी दुकानात येत आहेत. मात्र आल्याबरोबर मी ग्राहकांना हातावर पहिल्यांदा सॅनिटायझर व तोंडावर मास्क लावणे बंधनकारक केले आहे. संचारबंदीत दुकान बंदच होते त्यामुळे आमचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

प्रवीण बावनकर, मोबाईल विक्रेता

कोट

भंडारा जिल्ह्यात कोरोना सर्वाधिक एप्रिल महिन्यात वाढला होता. त्यामुळे दुकान बंदच ठेवले होते. आता नियमात शिथिलता मिळाल्याने दुकान सुरू केले आहे. ग्राहकही मोबाईल दुरुस्तीसाठी येत आहेत. आता दुकाने उघडली आहेत मात्र झालेले नुकसान भरून काढता येणार नाही. कोरोना नियमांचे ग्राहकांकडूनही पालन होत आहे.

संदिप दूधबरई, मोबाईल विक्रेता