शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

काय सांगता, लाडक्या बहिणींना विधानसभेचे तिकीटच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 13:28 IST

Bhandara : जिल्ह्यात आतापर्यंत, कुणीही महिला आमदार नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : स्वातंत्र्याला ७७ वर्ष पूर्ण झालीत, मात्र भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत कुणीही महिला आमदार झालेल्या नाहीत. कुठल्याही पक्षाने आमदार होण्याची संधीही दिली नाही. परिणामी लाडक्या बहिणींना यंदा तरी विधानसभेचे तिकीट मिळणार काय? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांनाही समान वाटा आहे, असे बोलले जाते, परंतू राजकीय क्षेत्रात महिलांना हवी तेवढी संधी मिळत नाही. याचे ज्वलंत उदाहरण भंडारा जिल्ह्यातही पहावयास मिळत आहेत. जिल्ह्यातही राजकीय पक्ष मोठ्या जोमाने कार्य करतात. मात्र निवडणुकीच्या काळात याच महिलांचा फक्त व्होट बँक म्हणून वापर करण्यात येतो. अनेक पक्षात जिल्हाध्यक्ष महिला व त्या पाठोपाठ अनेक पदाधिकारी ही सक्रियतेने कार्य करीत असतात. मात्र त्यांच्या कामाची पावती त्यांना दिली जात नसल्याची खंत ही महिला प्रतिनिधींनी व्यक्त केली. त्यांना आपले मत प्रखरपणे मांडताही येत नाही.

राजकारण म्हटले की सर्वांना सोबत घेऊन जायचे असते. त्यामुळेच वरिष्ठ नेत्यांनी जे आदेश बजावले त्याचे पालन करणे, हे पक्ष कार्याचा भाग आहे, असे समजून महिला प्रतिनिधी ही आपले कार्य इमानेइतबारे बजावत आहेत. मात्र खासदार, आमदार, नगराध्यक्ष अशा महत्त्वाच्या ठिकाणी महिलांनाही समान संधी द्यावी, असे प्रांजळ मत व स्पष्ट कबूलही भंडारा जिल्ह्यातील राजकीय महिला प्रतिनिधींनी दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत महिला आमदार नाहीत भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात महिला म्हणून कोणीही आमदार, खासदार (एकदा अपवाद वगळता) किंवा अन्य पदावर विराजमान झालेले नाहीत. सभापती किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने महिलांची वर्णी लागली आहे

यंदा किती महिलांना उमेदवारी मिळणार भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा क्षेत्र आहेत. यात तुमसर, भंडारा व साकोली विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. या तिन्ही विधानसभा क्षेत्रातून महिलांना उमेदवारी मिळणार नसल्याचीच जास्त चिन्हे आहेत. परंतु राजकीय पक्षातील महिलांनी तिकीट मिळण्याबाबत आशा सोडलेली नाही, हेही तितकेच खरे आहे.

पक्षातील महिला जिल्हाध्यक्ष म्हणतात तरी काय?"महिलांना आमदारकी खासदारकी लढण्याचा तेवढाच हक्क आहे. तो हक्क संविधानाने दिला आहे. आमदार, नगराध्यक्ष या पदावरही त्यांनी आपला अनुभव घडवायला हवा. भंडारा जिल्ह्यात निश्चितच तशी संधी आहे, मात्र महिलांना समान संधी मिळत नाही, हीच खरी शोकांतिका आहे."- सरिता मदनकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 

"गतवर्षी केंद्रीय मंत्रिमंडळाने लोकसभा आणि राज्यातील विधानसभा मध्ये ३३ टक्के महिला आरक्षणाचा विधेयकाला मंजुरी दिली. याच्या अंमलबजावणीला वेळ आहे, परंतु महिलांना खऱ्या अर्थाने संधी दिली पाहिजे. महायुतीतून यंदा विधानसभेच्या निवडणुकीत महिलांना संधी देण्याबाबत विचार सुरू आहे. महिलांना संधी मिळायलाच हवी." - कल्याणी भुरे, जिल्हाध्यक्ष, भाजप

"निश्चितच महिलांनाही आमदारकी यासाठी उमेदवारी देऊ केली पाहिजे. पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना दुर्बळ समजणे अयोग्य आहे. ज्याप्रमाणे आ. यशोमती ठाकूर यांनी आपले वर्चस्व व वलय निर्माण केले. याप्रमाणे महिलांनीही राजकीय क्षेत्रात आपले वलय निर्माण केले पाहिजे. जेणेकरून त्यांचे नाव स्वतःहून वर येईल."- जयश्री बोरकर, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस भंडारा.

टॅग्स :Politicsराजकारणbhandara-acभंडारा