शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

जिवंत सातबारा मोहिमेद्वारे शेतकऱ्यांना काय मिळणार लाभ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 13:09 IST

Bhandara : वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करणार ?

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना शेतजमीन, मालमत्ता आपल्या नावावर करताना अनेकवेळा अडचण येते. आता मात्र मृत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीशी संबंधित अधिकार सहज आणि वेगाने मिळावेत, यासाठी राज्य शासनाकडून 'जिवंत सातबारा' मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये मृत खातेदारांची नावे कमी करून त्यांच्या वारसांची नावे सातबारावर त्वरित नोंद करण्यात येणार आहेत.

राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत, ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत, सातबारा उताऱ्यावर मृत खातेदारांच्या वारसांची अधिकृत नोंदणी केली जाणार आहे. 'जिवंत सातबारा' मोहीम महसूल विभागाची पारदर्शकता वाढविणारी ठरणार आहे. यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून त्वरित निर्णय घेता येणार आहे. यामुळे वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. महसूल विभागाकडून स्वतःहून वारसांची नोंद करण्यात येईल. अर्जदाराने अर्ज न करता महसूल यंत्रणा पुढाकार घेणार आहे. मृत व्यक्तींची नावे सातबारावरून कमी करून वारसांची नोंद करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी राहणार नियंत्रण अधिकारीतहसीलदारांची समन्वय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.

वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करणार ?१ ते ५ एप्रिलपर्यंत प्रत्येक गावातील तलाठी मृत खातेदारांची यादी तयार करून मोहिमेद्वारे ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.राज्य शासनाने १९ मार्च २०२५ रोजी यासंदर्भात निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात ही मोहीम १ एप्रिल २०२५ पासून राबविण्याचा आदेश दिला आहे.

काय आहे जिवंत सातबारा मोहीम ?अनेक वेळा मृत खातेदारांच्या नावावरच जमिनी राहतात. त्यामुळे त्यांच्या वारसांना मालकी हक्क मिळविण्यासाठी न्यायालयात जावे लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चीक आहे. या मोहिमेमुळे हा त्रास वाचणार आहे.

तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना महसूलने दिल्या सूचनाया मोहिमेबाबत तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे. त्यानंतर ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

"महसूल विभागातर्फे राज्यभर जिवंत सातबारा मोहीम सुरू केली जाणार आहे. या संदर्भात वरिष्ठ पातळीवरून सूचना आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा."- प्राजक्ता बुरांडे, तहसीलदार, मोहाडी.

टॅग्स :bhandara-acभंडाराgovernment schemeसरकारी योजना