शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

विहिरी आटल्या, हातपंप बंद

By admin | Updated: April 29, 2016 00:35 IST

एकेकाळी २० फुटावर चौरास भागात पाणी लागत होते. आता तब्बल ४०० फूट खोलीवरही पाणी नाही.

पाणी पुरवठा योजना ठप्प : चौरास भागातील विहिरीने गाठला तळलाखांदूर : एकेकाळी २० फुटावर चौरास भागात पाणी लागत होते. आता तब्बल ४०० फूट खोलीवरही पाणी नाही. तालुक्यात पाण्यासाठी ओरड सुरु आहे. बोरींग बंद पडल्या, पाणीपुरवठा योजना धाकधुकीवर सुरू असुन मे महिन्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. यंदाच्या खरीप हंगामात झालेला अत्यल्प पाऊस व दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने वैनगंगा नदी पात्रात पाच टक्के जलसाठा शिल्लक आहे. चुलबंद नदीपात्र कोरडे पडले आहे. नदीमधील वाहते पाणी थांबले तर पाण्याची पातळी खोलवर जायला वेळ लागणार नाही. दरवर्षी उन्हाळी धान पीक राहत असल्याने इटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे पाणी टंचाई भासत नव्हती. मात्र यंदा चित्र बदलले आहे. पीक नसल्याने धरणाचे पाणी सोडले नाही. त्यामुळे पाण्याची पातळी खोल गेली.चौरास भागात कृषी पंपाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नदी पात्र आटल्याने पाण्याची पातळी खोलवर गेली ४०० फूट खोलीवरही पाण्याचा पत्ता नसल्यामुळे कृषीपंप बंद पडले. उन्हाळी धानपीक करपु लागले. ग्रामीण पाणीपुरवठा योजना धाकधुकीवर असून अनेक गावातील नळयोजना बंद पडल्या आहेत. हातपंप तर १५ दिवसापूर्वीच बंद पडल्या. दरवर्षी तालुक्यात शेतावर व नदीपात्रात टरबुजाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात होती. मात्र पाणी टंचाई लक्षात घेता टरबुज शेती थांबविण्यात आली.पाणी टंचाई लक्षात घेता शासकीय बांधकामे तसेच खाजगी बांधकामे अडचणीत आले आहे. खासदार नाना पटोले व आमदार बाळा काशिवार यांनी इटियाडोह पाटबंधारे अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडले. त्यामुळे काही प्रमाणात पाण्याची पातळी वाढली. परंतु मे महिण्यापर्यंत उन्हाळा तीव्र होत असल्याने भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. (तालुका प्रतिनिधी )