शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
3
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
4
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
5
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
6
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
7
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
8
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
9
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
10
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
11
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
12
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
13
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
14
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
15
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
16
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
17
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
18
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
19
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
20
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?

विहिरी आटल्या, हातपंप बंद

By admin | Updated: April 29, 2016 00:35 IST

एकेकाळी २० फुटावर चौरास भागात पाणी लागत होते. आता तब्बल ४०० फूट खोलीवरही पाणी नाही.

पाणी पुरवठा योजना ठप्प : चौरास भागातील विहिरीने गाठला तळलाखांदूर : एकेकाळी २० फुटावर चौरास भागात पाणी लागत होते. आता तब्बल ४०० फूट खोलीवरही पाणी नाही. तालुक्यात पाण्यासाठी ओरड सुरु आहे. बोरींग बंद पडल्या, पाणीपुरवठा योजना धाकधुकीवर सुरू असुन मे महिन्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. यंदाच्या खरीप हंगामात झालेला अत्यल्प पाऊस व दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने वैनगंगा नदी पात्रात पाच टक्के जलसाठा शिल्लक आहे. चुलबंद नदीपात्र कोरडे पडले आहे. नदीमधील वाहते पाणी थांबले तर पाण्याची पातळी खोलवर जायला वेळ लागणार नाही. दरवर्षी उन्हाळी धान पीक राहत असल्याने इटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे पाणी टंचाई भासत नव्हती. मात्र यंदा चित्र बदलले आहे. पीक नसल्याने धरणाचे पाणी सोडले नाही. त्यामुळे पाण्याची पातळी खोल गेली.चौरास भागात कृषी पंपाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नदी पात्र आटल्याने पाण्याची पातळी खोलवर गेली ४०० फूट खोलीवरही पाण्याचा पत्ता नसल्यामुळे कृषीपंप बंद पडले. उन्हाळी धानपीक करपु लागले. ग्रामीण पाणीपुरवठा योजना धाकधुकीवर असून अनेक गावातील नळयोजना बंद पडल्या आहेत. हातपंप तर १५ दिवसापूर्वीच बंद पडल्या. दरवर्षी तालुक्यात शेतावर व नदीपात्रात टरबुजाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात होती. मात्र पाणी टंचाई लक्षात घेता टरबुज शेती थांबविण्यात आली.पाणी टंचाई लक्षात घेता शासकीय बांधकामे तसेच खाजगी बांधकामे अडचणीत आले आहे. खासदार नाना पटोले व आमदार बाळा काशिवार यांनी इटियाडोह पाटबंधारे अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडले. त्यामुळे काही प्रमाणात पाण्याची पातळी वाढली. परंतु मे महिण्यापर्यंत उन्हाळा तीव्र होत असल्याने भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. (तालुका प्रतिनिधी )