शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

यावर्षी नोव्हेंबरनंतर धूमधडाक्यात उडणार लग्नाचे बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 18:12 IST

दरवर्षी तुळशी विवाहानंतर लग्न सोहळे उरकले जातात. त्यामुळे आतापासूनच मुले-मुली पाहण्याच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर ते जूनपर्यंत अनेक लग्नतिथी आहेत. यावर्षी अनेक चांगल्या कामांसाठी मुहूर्त अधिक असल्याचेही ज्योतिषांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देमुलगा-मुली पाहणीची लगबग

भंडारा : सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी असल्याने जिल्ह्यात लग्न जमविण्याची लगबग सुरू आहे. यावर्षी नोव्हेंबरनंतर म्हणजेच तुळशी विवाह झाल्यानंतर धूमधडाक्यात लग्नाचे बार उडणार असल्याचे दिसत आहे.

अनेक ज्योतिष पंचांगकर्ते यांच्या म्हणण्यानुसार सर्वाधिक लग्नतिथी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मे, जून महिन्यात आहेत. मे महिन्यात सर्वाधिक तिथी आहेत. आता कोरोना परतीच्या मार्गाला लागला असला तरीही कोरोनाची भीती सतावत आहे. त्यामुळे पुन्हा लॅाकडाऊन होते की काय या भीतीने आता अनेक जण लग्न उरकण्याच्या घाईगडबडीत दिसत आहेत. शक्यतो दरवर्षी तुळशी विवाहानंतर लग्न सोहळे उरकले जातात. त्यामुळे आतापासूनच मुले-मुली पाहण्याच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर ते जूनपर्यंत अनेक लग्नतिथी आहेत. यावर्षी अनेक चांगल्या कामांसाठी मुहूर्त अधिक असल्याचेही ज्योतिषांनी सांगितले आहे.

मार्चमध्ये सर्वाधिक कमी मुहूर्त..

नोव्हेंबरनंतर लग्न सोहळ्याला सुरुवात होत असली तरीही आजही अनेक जण मुहूर्त, तिथी पाहूनच विवाह करतात. मात्र यावर्षी मार्चमध्ये चारच तारखा आहेत तर सर्वाधिक तारखा या डिसेंबर, मे महिन्यात आहेत.

मंगल कार्यालय बुक केले काय?

कोरोनामुळे लग्न सोहळ्यात उपस्थितीसाठी मर्यादा असल्या तरीही सद्य:स्थितीत शंभर लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळ्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मोठे मंगल कार्यालयात बुकिंग करणे सुरू आहे.

यंदाचे वर्ष निरोगी आणि लग्नतिथीचे

लग्नतिथीसह निरोगी आयुष्यासाठी हे वर्ष चांगले आहे. नोव्हेंबरपासून लग्न तिथी सुरू होत आहेत. शिवाय यावर्षी शेतकऱ्यांसाठी हे वर्ष चांगले आहे.

कोणत्या महिन्यात किती मुहूर्त

नोव्हेंबर २०, २१, २९, ३०

१, ६, ८, ११, १३, १४, १५, १६, १८

टॅग्स :Socialसामाजिक