शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: वैष्णवी हगवणे यांच्या फरार सासऱ्याला अटक; दीरही पोलिसांच्या जाळ्यात, पहाटे कारवाई
2
ऑपरेशन सिंदूर: ज्या डमी विमानांना पाकिस्तान भुलला, ते विमान कोणते? एअर डिफेंस सिस्टीम राफेल समजून बसली...
3
एक-दोन नव्हे, तब्बल ६०० पाकिस्तानी नंबर्सशी संपर्कात मोहम्मद तुफैल! काय माहिती पुरवत होता?
4
India Pakistan War : 'तुम्ही आमचे पाणी थांबवा, आम्ही तुमचा श्वास बंद करणार'; पाकिस्तानी सैन्याने हाफिज सईदची भाषा बोलायला सुरूवात केली
5
Video: आलिया भट 'कान्स'मध्ये पदार्पण करणार; एअरपोर्ट लूकमध्येच दिसली इतकी स्टायलिश
6
बांगलादेशी सैन्याने डोळे वटारले; मोहम्मद युनूस यांच्या गोटात पळापळ, राजीनामा देण्यास तयार
7
हार्वर्ड विद्यापीठात दुसऱ्या देशांतील विद्यार्थ्यांना नो एन्ट्री! ट्रम्प प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
8
अभिनेत्री निकिता दत्ताला कोरोनाची लागण, आईचीही टेस्ट पॉझिटिव्ह; म्हणाली, "आशा आहे की..."
9
कान्समध्ये ऐश्वर्याच्या नवीन लूकची चर्चा! गाउनवर लिहिला भगवद्गीतेचा खास श्लोक, पुन्हा एकदा दाखवली भारतीय संस्कृती
10
Vaishnavi Hagawane Death Case : फरार काळात मटणावर ताव, हगवणे पिता -पुत्राचा फरार काळातील सीसीटीव्ही आला समोर
11
पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली होते टार्गेटवर, ISI एजंट अन्सारुल मियाँने चौकशीदरम्यान केले उघड
12
आजचे राशीभविष्य २३ मे २०२५ : अचानक धनलाभ संभवतो, कसा असेल आजचा दिवस...
13
नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM
14
जपान, अरब अमिरातीचा भारताला भक्कम पाठिंबा; भारतीय शिष्टमंडळांनी मांडली प्रभावी भूमिका
15
पाक म्हणे, १९७१च्या युद्धातील पराभवाचा आम्ही बदला घेतला; शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती
16
वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय
17
ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल
18
धुळ्याच्या नोटघबाडाची SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, कारवाई करणार
19
७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा!
20
३,७०० कामगारांची नोकरी वाचली; उद्धव ठाकरेंकडून समधान व्यक्त, कामगार सेनेचे नेते मातोश्रीवर

पोषण आहार बंद होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 21:42 IST

शालेय पोषण आहाराचा धान्यादी पुरवठा शाळांना न झाल्याने काही शाळात विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देधान्याचा साठा संपला : पुरवठा कंत्राटदाराची करारनाम्याची मुदत संपली

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शालेय पोषण आहाराचा धान्यादी पुरवठा शाळांना न झाल्याने काही शाळात विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची माहिती पुढे आली आहे. हा प्रकार तुमसर तालुक्यासह भंडारा जिल्ह्यात सुरू आहे. आहार पुरवठा कंत्राटदार व शासनात करारनामा झाला नाही. त्यामुळे पुरवठादाराने धान्यादी साहित्य पुरवठा केला नाही. जिल्हा परिषद प्रशासनाने बुधवारी तसा ठराव घेऊन पुरवठा कंत्राटदारास तसे निदेश दिले. परंतु पुरवठा कंत्राटदाराने पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविल्याची माहिती आहे.पुरवठा कंत्राटदार व शासनाचा करारनामा १४ जूनपर्यंत मुदत होती. शालेय पोषण आहारात तांदुळ व धान्यादी मालांचा समावेश आहे. १ आॅगस्ट रोजी कार्यशाळा घेऊन शाळेतील मुख्याध्यापकांना तशी माहिती देण्यात आली होती. पुरवठा कंत्राटदार शाळांना तांदूळ व धान्यादी साहित्यांचा पुरवठा करतात. धान्यादी मालात वाटाणा, मटकी यांचा समावेश होतो. आॅगस्ट व सप्टेंबर मध्ये तांदळाचा पुरवठा करण्यात आला होता.दिवाळीपूर्वी शाळात तांदुळ शिल्लक होते. सध्या अनेक शाळेत तांदळाचा व धान्यादी साहित्याचा साठा संपल्याची माहिती आहे. येथे शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना पोषण आहाराकरिता स्वत:जवळील रुपये खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत. काही शाळेत पोषण आहार देणे सुरु आहे तर अनेक शाळांत सध्या शालेय पोषण आहार बंद असल्याची माहिती आहे.१३ जुलै २०१७ ला शाळांनी धान्यादी साहित्य खरेदी करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. यात ग्रामीण शाळांचा समावेश आहे. शहरी शाळेत शाळांना निधी देण्यात येतो. १ आॅगस्टपासून तशा सूचना पोषण आहार विभागाने शाळांना दिल्या होत्या.शालेय पोषण पुरवठा कंत्राटदाराला मागील सहा महिन्यापासून बिल मिळाले नाही तथा नवीन करारनामा शासनाने केला नाही. शाळा सुरु होऊन एक आठवडा लोटला आहे.मुख्याध्यापकांना सूचना दिल्या असल्या तरी पोषण आहार सध्या शिजत नसल्याची माहिती आहे. बुधवारी भंडारा जिल्हा परिषद प्रशासनाने शालेय पोषण आहार पुरवठादाराला एक ठराव घेऊन शाळांना तांदुळ व धान्यादी मालाचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले, परंतु पुरवठादाराने त्यास नकार दिल्याची माहिती आहे. शासन जोपर्यंत करारनामा करणार नाही तोपर्यंत साहित्याचा पुरवठा कसा करायचा असा निर्णय त्यांनी घेतल्याचे समजते.शिक्षण हक्क कायद्यात शालेय पोषण आहार हा नियमित वाटप करण्याचा दंडक आहे. तो न दिल्यास कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. नियोजनाचा अभावानेच येथे विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहाराला फटका बसत आहे.ज्या शाळेत तांदळाचा साठा संपला आहे. त्या शाळांना वाटाणा, उसळ, पोषण आहार वाटप करणे अनिवार्य आहे. साहित्य संपले असेल तर शाळांनी तशी तरतूद करावी, त्यांना शासन पैसे देणार आहे. यापूर्वी कार्यशाळा घेऊन मुख्याध्यापकांना तशा सूचना दिलेल्या होत्या. करारनाम्याचा विषय शासनस्तरावरचा आहे.-जयप्रकाश जिभकाटे, अधीक्षक, शालेय पोषण आहार विभाग, तुमसर.