शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार बंद होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 21:42 IST

शालेय पोषण आहाराचा धान्यादी पुरवठा शाळांना न झाल्याने काही शाळात विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देधान्याचा साठा संपला : पुरवठा कंत्राटदाराची करारनाम्याची मुदत संपली

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शालेय पोषण आहाराचा धान्यादी पुरवठा शाळांना न झाल्याने काही शाळात विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची माहिती पुढे आली आहे. हा प्रकार तुमसर तालुक्यासह भंडारा जिल्ह्यात सुरू आहे. आहार पुरवठा कंत्राटदार व शासनात करारनामा झाला नाही. त्यामुळे पुरवठादाराने धान्यादी साहित्य पुरवठा केला नाही. जिल्हा परिषद प्रशासनाने बुधवारी तसा ठराव घेऊन पुरवठा कंत्राटदारास तसे निदेश दिले. परंतु पुरवठा कंत्राटदाराने पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविल्याची माहिती आहे.पुरवठा कंत्राटदार व शासनाचा करारनामा १४ जूनपर्यंत मुदत होती. शालेय पोषण आहारात तांदुळ व धान्यादी मालांचा समावेश आहे. १ आॅगस्ट रोजी कार्यशाळा घेऊन शाळेतील मुख्याध्यापकांना तशी माहिती देण्यात आली होती. पुरवठा कंत्राटदार शाळांना तांदूळ व धान्यादी साहित्यांचा पुरवठा करतात. धान्यादी मालात वाटाणा, मटकी यांचा समावेश होतो. आॅगस्ट व सप्टेंबर मध्ये तांदळाचा पुरवठा करण्यात आला होता.दिवाळीपूर्वी शाळात तांदुळ शिल्लक होते. सध्या अनेक शाळेत तांदळाचा व धान्यादी साहित्याचा साठा संपल्याची माहिती आहे. येथे शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना पोषण आहाराकरिता स्वत:जवळील रुपये खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत. काही शाळेत पोषण आहार देणे सुरु आहे तर अनेक शाळांत सध्या शालेय पोषण आहार बंद असल्याची माहिती आहे.१३ जुलै २०१७ ला शाळांनी धान्यादी साहित्य खरेदी करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. यात ग्रामीण शाळांचा समावेश आहे. शहरी शाळेत शाळांना निधी देण्यात येतो. १ आॅगस्टपासून तशा सूचना पोषण आहार विभागाने शाळांना दिल्या होत्या.शालेय पोषण पुरवठा कंत्राटदाराला मागील सहा महिन्यापासून बिल मिळाले नाही तथा नवीन करारनामा शासनाने केला नाही. शाळा सुरु होऊन एक आठवडा लोटला आहे.मुख्याध्यापकांना सूचना दिल्या असल्या तरी पोषण आहार सध्या शिजत नसल्याची माहिती आहे. बुधवारी भंडारा जिल्हा परिषद प्रशासनाने शालेय पोषण आहार पुरवठादाराला एक ठराव घेऊन शाळांना तांदुळ व धान्यादी मालाचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले, परंतु पुरवठादाराने त्यास नकार दिल्याची माहिती आहे. शासन जोपर्यंत करारनामा करणार नाही तोपर्यंत साहित्याचा पुरवठा कसा करायचा असा निर्णय त्यांनी घेतल्याचे समजते.शिक्षण हक्क कायद्यात शालेय पोषण आहार हा नियमित वाटप करण्याचा दंडक आहे. तो न दिल्यास कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. नियोजनाचा अभावानेच येथे विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहाराला फटका बसत आहे.ज्या शाळेत तांदळाचा साठा संपला आहे. त्या शाळांना वाटाणा, उसळ, पोषण आहार वाटप करणे अनिवार्य आहे. साहित्य संपले असेल तर शाळांनी तशी तरतूद करावी, त्यांना शासन पैसे देणार आहे. यापूर्वी कार्यशाळा घेऊन मुख्याध्यापकांना तशा सूचना दिलेल्या होत्या. करारनाम्याचा विषय शासनस्तरावरचा आहे.-जयप्रकाश जिभकाटे, अधीक्षक, शालेय पोषण आहार विभाग, तुमसर.