शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

भात पिकांची नर्सरी नष्ट होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: July 24, 2015 00:42 IST

पवनी तालुक्यात चार नक्षत्राचा अपुरा पाऊस पडल्यामुळे रोवणीसाठी टाकण्यात आलेले भात पिकाची रोपे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहेत.

पावसाची दडी : शेतकरी चिंतातूर, धरण नावपुरतेच आसगाव/चौ. : पवनी तालुक्यात चार नक्षत्राचा अपुरा पाऊस पडल्यामुळे रोवणीसाठी टाकण्यात आलेले भात पिकाची रोपे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहेत.पावसाचा अंदाज घेवून यावर्षी शेतकऱ्यानी शेतात हलक्या प्रजातीची धान रोपे रोवणीसाठी शेतात घातली होती. यावर्षी शेतात साठवण्याजोकता एकाही नक्षत्राचा पाऊस पडला नाही. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात तालुक्यात मोठा पाऊस झाला नाही तर अनेक शेतकऱ्याची कोरडवाहू शेतीतील रोवणी होणार नाही. हलक्या प्रजातीच्या बियान्याची भात पिकाची मुदत १२० ते १४० दिवसाची असते. या पिकांची रोवण्याची मदत ३० ते ४० दिवस असते. परंतु ६० दिवसाचा कालावधी होवूनही शेतात पाणी साचला नसल्यामुळे शेतकऱ्यांना या रोपाची लागवड करता आली नाही. परिणामी ही भात रोपे पिवळी पडली असून नष्ट झाल्यासारखी दिसत आहेत. जरी पाऊस मोठा झाला व रोवणी झाली तरी यांचा उत्पन्नावर मात्र मोठा फरक पडत असतो. त्यामुळे उशिरा रोवणी झाली तर उत्पन्न मात्र अर्ध्यावर येते अशावेळी शेतकरी शेतात, रोवणी करण्याची हिंमत करीत नाही. कारण खर्च रूपया आमदानी आठ आणे अशी परिस्थिती शेतकऱ्याची आहे. यावर्षी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे फक्त ज्याचे कृषी पंप सुरू झाले आहेत. त्याचीच २५ टक्के पर्यंत रोवणी झाली आहे. त्यांनाही विजेच्या भारनियमनामुळे रोवणी पाणी पूर्ण वेळ देता यत नाही, अशी परिस्थिती आहे.इंदिरा सागर धरण ठरले पांढरा हत्तीपवनी तालुक्यात इंदिरा सागर धरण बांधून झाले याला २५ वर्षांचा इतिहास आहे. परंतु उजवा कालवा व डावा कालवा यांचे काम संपूर्ण असल्यामुळे व कालव्याचे पाणी शेतात सोडण्यासाठी छोटे कालवे पूर्ण न केल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी पुरवठा करता येत नाही. परिणामी धरणात पाणीसाठा असूनही सिंचन होवू शकत नाही. काही प्रमाणात उजव्या व डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे. परंतु जिथे ज्याला मिळेल तोच या पाण्याचा उपयोग करीत आहे. त्यामुळे छोटे कालवे बनविणे गरजेचे आहे.(वार्ताहर)