शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

तुमसर तालुक्यात किडीने धान पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 05:00 IST

तुमसर तालुका हा धानाचे कोठार म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. परंतु सध्या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. परतीच्या पावसाने हलक्या व मध्यम धान पिकाला पावसाने झोडपले. त्यामुळे शेतात पाणी साचले आहे. सध्या येथील धान पिकावर गाद, मावा, तूड तुडा या किडीने धान पिकावर आक्रमण केले आहे. परिणामी धान पिकला मोठा धोका निर्माण झाला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : परतीच्या पावसाने हलक्या व मध्यम पिकांचे मोठे नुकसान केले असून धानावर मावा, तुड तुडा करपा, गाद इत्यादी किडीने धान पीक फस्त करणे सुरू आहे. शेतकऱ्यांना एकरी दोन ते तीन हजाराचे औषध फवारणी करावी लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा व आर्थिक मदतीची मागणी पं. स. सदस्य हिरालाल नागपुरे यांनी मुख्यमंत्री व कृषी मंत्र्याकडे केली आहे.तुमसर तालुका हा धानाचे कोठार म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. परंतु सध्या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. परतीच्या पावसाने हलक्या व मध्यम धान पिकाला पावसाने झोडपले. त्यामुळे शेतात पाणी साचले आहे. सध्या येथील धान पिकावर गाद, मावा, तूड तुडा या किडीने धान पिकावर आक्रमण केले आहे. परिणामी धान पिकला मोठा धोका निर्माण झाला आहे. धान पिवळसर झाली असून किडीच्या आक्रमणामुळे संपूर्ण धान उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. येथील शेतकरी धान पीक बसावा याकरिता एक री  दोन ते तीन हजार रुपये औषध फवारणी वर खर्च करीत आहे. त्यानंतरही धान पीक वाचेल काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.कृषी विभागाचे कर्मचारी व अधिकारी सध्या बांधावर भेट देत आहेत. या परिसरात कृषी सहाय्यक एच.एन. पडारे, मंडळ कृषी अधिकारी ए.एस.बागडे यांनी शेतातील धाणाची पाहणी केली. सुरुवातीला तुमसर तालुक्यात पावसाने दगा दिला होता. त्यानंतर परतीच्या पावसाने झोडपून काढले. सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे धान पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. किडीचे प्रमाण कमी होत नाही या विवंचनेने मध्ये येथील शेतकरी आहे. हाती आलेले पीक जाईल काय अशी चिंता त्यांना सतावत आहे. काही परिसरामध्ये किडीने धान उद्ध्वस्त केले असल्यामुळे त्या धानाचा सध्या तनस झाला आहे. कृषी व महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य माजी सभापती कलाम शेख, बाजार समिती संचालक बालकदास ठवकर, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल वराडे, माजी सरपंच विजय चौधरी, सरपंच गडी राम बांडेबुचे यांनी मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांकडे केली आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती