शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

आंब्याची झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: May 27, 2015 00:37 IST

वाढत्या शहरीकरणासोबत ग्रामीण भागातील आम्रवृक्षाची कटाई मोठ्या प्रमाणावर होत आहे.

अधिकाऱ्यांचे अभय : पर्यावरणाचे संतुलन बिघडलेमोहाडी : वाढत्या शहरीकरणासोबत ग्रामीण भागातील आम्रवृक्षाची कटाई मोठ्या प्रमाणावर होत आहे. यातून गावागावातील अमराई नष्ट होत आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर होऊ लागला आहे. त्यामुळे आम्रवृक्ष तोडीवर त्वरित प्रतिबंध घालावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.उन्हाळ्यात आंब्याना महत्व आहे. ऊन लागले असेल, शरीरात उष्णता वाढली असेल तर आंबा अतिशय गुणकारी ठरतो. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. आंब्याचा रस व गव्हाच्या शेवया या तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा पसंतीचा आहार असतो. ग्रामीण भागात आंब्याचा रसासोबत शेवया खाण्याची पध्दत आहे. आंब्याचे लोणचे तार आलेल्या रुग्णाच्या तोंडाला चव येण्यासाठी देतात. एकूणच आंबा दैनंदिन आयुष्यात महत्वाचा घटक आहे. आंब्याचे झाड इतर झाडांपेक्षा उंच व विस्ताराने मोठे असते. उन्हात प्रवास करणाऱ्या वाटसरुंना उन्हाचे चटके कमी करण्यासाठी आंब्याच्या सावलीचा मोठा उपयोग होतो. आंब्याचे झाड उंच असल्याने पावसाळ्यात भिजण्यापासून वाचविण्यासाठी याचा फायदा होतो. हवेने, वादळाने हे झाड पडले तर त्याच्या लाकडाचा सरपणासाठी वापर केला जातो. सद्यस्थितीत काही दलालही आंब्याची झाडे घेत ओहत. शेतकऱ्यांना जादा पैशाचे आमिष दाखवून आंब्याचे वृक्ष मुळापासून तोडून नष्ट करीत आहे. शासन गाव तिथे रस्ता, रस्ता तिथे झाडे लावण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करीत आहे व निसर्गाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु महसूल विभागच दलालांना आंब्याचे झाडे तोडण्यासाठी परवानगी देत आहे.पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्वाचा असलेला फळाचा राजा आंब्याची होत असलेले कत्तल थांबवून तोंडणाऱ्यावर व तोडण्याची परवानगी देणाऱ्या विभागावर कारवाई का होऊ नये असा जनतेचा सवाल आहे. (तालुका प्रतिनिधी)