शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
3
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
4
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
5
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
6
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
7
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
8
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
9
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
10
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
11
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
12
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
13
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
14
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
15
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
16
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
17
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
18
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
19
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
20
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?

आंब्याची झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: May 27, 2015 00:37 IST

वाढत्या शहरीकरणासोबत ग्रामीण भागातील आम्रवृक्षाची कटाई मोठ्या प्रमाणावर होत आहे.

अधिकाऱ्यांचे अभय : पर्यावरणाचे संतुलन बिघडलेमोहाडी : वाढत्या शहरीकरणासोबत ग्रामीण भागातील आम्रवृक्षाची कटाई मोठ्या प्रमाणावर होत आहे. यातून गावागावातील अमराई नष्ट होत आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर होऊ लागला आहे. त्यामुळे आम्रवृक्ष तोडीवर त्वरित प्रतिबंध घालावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.उन्हाळ्यात आंब्याना महत्व आहे. ऊन लागले असेल, शरीरात उष्णता वाढली असेल तर आंबा अतिशय गुणकारी ठरतो. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. आंब्याचा रस व गव्हाच्या शेवया या तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा पसंतीचा आहार असतो. ग्रामीण भागात आंब्याचा रसासोबत शेवया खाण्याची पध्दत आहे. आंब्याचे लोणचे तार आलेल्या रुग्णाच्या तोंडाला चव येण्यासाठी देतात. एकूणच आंबा दैनंदिन आयुष्यात महत्वाचा घटक आहे. आंब्याचे झाड इतर झाडांपेक्षा उंच व विस्ताराने मोठे असते. उन्हात प्रवास करणाऱ्या वाटसरुंना उन्हाचे चटके कमी करण्यासाठी आंब्याच्या सावलीचा मोठा उपयोग होतो. आंब्याचे झाड उंच असल्याने पावसाळ्यात भिजण्यापासून वाचविण्यासाठी याचा फायदा होतो. हवेने, वादळाने हे झाड पडले तर त्याच्या लाकडाचा सरपणासाठी वापर केला जातो. सद्यस्थितीत काही दलालही आंब्याची झाडे घेत ओहत. शेतकऱ्यांना जादा पैशाचे आमिष दाखवून आंब्याचे वृक्ष मुळापासून तोडून नष्ट करीत आहे. शासन गाव तिथे रस्ता, रस्ता तिथे झाडे लावण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करीत आहे व निसर्गाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु महसूल विभागच दलालांना आंब्याचे झाडे तोडण्यासाठी परवानगी देत आहे.पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्वाचा असलेला फळाचा राजा आंब्याची होत असलेले कत्तल थांबवून तोंडणाऱ्यावर व तोडण्याची परवानगी देणाऱ्या विभागावर कारवाई का होऊ नये असा जनतेचा सवाल आहे. (तालुका प्रतिनिधी)