शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीने जंगल ओसाड होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:54 IST

नैसर्गिक संपदेने नटलेले पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगलाचे अस्तीत्व आहे. कधी काळी घनदाट असलेल्या जंगलातून जाताना भिती वाटायची परंतु अलीकडे वृक्षतोड आणि विविध कारणाने जंगल ओसाड असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपर्यावरण प्रेमींचेही दुर्लक्ष : योजनाबद्ध पद्धतीने तस्करांचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कपालोरा : नैसर्गिक संपदेने नटलेले पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगलाचे अस्तीत्व आहे. कधी काळी घनदाट असलेल्या जंगलातून जाताना भिती वाटायची परंतु अलीकडे वृक्षतोड आणि विविध कारणाने जंगल ओसाड असल्याचे चित्र आहे. अशिच परिस्थिती राहिल्यास भविष्यात पवनी तालुक्यातील जंगलाचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही.पवनी तालुक्यात वाही, सिंगोरी, भुयार, पाहूणगाव, खापरी, कोरंभी अशा भागात घनदाट जंगल होती. सध्याच्या स्थितीमध्ये ही जंगले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पवन राजाच्या पहाडीच्या किल्ल्यावरुन बघीतले तर चोहीकडे हिरवेगाव जंगल पाहायला मिळत होते. वाढती लोकसंख्या वाढते शहर, वाढते औद्योगिक कारखाने यामुळे जंगल नामशेष होत आहेत. यामुळे या भागात पाणी अल्पप्रमाणात पडते व उष्णता ताप वाढत आहे. जंगलाचे रक्षकच भक्षक बनले आहेत. जंगलाचे रक्षण करणारे अधिकारी व कर्मचारी याकडे कानाडोळा करीत आहेत. दिवसाढवळ्या काही कंत्राटदार जंगलाच्या मध्यभागी जावून मशीनद्वारे सागवन जातीचे वृक्षतोड करीत आहेत. हे चित्र गावकऱ्यांना दिसते मात्र वनविभागातील कर्मचाºयांना का दिसत नाही. असा प्रश्न पडत आहे. संगनमताने हा सर्व प्रकार सुरु असल्याचे काही ग्रामस्थ सांगत आहे.स्थानिकांना हाताशी धरुन तस्कर जंगलात शिरत आहेत. सागवन व आडजात वृक्षाची खुलेआम कततल करीत आहेत. या वृक्षतोडीमुळे पवनी तालुक्यातील पर्जन्यमानात घट होत आहे. हिच परिस्थिती कायम राहिल्यास निसर्गाचा हा अनमोल ठेवा नष्ठ होण्याची भिती आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये पवनी तालुकयात उष्णतेचा लाटेमुळे होरपळून निघत आहे. दरवर्षी पवनीच्या तापमानात वाढ होत आहे. याला जिम्मेदार वनराई कमी होत असल्याचे परिणाम आहेत. तालुक्यात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. वन वृक्षाचे लागवड करणे हे महत्वाचे आहे. त्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. या करिता कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च केला जात आहे. मात्र हे सर्व कागदावरच पाहायला मिळत आहेत.वृक्षाची जतन करण्यासाठी शासनाने काही नियम केले आहेत. ईतकेच नव्हे तर या नियमाची अंमलबजावणी योग्य तºहेने व्हावे म्हणून वनविभागाची निर्मिती केली. परंतु वनविभागाच्या कर्मचाºयांनी त्यांच्या जबाबदारीची जाणीवच दिसत नाही. पवनी तालुक्यात वृक्षाची कत्तल अतिशय योजनाबध्द पध्दतीने सुरु आहे. या परिसरात मोजक्याच आरामशीन आहेत. तेथे फक्त दाखविण्यासाठी परवानगीचे काही लाकडे कटाईसाठी दाखविले जातात. तर चोरीचे लाकडे रात्रीला कापले जातात.