शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
4
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
5
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
6
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
7
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
8
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
9
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
10
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
11
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
12
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
13
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
14
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
16
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
17
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
18
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
19
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
20
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा

वृक्षतोडीने जंगल ओसाड होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:54 IST

नैसर्गिक संपदेने नटलेले पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगलाचे अस्तीत्व आहे. कधी काळी घनदाट असलेल्या जंगलातून जाताना भिती वाटायची परंतु अलीकडे वृक्षतोड आणि विविध कारणाने जंगल ओसाड असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपर्यावरण प्रेमींचेही दुर्लक्ष : योजनाबद्ध पद्धतीने तस्करांचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कपालोरा : नैसर्गिक संपदेने नटलेले पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगलाचे अस्तीत्व आहे. कधी काळी घनदाट असलेल्या जंगलातून जाताना भिती वाटायची परंतु अलीकडे वृक्षतोड आणि विविध कारणाने जंगल ओसाड असल्याचे चित्र आहे. अशिच परिस्थिती राहिल्यास भविष्यात पवनी तालुक्यातील जंगलाचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही.पवनी तालुक्यात वाही, सिंगोरी, भुयार, पाहूणगाव, खापरी, कोरंभी अशा भागात घनदाट जंगल होती. सध्याच्या स्थितीमध्ये ही जंगले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पवन राजाच्या पहाडीच्या किल्ल्यावरुन बघीतले तर चोहीकडे हिरवेगाव जंगल पाहायला मिळत होते. वाढती लोकसंख्या वाढते शहर, वाढते औद्योगिक कारखाने यामुळे जंगल नामशेष होत आहेत. यामुळे या भागात पाणी अल्पप्रमाणात पडते व उष्णता ताप वाढत आहे. जंगलाचे रक्षकच भक्षक बनले आहेत. जंगलाचे रक्षण करणारे अधिकारी व कर्मचारी याकडे कानाडोळा करीत आहेत. दिवसाढवळ्या काही कंत्राटदार जंगलाच्या मध्यभागी जावून मशीनद्वारे सागवन जातीचे वृक्षतोड करीत आहेत. हे चित्र गावकऱ्यांना दिसते मात्र वनविभागातील कर्मचाºयांना का दिसत नाही. असा प्रश्न पडत आहे. संगनमताने हा सर्व प्रकार सुरु असल्याचे काही ग्रामस्थ सांगत आहे.स्थानिकांना हाताशी धरुन तस्कर जंगलात शिरत आहेत. सागवन व आडजात वृक्षाची खुलेआम कततल करीत आहेत. या वृक्षतोडीमुळे पवनी तालुक्यातील पर्जन्यमानात घट होत आहे. हिच परिस्थिती कायम राहिल्यास निसर्गाचा हा अनमोल ठेवा नष्ठ होण्याची भिती आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये पवनी तालुकयात उष्णतेचा लाटेमुळे होरपळून निघत आहे. दरवर्षी पवनीच्या तापमानात वाढ होत आहे. याला जिम्मेदार वनराई कमी होत असल्याचे परिणाम आहेत. तालुक्यात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. वन वृक्षाचे लागवड करणे हे महत्वाचे आहे. त्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. या करिता कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च केला जात आहे. मात्र हे सर्व कागदावरच पाहायला मिळत आहेत.वृक्षाची जतन करण्यासाठी शासनाने काही नियम केले आहेत. ईतकेच नव्हे तर या नियमाची अंमलबजावणी योग्य तºहेने व्हावे म्हणून वनविभागाची निर्मिती केली. परंतु वनविभागाच्या कर्मचाºयांनी त्यांच्या जबाबदारीची जाणीवच दिसत नाही. पवनी तालुक्यात वृक्षाची कत्तल अतिशय योजनाबध्द पध्दतीने सुरु आहे. या परिसरात मोजक्याच आरामशीन आहेत. तेथे फक्त दाखविण्यासाठी परवानगीचे काही लाकडे कटाईसाठी दाखविले जातात. तर चोरीचे लाकडे रात्रीला कापले जातात.