शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

वृक्षतोडीने जंगल ओसाड होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:54 IST

नैसर्गिक संपदेने नटलेले पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगलाचे अस्तीत्व आहे. कधी काळी घनदाट असलेल्या जंगलातून जाताना भिती वाटायची परंतु अलीकडे वृक्षतोड आणि विविध कारणाने जंगल ओसाड असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपर्यावरण प्रेमींचेही दुर्लक्ष : योजनाबद्ध पद्धतीने तस्करांचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कपालोरा : नैसर्गिक संपदेने नटलेले पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगलाचे अस्तीत्व आहे. कधी काळी घनदाट असलेल्या जंगलातून जाताना भिती वाटायची परंतु अलीकडे वृक्षतोड आणि विविध कारणाने जंगल ओसाड असल्याचे चित्र आहे. अशिच परिस्थिती राहिल्यास भविष्यात पवनी तालुक्यातील जंगलाचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही.पवनी तालुक्यात वाही, सिंगोरी, भुयार, पाहूणगाव, खापरी, कोरंभी अशा भागात घनदाट जंगल होती. सध्याच्या स्थितीमध्ये ही जंगले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पवन राजाच्या पहाडीच्या किल्ल्यावरुन बघीतले तर चोहीकडे हिरवेगाव जंगल पाहायला मिळत होते. वाढती लोकसंख्या वाढते शहर, वाढते औद्योगिक कारखाने यामुळे जंगल नामशेष होत आहेत. यामुळे या भागात पाणी अल्पप्रमाणात पडते व उष्णता ताप वाढत आहे. जंगलाचे रक्षकच भक्षक बनले आहेत. जंगलाचे रक्षण करणारे अधिकारी व कर्मचारी याकडे कानाडोळा करीत आहेत. दिवसाढवळ्या काही कंत्राटदार जंगलाच्या मध्यभागी जावून मशीनद्वारे सागवन जातीचे वृक्षतोड करीत आहेत. हे चित्र गावकऱ्यांना दिसते मात्र वनविभागातील कर्मचाºयांना का दिसत नाही. असा प्रश्न पडत आहे. संगनमताने हा सर्व प्रकार सुरु असल्याचे काही ग्रामस्थ सांगत आहे.स्थानिकांना हाताशी धरुन तस्कर जंगलात शिरत आहेत. सागवन व आडजात वृक्षाची खुलेआम कततल करीत आहेत. या वृक्षतोडीमुळे पवनी तालुक्यातील पर्जन्यमानात घट होत आहे. हिच परिस्थिती कायम राहिल्यास निसर्गाचा हा अनमोल ठेवा नष्ठ होण्याची भिती आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये पवनी तालुकयात उष्णतेचा लाटेमुळे होरपळून निघत आहे. दरवर्षी पवनीच्या तापमानात वाढ होत आहे. याला जिम्मेदार वनराई कमी होत असल्याचे परिणाम आहेत. तालुक्यात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. वन वृक्षाचे लागवड करणे हे महत्वाचे आहे. त्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. या करिता कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च केला जात आहे. मात्र हे सर्व कागदावरच पाहायला मिळत आहेत.वृक्षाची जतन करण्यासाठी शासनाने काही नियम केले आहेत. ईतकेच नव्हे तर या नियमाची अंमलबजावणी योग्य तºहेने व्हावे म्हणून वनविभागाची निर्मिती केली. परंतु वनविभागाच्या कर्मचाºयांनी त्यांच्या जबाबदारीची जाणीवच दिसत नाही. पवनी तालुक्यात वृक्षाची कत्तल अतिशय योजनाबध्द पध्दतीने सुरु आहे. या परिसरात मोजक्याच आरामशीन आहेत. तेथे फक्त दाखविण्यासाठी परवानगीचे काही लाकडे कटाईसाठी दाखविले जातात. तर चोरीचे लाकडे रात्रीला कापले जातात.