शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जलशुद्धीकरण केंद्र परिसरात पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:20 IST

जल जीवन आहे. पाण्याचे महत्व अनन्यसाधारण असताना तुमसर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरात जलवाहिनी लिकेजमुळे शेकडो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

ठळक मुद्देशेकडो लिटर पाणी व्यर्थ : जलवाहिनी लीकेज, वृक्षांचे कठडे व घंटागाड्या पडून

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जल जीवन आहे. पाण्याचे महत्व अनन्यसाधारण असताना तुमसर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरात जलवाहिनी लिकेजमुळे शेकडो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. जलशुद्धीकरण परिसरात पाणी साचले आहे. साचल्या पाण्यात वृक्षांची कठडे, कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाड्या पडून आहेत. नवीन लोखंडी साहित्य मागील अनेक महिन्यापासून भंगारात पडल्यावजा आहेत. नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे.तुमसर शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नेहरू शाळेजवळील जलशुद्धीकरण केंद्रात जलवाहिनी लिकेज झाली आहे. नगरपरिषदेचे कर्मचारी तांत्रिक बिघाड दूर करण्याचा निश्चितच प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांना यश आले नाही. जलशुद्धीकरण केंद्र परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. मागील चार ते पाच दिवसापासून पाण्याची नासाडी होत आहे. जुनी जलवाहिनी असल्याने लिकेज झाल्याचे समजते. दुसरीकडे उन्हाळा असल्याने नगरपरिषद प्रशासनाने शहरात पाणीपुरवठा करणे सुरु ठेवले आाहे.पाणीपुरवठा बंद करून जलवाहिनी दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला तर शहरात पाण्याकरिता हाहा:कार होईल.संतप्त नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा विचार करून पाणीपुरवठा सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.२८ मे रोजी लोकसभा पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे तुमसरकरांना नाराज करता येणार नाही. सर्व पदाधिकारी निवडणूक कामात व्यस्त आहेत. ग्राम पंचायत प्रशासनाचे कर्मचारीही शासकीय कामात व्यस्त आहेत. पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी लिकेजची कामे पाणीपुरवठा केल्यानंतर करणे सुरु आहे. परंतु लिकेज पूर्णत: बंद न झाल्याने पाणी लिकेजमधून वाहून जात आहे.वृक्षांचेकठडे, घंटागाड्यांचीही अवस्था वाईटतुमसर नगरपरिषदेने मोठ्या प्रमाणात शहरात वृक्षांची लागवड केली. त्यांच्या सुरक्षेकरिता लोखंडी कठडे लावले होते. जुने कठडे काढण्यात आले. नवीन लोखंडी कठडे तयार करण्यात आले. जुन्या कठड्याऐवजी नवीन कठडे अनेक ठिकाणी लावण्यात आले नाही. सध्या जुने व नवीन कठडे जलशुद्धीकरण केंद्रात पडून आहेत. कचरा उचलणाºया काही जुन्या व नवीन घंटागाड्या सुद्धा येथे पडून आहेत. जलशुद्धीकरण केंद्रात पाणी साचल्याने ते साहित्य निश्चितच खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील जलवाहिनी लिकेज असल्याने पाणी साचले आहे. दुरुस्तीची कामे सुरु आहेत. शहराचा पाणीपुरवठा बंद करून दुरुस्ती करता येत नाही. नागरिकांना असुविधा होईल. तांत्रिक बिघाड दूर केल्या जाईल. वृक्षांची कठडे व घंटागाड्या सुरक्षित स्थळी हलविण्यास सांगितले आहे.-प्रदीप पडोळे, नगराध्यक्ष, तुमसर.