शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात गणरायाला पाण्याचा विळखा; रांजी येथील मंदिरात शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 13:56 IST

पवनी तालुक्यातील रांजी गणेश मंदिरात पाणी शिरले आहे. गणरायाची मूर्ती पाण्यात अर्धी बुडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे उगडले असून पवनी तालुक्यातील रांजी गणेश मंदिरात पाणी शिरले आहे. गणरायाची मूर्ती पाण्यात अर्धी बुडाली आहे.याआधी या मंदिरात १९९४ च्या महापुराचे पाणी शिरल्याची आठवण गावकरी सागंतात. या भागातील दिवान घाट व वैजेश्वर घाट हेही पाण्याखाली गेले आहेत.जिल्ह्यात गुरूवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून शुक्रवारीही क्षणभराची उसंत न घेता पाऊस बरसत होता. या पावसाने जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून तलाव तुडुंब भरले आहे. आठ दिवसापुर्वी गुरूवारीच जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली होती. आता पुन्हा संततधार पाऊस बरसत असल्याने धान पीक धोक्यात आले आहे.जिल्ह्यात गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. रात्रभर संततधार पाऊस बरसत होता. शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ४३.४ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस साकोली तालुक्यात ९७ मिमी झाला असून येथे अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. तुमसर तालुक्यात ४५.२ मिमी, लाखांदूर ४४.५ मिमी, लाखनी ४२.८ मिमी, मोहाडी ३८.३ मिमी आणि भंडारा तालुक्यात २१.१ मिमी पावसाची नोंद झाली. १ जून ते २८ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात १०२४.८ मिमी पावसाची नोंद झाली असून प्रत्यक्ष पडणाऱ्या सरासरी पावसाच्या १०१ टक्के आहे.

टॅग्स :floodपूर