शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

मोहाडीत कालबाह्य नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:32 IST

येथील नळयोजनेला ४७ वर्ष पूर्ण झालेले असून संपूर्ण नळयोजना कालबाह्य झालेलीे आहे. त्यामुळेच मोहाडीत पाणीसमस्येने विक्राळ रुप धारण केलेले आहे. जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

ठळक मुद्देनवीन प्रस्ताव दोन वर्षांपासून धूळखात : योजना ४७ वर्षे जुनी, मर्यादा होती २५ वर्षांची

सिराज शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : येथील नळयोजनेला ४७ वर्ष पूर्ण झालेले असून संपूर्ण नळयोजना कालबाह्य झालेलीे आहे. त्यामुळेच मोहाडीत पाणीसमस्येने विक्राळ रुप धारण केलेले आहे. जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.येथील पंचायत समिती कार्यालयाजवळील पहिली व जुनी पाण्याची ४० फूट उंच जलकुंभ जीर्ण झाले ते केव्हाही कोलमडू शकते. परिणामी मोठा अपघात सुद्धा घडू शकतो. ही टाकी दोन तीन ठिकाणाहून लिकेज आहे. मोहाडी येथे सन १९७२ रोजी नळयोजना कार्यान्वित करण्यात आली. त्यावेळी मोहाडीची भौगोलिक स्थिती व लोकसंख्येच्या आधारावर पाण्याची टाकी व पाईपलाईन टाकण्यात आली होती. या नळयोजनेची कालमर्यादा २५ वर्षे ठरविण्यात आली होती. नगरपंचायत प्रशासनाने दोन वर्षापूर्वी वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र तो प्रस्ताव अजुनही धूळ खात आहे.२५ वर्षानंतर ही नळयोजना कालबाह्य घोषित करुन नवीन पाणीपुरवठा योजना तयार करणे आवश्यक होते. परंतु याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले. आठ वर्षापूर्वी मोहाडी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव पारित करुन नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करुन तसे प्रस्ताव प्रशासनाला पाठविले होते.मात्र त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात न आल्याने प्रशासनाने त्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. मोहाडीतील जलवाहिनी ४२ वर्षापूर्वी टाकण्यात आली होती. त्याकाळी गावातील रस्ते व घरे खोलगगट भागात होते. कालांतराने रस्ते व घरे उंच होत गेले. त्यामुळे ती जलवाहिनी ७ ते ८ फूट खोल गेली आहे. त्याामुळे आजच्या स्थितीत पाणी नळाद्वारे वरपर्यंत पोहतच नसल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.यासाठी लोकांनी ७ ते ८ फूट खोल टाके बनवून नळाचे पाणी घेत आहेत. यापासून नागरिक त्रस्त झाले आहेतत. पावसाळ्यात या खोल टाक्यात पावसाचे गढुळ पाणी जमा होते व तेच पाणी पाईपलाईनमध्ये शिरुन तेच गढूळ व अशुद्ध पाणी नळाद्वारे येवून लोकांना प्यावे लागते. त्यामुळे साथीचे रोग बळावतात. ही पाईपलाईन ४७ वर्षे जुनी असल्याने तिही जर्जर झाली आहे.याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.ही पाईपलाईन ७ ते ८ फुट जमिनीधाली असल्याने ती फुटल्यास त्याचा पत्ता लागत नाही. व कितीतरी गॅलन पाणी जमिनीतच जिरतो व लोकांना फक्त २ ते ३ गुंड पाणीच प्राप्त होते.येथील पंचायत समिती जवळील पाण्याच्या टाकीची अवस्था जर्जर झालेली असून या टाकीतील सिमेंट व लोखंडाचे बार लिकेजमुळे सडलेले असून जंग लागलेला आहे. तसेच अनेक ठिकाणचा प्लास्टर उखडलेला आहे. या पाण्याच्या टाकीत हजारो गॅलेन पाणी असतो. आणि एवढा भार सहन करण्याची क्षमता या टाकीची राहिलेली नाही. त्यामुळे केव्हाही मोठा अनर्थ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.प्रस्तावाकडे दुर्लक्षग्रामसभेत आठ वर्षापूर्वी नवीन नळयोजनेच्या प्रस्तावासाठी ठराव मंजूर करण्यात आला होता. तसा प्रस्तावही पाणीपुरवठा विभागाला पाठविण्यात आला होता. त्यानंतर दोन वर्षापूर्वीही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रस्तावाचे काय झाले याचा पाठपुरावा ग्रामपंचायतीने करणे जरुरीचे होते. मात्र त्या प्रस्तावाचा पाठपुरावाच करण्यात न आल्याने प्रशासनाचेही त्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविकच आहे. आतातरी पाठपुरावा करणार की नाही हे स्थानिक प्रशासनावर अवलंबून आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूक