शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

हुडहुडत्या थंडीत करडीत पेटले पाणी; दाेन दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प

By युवराज गोमास | Updated: January 2, 2024 16:36 IST

नागरिकांत असंतोष : तातडीने सुधारणा करून प्रश्न सोडविण्याची अपेक्षा

युवराज गोमासे

भंडारा : मोहाडी तालुक्यातील करडी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनचा पाईप फुटल्यामुळे दोन दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. नागरिकांना पिण्याचे पाण्यासाठी हुडहुडत्या थंडीत भटकंती करावी लागत आहे. प्रकरणी नागरिकांत असंतोषाची भावना असून तातडीने सुधारणा करून पाणी प्रश्न सोडविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मोहाडी तालुक्यातील करडी गावाची लोकसंख्या ६ हजारापेक्षा अधिक आहे. गावासाठी सन २०१२ मध्ये १८ लाखाची पाणी पुरवठा योजना मंजूरी करण्यात आली होती. त्यावेळी पाणीपुरवठा करणारी विहीर ते पाण्याच्या टाकीपर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्यात आली होती. परंतु, पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाची करण्यात आले. पाईपलाईन अंदाजपत्रकाप्रमाणे जमिनीत तीन फूट न गाडता १ फूट ते दिड फुट खोल जमिनीत गाडल्या गेली. त्यामुळे ही पाईपलाईन वेळोवेळी फुटून करडीवासियांना वेळोवेळी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सदर प्रश्न मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा विभाग तुमसर यांचेकडे लेखी तक्रारीतून मांडला होता.

चौकशी करून कारवाई करण्याकरिता लेखी तक्रार दिली होती. करडी येथील गांधी चौकात तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी यांनी घेतलेल्या जनता दरबारात सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता. परंतु, तत्कालीन जिल्हा परिषद सदस्यांनी पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर दडपण आणून सदर कामाची चौकशी होऊ दिली नाही. त्यामुळे योजना अयशस्वी ठरली असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.२०१२ साली नवीन पाईप लाईन कामकाजाला व योजनेला कडाडून विरोध केला. त्यामुळे ही पाईपलाईन आत्तापर्यंत ग्रामपंचायतीस हस्तांतरित झालेली नाही. परंतु, त्यानंतर ग्रामपंचायतीने लाखो रुपये दुरुस्तीच्या नावावर उधळले आहेत. नागरिकांचा टॅक्सचा पैसा पाण्यात टाकण्यात आला आहे.दिवाळीला करडी ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर होवून निलीमा इलमे सरपंचपदी आरूढ झाल्या आहेत. परंतु, नववर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारीपासून पाणी पुरवठा योजनेची मुख्य पाईप लाईन लिकेज झाल्याने गावातील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. तात्पुरते दुरूस्तीचे काम ग्रामपंचायतीचेवतीने हाती घेण्यात आले आहे. परंतु, गावात पिण्याचे खारट पाणी असल्याने गोड पाण्यासाठी गावाबाहेर भर थंडीत भटकंती करावी लागत आहे.

 नव्या ५ करोडच्या योजनेला द्यावी गती

सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांवर दोष देण्याचे रडगाणे गात बसण्यापेक्षा नव्याने मंजूर झालेली ५ करोड रूपयाची योजना तातडीने कार्यान्वीत करून कामाला गती देण्यासाठी पाणी पुरवठा विभागाला कळविण्याची गरज आहे. तसेच गावातील योजनेवर विद्युत बिलापोटी होणारा मोठ्या निधीची बचत होण्यासाठी पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालविण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

मुख्य पाईप लाईन जिर्ण असल्याने वारंवार फुटते आहे. दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु, हा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी नवी ५ करोडची योजना गावाला मंजूर झाली आहे. योजनेचे काम सुरू आहेत. लवकरच जुन्या योजनेच्या लिकेजचे काम पूर्ण होवून पाणी पुरवठा सुरळीत होईल.- निलीमा इलमे, सरपंच, करडी.