शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

पाणी पुरवठा योजना ‘रामभरोसे’

By admin | Updated: January 5, 2015 22:58 IST

चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी बपेरा गावाच्या हद्दीत सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु कर यात आली आहे. या योजनेची सुरक्षा करण्यासाठी

रंजित चिंचखेडे - चुल्हाड (सिहोरा) चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी बपेरा गावाच्या हद्दीत सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु कर यात आली आहे. या योजनेची सुरक्षा करण्यासाठी चौकीदार नियुक्त करण्यात आले असले तरी, लोकमतने तासभर केलेल्या स्टींग आपरेशन मध्ये कुणीही आढळून आलेले नाही.बपेरा गावाच्या हद्दीत सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजना साकारताना कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आली आहे. वादग्रस्त या योजनेला बपेऱ्यात वास्तव्य मिळाले आहे. वैनगंगा नदी पात्रातून ही योजना पाण्याचा उपसा करित आहे. या योजनेला चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील बपेरा, देवसर्रा, ब्राम्हणटोला, महालगाव, वारपिंडकेपार, सोंड्या, देवरी (देव), बिनाखी, सुकळी (नकुल) गावे जोडण्यात आली आहे. या योजनेची ५२ हजार ५०० लीटर पाणी साठवणुक क्षमता आहे. १ लक्ष २५ हजार लीटर पाण्याचे शुद्धीकरण योजना करित आहे. योजनेची पाईप लाईन तथा अभिनव टाकी गावा गावात दिमाखात उभ्या आहेत. योजनेची नळ उभारण्यात आली असून खाजगी कनेक्शन वाटप करण्यात आले नाही. यामुळे गावात पाण्याची ओरड नाही.नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाच्या तिजोरीतुन कोट्यवधीचे वारे - न्यारे आली आहे. परंतु या पाण्याचा उपयोग नागरिकांना मिळाला नाही. गेल्या दोन वर्षापासून पुर्णत: योजना बंद आहे. योजना सुरु करण्यासाठी हालचाली नाहीत. नागरिकांना महत्वाकांक्षी योजना असतांना हक्काचे एक गुंड पाणी मिळत नाही. यात स्थानिक लोकप्रतिनिधीवर नागरिकांचा रोष आहे. नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडणारे लोकप्रतिनिधीचे आवाजांना घेंगा झाल्याचे आरोप विरोधक करित आहेत. दरम्यान योजना बंद असतांना या शासकीय मालमत्तेचे सुरक्षा करण्यासाठी चौकीदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या चौकीदाराची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आले नाही. संबंधीत विभागाचे वरिष्ठ अधिकारी येत नाही. यामुळे चौकीदार टेंशन घेत नाही. योजनाच गुंडाळणार असल्याच्या कारणावरून कुणी जबाबदारी घेत नाही. या योजनेत सत्यता जाणुन घेण्यासाठी लोकमतने दिवसा ढवळ्या २९ ला ‘स्टिंग आॅपरेशन’ केले आहे. हे करताना आश्चर्याचा धक्काच बसला. या योजनेला प्रमुख द्वार आहे. या दरवाज्याचे कुलूप अनेक महीण्यापासून उघडण्यात आले नसल्याने यामुळे कुलुपाला गंज चढलेला आहे. यामुळे प्रमुख दरवाजा वरून उडी घेवून योजनेच्या आवारात प्रवेश करण्यात आलेला आहे. या योजनेचे आतील दृश्य संतापजनक दिसून आले आहे. मुख्य दरवाजा समोर एक खाट ठेवण्यात आली आहे. चौकीदार २४ तास सुरक्षा करित असल्याचा संदेश देत आहे. परंतु प्रत्यक्षात कुणी राहत नाही. दिवस रात्र योजनेची सुरक्षा रामभरोसे आहे.पंपगृह आणि पाणी साठवणुक गृहात साहीत्याची तोडफोड करण्यात आली आहे. विजेचे संपुर्ण बोर्ड चोरीला गेली आहेत. या गृहात फक्त सांगाडा शिल्लक आहे. याच पंपगृहाच्या लगत जलशुद्धीकरण केंद्र आहे. जलशुद्धीकरण केंद्रात तासभर फेरफटका मारला असता कुणी साधी विचारपुस करणारे कुणी मिळाले नाही.