शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा योजना ‘रामभरोसे’

By admin | Updated: January 5, 2015 22:58 IST

चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी बपेरा गावाच्या हद्दीत सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु कर यात आली आहे. या योजनेची सुरक्षा करण्यासाठी

रंजित चिंचखेडे - चुल्हाड (सिहोरा) चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी बपेरा गावाच्या हद्दीत सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु कर यात आली आहे. या योजनेची सुरक्षा करण्यासाठी चौकीदार नियुक्त करण्यात आले असले तरी, लोकमतने तासभर केलेल्या स्टींग आपरेशन मध्ये कुणीही आढळून आलेले नाही.बपेरा गावाच्या हद्दीत सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजना साकारताना कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आली आहे. वादग्रस्त या योजनेला बपेऱ्यात वास्तव्य मिळाले आहे. वैनगंगा नदी पात्रातून ही योजना पाण्याचा उपसा करित आहे. या योजनेला चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील बपेरा, देवसर्रा, ब्राम्हणटोला, महालगाव, वारपिंडकेपार, सोंड्या, देवरी (देव), बिनाखी, सुकळी (नकुल) गावे जोडण्यात आली आहे. या योजनेची ५२ हजार ५०० लीटर पाणी साठवणुक क्षमता आहे. १ लक्ष २५ हजार लीटर पाण्याचे शुद्धीकरण योजना करित आहे. योजनेची पाईप लाईन तथा अभिनव टाकी गावा गावात दिमाखात उभ्या आहेत. योजनेची नळ उभारण्यात आली असून खाजगी कनेक्शन वाटप करण्यात आले नाही. यामुळे गावात पाण्याची ओरड नाही.नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाच्या तिजोरीतुन कोट्यवधीचे वारे - न्यारे आली आहे. परंतु या पाण्याचा उपयोग नागरिकांना मिळाला नाही. गेल्या दोन वर्षापासून पुर्णत: योजना बंद आहे. योजना सुरु करण्यासाठी हालचाली नाहीत. नागरिकांना महत्वाकांक्षी योजना असतांना हक्काचे एक गुंड पाणी मिळत नाही. यात स्थानिक लोकप्रतिनिधीवर नागरिकांचा रोष आहे. नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडणारे लोकप्रतिनिधीचे आवाजांना घेंगा झाल्याचे आरोप विरोधक करित आहेत. दरम्यान योजना बंद असतांना या शासकीय मालमत्तेचे सुरक्षा करण्यासाठी चौकीदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या चौकीदाराची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आले नाही. संबंधीत विभागाचे वरिष्ठ अधिकारी येत नाही. यामुळे चौकीदार टेंशन घेत नाही. योजनाच गुंडाळणार असल्याच्या कारणावरून कुणी जबाबदारी घेत नाही. या योजनेत सत्यता जाणुन घेण्यासाठी लोकमतने दिवसा ढवळ्या २९ ला ‘स्टिंग आॅपरेशन’ केले आहे. हे करताना आश्चर्याचा धक्काच बसला. या योजनेला प्रमुख द्वार आहे. या दरवाज्याचे कुलूप अनेक महीण्यापासून उघडण्यात आले नसल्याने यामुळे कुलुपाला गंज चढलेला आहे. यामुळे प्रमुख दरवाजा वरून उडी घेवून योजनेच्या आवारात प्रवेश करण्यात आलेला आहे. या योजनेचे आतील दृश्य संतापजनक दिसून आले आहे. मुख्य दरवाजा समोर एक खाट ठेवण्यात आली आहे. चौकीदार २४ तास सुरक्षा करित असल्याचा संदेश देत आहे. परंतु प्रत्यक्षात कुणी राहत नाही. दिवस रात्र योजनेची सुरक्षा रामभरोसे आहे.पंपगृह आणि पाणी साठवणुक गृहात साहीत्याची तोडफोड करण्यात आली आहे. विजेचे संपुर्ण बोर्ड चोरीला गेली आहेत. या गृहात फक्त सांगाडा शिल्लक आहे. याच पंपगृहाच्या लगत जलशुद्धीकरण केंद्र आहे. जलशुद्धीकरण केंद्रात तासभर फेरफटका मारला असता कुणी साधी विचारपुस करणारे कुणी मिळाले नाही.