शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

पाणी पुरवठा योजना ‘रामभरोसे’

By admin | Updated: January 5, 2015 22:58 IST

चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी बपेरा गावाच्या हद्दीत सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु कर यात आली आहे. या योजनेची सुरक्षा करण्यासाठी

रंजित चिंचखेडे - चुल्हाड (सिहोरा) चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी बपेरा गावाच्या हद्दीत सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु कर यात आली आहे. या योजनेची सुरक्षा करण्यासाठी चौकीदार नियुक्त करण्यात आले असले तरी, लोकमतने तासभर केलेल्या स्टींग आपरेशन मध्ये कुणीही आढळून आलेले नाही.बपेरा गावाच्या हद्दीत सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजना साकारताना कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आली आहे. वादग्रस्त या योजनेला बपेऱ्यात वास्तव्य मिळाले आहे. वैनगंगा नदी पात्रातून ही योजना पाण्याचा उपसा करित आहे. या योजनेला चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील बपेरा, देवसर्रा, ब्राम्हणटोला, महालगाव, वारपिंडकेपार, सोंड्या, देवरी (देव), बिनाखी, सुकळी (नकुल) गावे जोडण्यात आली आहे. या योजनेची ५२ हजार ५०० लीटर पाणी साठवणुक क्षमता आहे. १ लक्ष २५ हजार लीटर पाण्याचे शुद्धीकरण योजना करित आहे. योजनेची पाईप लाईन तथा अभिनव टाकी गावा गावात दिमाखात उभ्या आहेत. योजनेची नळ उभारण्यात आली असून खाजगी कनेक्शन वाटप करण्यात आले नाही. यामुळे गावात पाण्याची ओरड नाही.नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाच्या तिजोरीतुन कोट्यवधीचे वारे - न्यारे आली आहे. परंतु या पाण्याचा उपयोग नागरिकांना मिळाला नाही. गेल्या दोन वर्षापासून पुर्णत: योजना बंद आहे. योजना सुरु करण्यासाठी हालचाली नाहीत. नागरिकांना महत्वाकांक्षी योजना असतांना हक्काचे एक गुंड पाणी मिळत नाही. यात स्थानिक लोकप्रतिनिधीवर नागरिकांचा रोष आहे. नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडणारे लोकप्रतिनिधीचे आवाजांना घेंगा झाल्याचे आरोप विरोधक करित आहेत. दरम्यान योजना बंद असतांना या शासकीय मालमत्तेचे सुरक्षा करण्यासाठी चौकीदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या चौकीदाराची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आले नाही. संबंधीत विभागाचे वरिष्ठ अधिकारी येत नाही. यामुळे चौकीदार टेंशन घेत नाही. योजनाच गुंडाळणार असल्याच्या कारणावरून कुणी जबाबदारी घेत नाही. या योजनेत सत्यता जाणुन घेण्यासाठी लोकमतने दिवसा ढवळ्या २९ ला ‘स्टिंग आॅपरेशन’ केले आहे. हे करताना आश्चर्याचा धक्काच बसला. या योजनेला प्रमुख द्वार आहे. या दरवाज्याचे कुलूप अनेक महीण्यापासून उघडण्यात आले नसल्याने यामुळे कुलुपाला गंज चढलेला आहे. यामुळे प्रमुख दरवाजा वरून उडी घेवून योजनेच्या आवारात प्रवेश करण्यात आलेला आहे. या योजनेचे आतील दृश्य संतापजनक दिसून आले आहे. मुख्य दरवाजा समोर एक खाट ठेवण्यात आली आहे. चौकीदार २४ तास सुरक्षा करित असल्याचा संदेश देत आहे. परंतु प्रत्यक्षात कुणी राहत नाही. दिवस रात्र योजनेची सुरक्षा रामभरोसे आहे.पंपगृह आणि पाणी साठवणुक गृहात साहीत्याची तोडफोड करण्यात आली आहे. विजेचे संपुर्ण बोर्ड चोरीला गेली आहेत. या गृहात फक्त सांगाडा शिल्लक आहे. याच पंपगृहाच्या लगत जलशुद्धीकरण केंद्र आहे. जलशुद्धीकरण केंद्रात तासभर फेरफटका मारला असता कुणी साधी विचारपुस करणारे कुणी मिळाले नाही.