शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

कोट्यवधीं रूपयांची पाणीपुरवठा योजना भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 23:43 IST

पाणी हे जीवन असले तरी कोट्यवधी रूपयांची देव्हाडी पाणी पुरवठा योजना मागील ८ ते १० वर्षांपासून धूळखात पडून आहे. महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाने देव्हाडी येथील पाणी पुरवठा योजना .....

ठळक मुद्दे१० वर्षांपासून योजना बंद : मुख्यमंत्री पयेजल योजनेत झाला समावेश

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पाणी हे जीवन असले तरी कोट्यवधी रूपयांची देव्हाडी पाणी पुरवठा योजना मागील ८ ते १० वर्षांपासून धूळखात पडून आहे. महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाने देव्हाडी येथील पाणी पुरवठा योजना पुनर्जिवीत करून त्याचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करण्यात आला आहे. प्रत्यक्षात ही योजना कार्यान्वित होणार की भंगारात जमा होणार असा प्रश्न पडला आहे.सुमारे ८ ते १० वर्षापूर्वी तीन कोटी रूपये खर्च करुन दहा गावाकरिता ही योजना महाराष्टÑ जीवन प्राधीकरणने पूर्ण केली. सन २००३-०४ मध्ये ही योजना पूर्ण झाली. देव्हाडी, ढोरवाडा, चारगाव, हिंगणा, हसारा, खापा, परसवाडा (दे), तुडका, तामसवाडी आदी गावाकरिता ही योजना आहे. योजना पुर्णत्वास आल्यानंतर १० वर्षांपासून बंद आहे. योजना पूर्णत्वास आल्यानंतर ती चालवणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला होता.जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत न झाल्यामुळे ही योजना बंद स्थितीत होती. या योजनेत लाभ घेणाºया गावांनी शिखर परिषद तयार करून पाणीपट्टी वसूली करून ही योजना चालविण्याचा अधिकार संबंधित गावांना देण्यात आला, परंतु आमदनी अठण्णी व खर्चा रूपय्या अशी या योजनेची स्थिती असल्याने येथे कुणीही तसा प्रयत्न केला नाही. सर्वच अपवाद वगळता ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यामुळे या योजनेकडे दुर्लक्ष करण्यात आले.या योजनेची पाईपलाईन गळती, नविन पाईपलाईन घालणे, लिकेज दुरुस्ती करणे, पंप दुरुस्ती करणे येथे करण्याची गरज आहे.सन २०१४-२०१५ मध्ये तशी कामे करण्यात आली. मुख्यमंत्री पेयजल योजनेत ३१ डिसेंबर २०१६ मध्ये समावेश करण्यात आला. तसे प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. जिल्हा स्तरावर पाणीपूरवठा योजनेचे स्वतंत्र कार्यालय असून अभियंते व इतर कर्मचारी आहेत.यासंदर्भात संबंधित विभागाचे उपविभागीय अभियंता ए. जी. जिभकाटे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश झाल्यानंतर पाणी पुरवठा केव्हा केला जाईल असा प्रश्न उपस्थित होत आहे. या योजनेसंदर्भात आमदार डॉ.परिणय फुके यांच्याकडे परसवाडा येथील सामाजिक कार्यकर्ता राकेश सिंगाडे यांनी निवेदन देऊन ही योजना सुरू करण्याची मागणी केलेली आहे.पाणी पुरवठा योजनेला शासनाने प्राधान्यक्रम देऊन योजना तात्काळ कार्यान्वित करण्याची गरज होती. मुख्यमंत्र्यांचे नाव या योजनेला दिले आहे. निदान पेयजल योजना तरी शासनाने मार्गी लावावी.- के. के. पंचबुध्दे, जि.प. सदस्य देव्हाडीमुख्यमंत्री पेयजल योजनेत देव्हाडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा समावेश होऊन एक वर्ष लोटत आहे. परंतु अद्याप कारवाई झाली नाही. आ. परिणय फुके यांनी भेटून पाठपुरावा करणार आहे.- राकेश सिंगाडे, सामाजिक कार्यकर्ता, परसवाडा (दे.)