शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

जलयुक्त शिवार अभियान हा जल समस्येवरील पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 00:37 IST

जलयुक्त शिवार अभियान हा देखावा असून सिंचन समस्येवर पर्याय नाही. हे अभियान वाईट आहे, असे आमचे म्हणने नाही.

राष्ट्रवादी किसान सभा : शंकर धोंडगे यांचा आरोप भंडारा : जलयुक्त शिवार अभियान हा देखावा असून सिंचन समस्येवर पर्याय नाही. हे अभियान वाईट आहे, असे आमचे म्हणने नाही. परंतु या अभियानातून हरितक्रांती होईल, अशी चिन्हे नाहीत. या अभियानातून एका वर्षात २४ टीएमसी पाणी साठविल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा धांदात खोटा असल्याचा आरोप राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी पत्रपरिषदेत केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान सभेचे उपाध्यक्ष किशोर माथनकर, प्रदेश सचिव धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, विनोद हरिणखेडे, धनराज साठवणे उपस्थित होते.यावेळी ते म्हणाले, सध्या चालू वर्षात विदर्भात उर्वरित राज्याच्या तुलनेत पाऊस बऱ्यापैकी असतांना कापूस, सोयाबीन, धान संत्री आदी नगदी पिकाचे भाव पडल्याने व सरासरी एकरी उत्पादनात घट आल्यामुळे व नापीकीमुळे विदर्भातील शेतकरी कधी नव्हे एवढा अडचणीत आला असुन आणी सरकारचे दुर्लक्ष झाल्यामुळे परिस्थिती वाईट झाली असल्याचा आरोपही त्यांनी केला.विदर्भ हा प्रदेश शेतीपूरक असून शेतीवर निष्ठा ठेवुन कष्ट करण्याची परंपरा या विभागातील शेतकरी समाजाची असतांना व योगायोगाने याच भागातील भूमिपुत्राच्या हाती व राज्याची सूत्रे व केंद्रातही सत्तेत असताना अशी वेळ येणे म्हणजे नवसाने बाळ जन्माला घालावे व तेच आपल्या मुलावर यावे, असा आरोपही त्यांनी केला.केंद्रातील नेत्यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर भाव व टक्के नका देऊ, शेती व्यवसायाला केंद्रबिंदू मानून निर्णय घेऊ. शेतकऱ्यांची कर्जातुन मुक्तता करु अशी आश्वासने सत्तेत येताना दिली होती. पण सरकारात आल्यानंतर बासमती तांदळाची अचानक काही काळ निर्यात इराण देशाची थांबवून धानाचे भाव पाडले व धान उत्पादक शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान केले. सध्या मोठया प्रमाणावर खाद्य तेल, डळी बाहेरील देशातून आणून भाव पाडण्याचे तंत्र चालु आहे. कापसावरील आयात शुल्क कमी करुन कापुस भावामध्ये नुकसान झाले. संत्रा तर यावर्षी तोडणीलाही महाग झाला. थोडेफार पाणी असलेला शेतकरी विजेच्या भारनियमनामुळे हैराण आहे. अश्या स्थितीतही राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन उपाययोजना व दिलासा देण्याऐवजी भाषण बाजी करताना दिसत आहेत. विदर्भात शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन उपाय योजना व दिलासा देण्याऐवजी भाषणबाजी करताना दिसत आहेत. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असतांना त्याचे वरिष्ठ नेते चूकीचे बोलून शेतकऱ्यांची चेष्ठा व मस्करी करतात. मुख्यमंत्री शेतकऱ्याचे कर्ज माफ करणार नाही, अशी ठाम भुमिका घेतात व व्यापाऱ्यांना मात्र सवलती देऊन मदत करतात. याबाबी शेतकरी विरोधी भुमिका असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे विदर्भातील जनतेवर आपलीच मानसं आपलीच माती करायला निघालेत अशी भावना झाली आहे. यासाठी भविष्यात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन व्यापक लढा या अन्यायाविरोधात उभा करावा लागेल. त्याची सुरुवात न्यायालयाच्या माध्यमातून आपली लेखी कैफीयत पोष्टाद्वारे प्रत्येक शेतकरी शेतमजूरानी आपल्या गावागावातून उच्च न्यायालयाकडे पाठवावे, असे आवाहनही शंकर धोंडगे यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)