शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

उजवा कालव्यात पाणी डावा कालवा कोरडा

By admin | Updated: March 8, 2016 00:22 IST

गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजवा कालव्यात पाणी आणि डावा कालव्यात पाण्याअभावी झुडूप असे चित्र आहे. परिणामी याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

शेतकरी सिंचनापासून वंचित : भूगर्भातील पाण्याचा स्रोतही आटलाभंडारा/आसगाव : गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजवा कालव्यात पाणी आणि डावा कालव्यात पाण्याअभावी झुडूप असे चित्र आहे. परिणामी याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे.राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द धरणामुळे भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळावा यासाठी धरणातून उजवा व डावा कालवा तयार करण्यात आला. डावा कालव्याद्वारे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे. उजवा कालवा चंद्रपूर जिल्ह्यात जात असल्यामुळे दोन्ही जिल्ह्यात हरितक्रांती घडून येईल, अशी अपेक्षा होती. या प्रकल्पाला २८ वर्षे होत असताना धरणाचे काम पूर्ण झाले असले तरी दोन्ही कालव्यांचे व वितरिकांचे काम अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे शेतकरी धरणाच्या पाण्यापासून वंचित आहेत.चौरास भागात सिंचन विहिरीवर विद्युत मोटरपंप बसवून शेती केली जात आहे. मात्र गोसेखुर्द धरणामुळे भूगर्भातून वाहणारे पाण्याचे झरे बंद झाल्याने अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. धरणाच्या खालच्या भागातून वाहणाऱ्या नदीपात्रातून रेतीघाटांचे लिलाव होत असल्याने अधिकच्या रेती उपसामुळे नदीपात्रातून येणारे झरेसुद्धा आटले आहेत. भूगर्भातील पाण्याचे झरे बंद होत असल्याने सिंचन विहिरी कोरड्या पडत आहे. चौरास भागावर दुष्काळी परिस्थिती उद्भवत असताना डाव्या कालव्यात पाणी सोडले जात नाही. डाव्या कालव्याचे काम दोषपूर्ण आढळल्याने आज हा कालवा नादुरुस्त अवस्थेत आहे. कालवाच अपुर्णावस्थेत असून वितरिका अजूनही तयार नाहीत. डावा कालवा पूर्ण झाला असता तर कालव्यांतर्गत येणाऱ्या कोरडवाहू शेतकऱ्यांना खरीप व रबीची लागवड करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत झाली असती. रबी, भाजीपालावर्गीय पीकसुद्धा मोठ्या प्रमाणात घेतल्या गेले असते. उजवा कालव्यात २० कि.मी.पर्यंत पाणी सोडत असल्याने दोन हजार हेक्टरच्या आसपास रबीचे धान पिक घेतले जात आहे. धरणात पाणी असतानाही त्याचा उपयोग डाव्या कालव्यांतर्गत असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नसेल तर जिल्ह्यात धरणाचा उपयोग कोणता? अशी संतापजनक प्रतिक्रीया शेतकऱ्यांकडून उमटत आहेत. डावा कालवा व वितरिका तयार करून कालव्यात पाणी सोडल्यास हरितक्रांतीचे स्वप्न साकार होऊन रोजगारासाठी शहराकडे जाणारे बेरोजगारांचे पलायन थांबायला मदत होईल. (प्रतिनिधी/वार्ताहर)