शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

मध्यम प्रकल्पांसह बारा प्रकल्पांत पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:35 IST

जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून विदर्भात ओळखला जातो. जवळपास ५ हजाराच्या जवळपास लहान मोठी तलावे आहेत. जिल्ह्यातील सर्वच तलाव कोरडी पडल्याने यंदा या जिल्ह्याला भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देसाठ्यात कमालीची घट : ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून विदर्भात ओळखला जातो. जवळपास ५ हजाराच्या जवळपास लहान मोठी तलावे आहेत. जिल्ह्यातील सर्वच तलाव कोरडी पडल्याने यंदा या जिल्ह्याला भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागल्याचे चित्र दिसून येत आहे.जिल्ह्यातील नदी, नाल्यासह विहीरीही पूर्णत: आटल्या आहेत. पाणी हे जीवन असून, त्याचा वापर योग्य पध्दतीने होण्याची नितांत गरज आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत गाव असो वा शहर सर्वत्रच पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची उपलब्धता कमी होते. त्यामुळे पाण्याचा होणारा दुरूपयोग टाळून काटकसरीने पाण्याचा वापर करण्याची गरज असल्याचे आवाहन सुज्ञ नागरिकांमधून होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात गत काही दिवसापासून नागरिकांना कडक उन्हाचा फटका बसत आहे.उन्हाची तीव्रता वाढतच चालली असून प्रकल्पातील पाणीसाठा खालवत चालला आहे. विहिरी, नदया कोरड्याठण पडत आहेत. यामुळे जिल्ह्यावर भीषण पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे.पाण्याची भीषण टंचाई असतानाही पाणीपुरवठा विभागाला याचे काही सोयरसुतक वाटत नसल्यामुळे जनतेची पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे. काही गावांमध्ये मागासवर्गीय वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला असला तरी नदी, नाले, बंधारे, धरण हिवाळयामध्येच कोरडी पडली असून काही गावांमधील नागरिकांना दोन ते तीन किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून पाणलोट क्षेत्रविकास व मातीबांध, सिमेंट प्लग आदी उपाययोजना केल्यात. परंतु, या सर्व गोष्टींतून पाणी अडविण्याऐवजी शासनाचा निधी जिरविण्याचे काम झाल्यामुळे उपायोजना केवळ कागदापुरत्याच मयार्दीत आहेत. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पाच्या पाणी पातळीत घट झाली असून, गावातील हातपंप, विहरी कोरड्या पडत आहेत.नळ योजनेला अखेरची घरघरवषार्नूवषार्ची पाणीसमस्या निकाली काढण्यासाठी शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून उभ्या करण्यात आलेल्या जिल्हयातील पाणीपुरवठा योजना पुरेशा नियोजनाअभावी ओस पडल्या आहेत. पाणीपुरवढा योजनेमुळे गावातील पाणी समस्येचे निवारण होईल, अशी अपेक्षा टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना होती. मात्र, नागरिकांची समस्या निवारण्याऐवजी त्या आशेवर त्यांच्या नरडा पूर्णता: कोरडा झाला आहे. अनेक गावात पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. पाणीसमस्या निवारण्यासाठी उभारलेल्या बहुतांश प्रादेशिक पाणीपुरवठा नळ योजनेला अखेरची घरघर लागलेली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई