शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

मध्यम प्रकल्पांसह बारा प्रकल्पांत पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:35 IST

जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून विदर्भात ओळखला जातो. जवळपास ५ हजाराच्या जवळपास लहान मोठी तलावे आहेत. जिल्ह्यातील सर्वच तलाव कोरडी पडल्याने यंदा या जिल्ह्याला भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देसाठ्यात कमालीची घट : ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून विदर्भात ओळखला जातो. जवळपास ५ हजाराच्या जवळपास लहान मोठी तलावे आहेत. जिल्ह्यातील सर्वच तलाव कोरडी पडल्याने यंदा या जिल्ह्याला भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागल्याचे चित्र दिसून येत आहे.जिल्ह्यातील नदी, नाल्यासह विहीरीही पूर्णत: आटल्या आहेत. पाणी हे जीवन असून, त्याचा वापर योग्य पध्दतीने होण्याची नितांत गरज आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत गाव असो वा शहर सर्वत्रच पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची उपलब्धता कमी होते. त्यामुळे पाण्याचा होणारा दुरूपयोग टाळून काटकसरीने पाण्याचा वापर करण्याची गरज असल्याचे आवाहन सुज्ञ नागरिकांमधून होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात गत काही दिवसापासून नागरिकांना कडक उन्हाचा फटका बसत आहे.उन्हाची तीव्रता वाढतच चालली असून प्रकल्पातील पाणीसाठा खालवत चालला आहे. विहिरी, नदया कोरड्याठण पडत आहेत. यामुळे जिल्ह्यावर भीषण पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे.पाण्याची भीषण टंचाई असतानाही पाणीपुरवठा विभागाला याचे काही सोयरसुतक वाटत नसल्यामुळे जनतेची पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे. काही गावांमध्ये मागासवर्गीय वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला असला तरी नदी, नाले, बंधारे, धरण हिवाळयामध्येच कोरडी पडली असून काही गावांमधील नागरिकांना दोन ते तीन किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून पाणलोट क्षेत्रविकास व मातीबांध, सिमेंट प्लग आदी उपाययोजना केल्यात. परंतु, या सर्व गोष्टींतून पाणी अडविण्याऐवजी शासनाचा निधी जिरविण्याचे काम झाल्यामुळे उपायोजना केवळ कागदापुरत्याच मयार्दीत आहेत. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पाच्या पाणी पातळीत घट झाली असून, गावातील हातपंप, विहरी कोरड्या पडत आहेत.नळ योजनेला अखेरची घरघरवषार्नूवषार्ची पाणीसमस्या निकाली काढण्यासाठी शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून उभ्या करण्यात आलेल्या जिल्हयातील पाणीपुरवठा योजना पुरेशा नियोजनाअभावी ओस पडल्या आहेत. पाणीपुरवढा योजनेमुळे गावातील पाणी समस्येचे निवारण होईल, अशी अपेक्षा टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना होती. मात्र, नागरिकांची समस्या निवारण्याऐवजी त्या आशेवर त्यांच्या नरडा पूर्णता: कोरडा झाला आहे. अनेक गावात पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. पाणीसमस्या निवारण्यासाठी उभारलेल्या बहुतांश प्रादेशिक पाणीपुरवठा नळ योजनेला अखेरची घरघर लागलेली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई