शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

‘वॉटर मीटर’ने मिटविले गावातील तंटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 23:30 IST

पाण्याचा अपव्यय होऊ नये आणि पाण्यासाठी सार्वजनिक नळावर होणारे महिलांचे तंटे आता लाखनी तालुक्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने लावलेल्या ‘वॉटर मीटर’मुळे बंद झाले आहेत. परिणामी पाणीपट्टी कराची आकारणीही निम्म्यावर आली आहे.

ठळक मुद्देपाणीपट्टी निम्म्यावर : १५ ग्रामपंचायतीने घेतला पुढाकार

प्रशांत देसाई।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पाण्याचा अपव्यय होऊ नये आणि पाण्यासाठी सार्वजनिक नळावर होणारे महिलांचे तंटे आता लाखनी तालुक्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने लावलेल्या ‘वॉटर मीटर’मुळे बंद झाले आहेत. परिणामी पाणीपट्टी कराची आकारणीही निम्म्यावर आली आहे. यामुळे पाणी, विजेची बचत झाली आहे. सर्वांना समप्रमाणात पाण्याचे वितरण होत असल्याने १५ गावांचे ‘वॉटर मीटर’ दिशादर्शक ठरला आहे.लाखनी तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना शाश्वत व मुबलक पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे आहे. एकीकडे नगर पालिका हद्दीतील नळांना करण्यात आलेले ‘वॉटर मीटर’ व त्यातून होणारे पाण्याचे वितरण हे अनेक ठिकाणी बंद पडले आहे. अशावेळी ग्रामपंचायतींनी घेतलेल्या ‘वॉटर मीटर’च्या पुढाकारातून गावात नवचैतन्य येऊन नागरिकांसाठी ही सुविधा निर्माण झाली आहे. १४ व्या वित्त आयोगातून या ‘वॉटर मीटर’ची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. भंडारा जिल्ह्यात सात तालुके असताना हा प्रयोग केवळ लाखनी तालुक्यात यशस्वी झाला आहे. तो जिल्ह्यासह राज्यातील पालिकांसाठी आदर्शवत ठरणारा आहे.१५ ग्रामपंचायतींमधील ३ हजार १३९ कुटुंबांनी वॉटरमीटर लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अन्य ग्रामपंचायतींमध्ये पाण्याच्या अन्य प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. शिवनी ग्रामपंचायत ही सर्व नळधारकांना वॉटर मीटर लावणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.शासनाच्या धोरणानुसार दरदिवशी प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर याप्रमाणे पाण्याचा पुरवठा होतो. त्यासाठी प्रति युनिट सात रूपये आकारणी केली जाते. त्यामुळे एका कुटुंबाला महिन्याला ४२ रूपये पाणीपट्टी कर आकारण्यात येत आहे. ही आकारणी पाण्याच्या वापरावर अवलंबून आहे. पूर्वी वॉटर मीटर नसल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याने गावातील पाण्याची टाकी ३५ मिनिटात रिकामी होत होती. आता ती रिकामी होण्याला ७५ मिनिटांचा अवधी लागतो.सालेभाट्यात सार्वजनिक नळांना ‘वॉटर मीटर’सालेभाटा येथे ११ सार्वजनिक नळांना ‘वॉटर मीटर’ लावेले आहे. ज्या कुटुंबाकडे जागा किंवा नविन नळजोडणी करण्याची आर्थिक परिस्थिती नाही, अशा प्रत्येकी आठ ते १० कुटुंबांना ग्रामपंचायतीने करारनामा करून पाण्याचा लाभ दिला आहे. त्याकरिता मीटरच्या रिडिंगनुसार समप्रमाणात सामूहिकरित्या बील भरतात.‘वॉटर मीटर’चा खर्च अत्यल्पवीज व पाण्याच्या बचतीसह उंच सखल भागात समप्रमाणात पाणी वाटप व्हावे, यासाठी नळजोडणीला ‘वॉटर मीटर’ लावण्यात आले. यासाठी प्रति जोडणी १,८०० रूपये खर्च येतो. यात वॉटर मीटर, एक कॉक, अस्तित्वात असलेली जोडणी बंद करून नविन जोडणी व पाईप लावण्यात येतो.