शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

‘वॉटर मीटर’ने मिटविले गावातील तंटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 23:30 IST

पाण्याचा अपव्यय होऊ नये आणि पाण्यासाठी सार्वजनिक नळावर होणारे महिलांचे तंटे आता लाखनी तालुक्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने लावलेल्या ‘वॉटर मीटर’मुळे बंद झाले आहेत. परिणामी पाणीपट्टी कराची आकारणीही निम्म्यावर आली आहे.

ठळक मुद्देपाणीपट्टी निम्म्यावर : १५ ग्रामपंचायतीने घेतला पुढाकार

प्रशांत देसाई।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पाण्याचा अपव्यय होऊ नये आणि पाण्यासाठी सार्वजनिक नळावर होणारे महिलांचे तंटे आता लाखनी तालुक्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने लावलेल्या ‘वॉटर मीटर’मुळे बंद झाले आहेत. परिणामी पाणीपट्टी कराची आकारणीही निम्म्यावर आली आहे. यामुळे पाणी, विजेची बचत झाली आहे. सर्वांना समप्रमाणात पाण्याचे वितरण होत असल्याने १५ गावांचे ‘वॉटर मीटर’ दिशादर्शक ठरला आहे.लाखनी तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना शाश्वत व मुबलक पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे आहे. एकीकडे नगर पालिका हद्दीतील नळांना करण्यात आलेले ‘वॉटर मीटर’ व त्यातून होणारे पाण्याचे वितरण हे अनेक ठिकाणी बंद पडले आहे. अशावेळी ग्रामपंचायतींनी घेतलेल्या ‘वॉटर मीटर’च्या पुढाकारातून गावात नवचैतन्य येऊन नागरिकांसाठी ही सुविधा निर्माण झाली आहे. १४ व्या वित्त आयोगातून या ‘वॉटर मीटर’ची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. भंडारा जिल्ह्यात सात तालुके असताना हा प्रयोग केवळ लाखनी तालुक्यात यशस्वी झाला आहे. तो जिल्ह्यासह राज्यातील पालिकांसाठी आदर्शवत ठरणारा आहे.१५ ग्रामपंचायतींमधील ३ हजार १३९ कुटुंबांनी वॉटरमीटर लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अन्य ग्रामपंचायतींमध्ये पाण्याच्या अन्य प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. शिवनी ग्रामपंचायत ही सर्व नळधारकांना वॉटर मीटर लावणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.शासनाच्या धोरणानुसार दरदिवशी प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर याप्रमाणे पाण्याचा पुरवठा होतो. त्यासाठी प्रति युनिट सात रूपये आकारणी केली जाते. त्यामुळे एका कुटुंबाला महिन्याला ४२ रूपये पाणीपट्टी कर आकारण्यात येत आहे. ही आकारणी पाण्याच्या वापरावर अवलंबून आहे. पूर्वी वॉटर मीटर नसल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याने गावातील पाण्याची टाकी ३५ मिनिटात रिकामी होत होती. आता ती रिकामी होण्याला ७५ मिनिटांचा अवधी लागतो.सालेभाट्यात सार्वजनिक नळांना ‘वॉटर मीटर’सालेभाटा येथे ११ सार्वजनिक नळांना ‘वॉटर मीटर’ लावेले आहे. ज्या कुटुंबाकडे जागा किंवा नविन नळजोडणी करण्याची आर्थिक परिस्थिती नाही, अशा प्रत्येकी आठ ते १० कुटुंबांना ग्रामपंचायतीने करारनामा करून पाण्याचा लाभ दिला आहे. त्याकरिता मीटरच्या रिडिंगनुसार समप्रमाणात सामूहिकरित्या बील भरतात.‘वॉटर मीटर’चा खर्च अत्यल्पवीज व पाण्याच्या बचतीसह उंच सखल भागात समप्रमाणात पाणी वाटप व्हावे, यासाठी नळजोडणीला ‘वॉटर मीटर’ लावण्यात आले. यासाठी प्रति जोडणी १,८०० रूपये खर्च येतो. यात वॉटर मीटर, एक कॉक, अस्तित्वात असलेली जोडणी बंद करून नविन जोडणी व पाईप लावण्यात येतो.