शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
3
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
4
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
5
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
6
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
7
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
8
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
9
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
10
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
11
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
12
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
13
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
14
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
15
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
16
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
17
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
18
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
19
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
20
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?

‘वॉटर मीटर’ने मिटविले गावातील तंटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 23:30 IST

पाण्याचा अपव्यय होऊ नये आणि पाण्यासाठी सार्वजनिक नळावर होणारे महिलांचे तंटे आता लाखनी तालुक्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने लावलेल्या ‘वॉटर मीटर’मुळे बंद झाले आहेत. परिणामी पाणीपट्टी कराची आकारणीही निम्म्यावर आली आहे.

ठळक मुद्देपाणीपट्टी निम्म्यावर : १५ ग्रामपंचायतीने घेतला पुढाकार

प्रशांत देसाई।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पाण्याचा अपव्यय होऊ नये आणि पाण्यासाठी सार्वजनिक नळावर होणारे महिलांचे तंटे आता लाखनी तालुक्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने लावलेल्या ‘वॉटर मीटर’मुळे बंद झाले आहेत. परिणामी पाणीपट्टी कराची आकारणीही निम्म्यावर आली आहे. यामुळे पाणी, विजेची बचत झाली आहे. सर्वांना समप्रमाणात पाण्याचे वितरण होत असल्याने १५ गावांचे ‘वॉटर मीटर’ दिशादर्शक ठरला आहे.लाखनी तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना शाश्वत व मुबलक पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे आहे. एकीकडे नगर पालिका हद्दीतील नळांना करण्यात आलेले ‘वॉटर मीटर’ व त्यातून होणारे पाण्याचे वितरण हे अनेक ठिकाणी बंद पडले आहे. अशावेळी ग्रामपंचायतींनी घेतलेल्या ‘वॉटर मीटर’च्या पुढाकारातून गावात नवचैतन्य येऊन नागरिकांसाठी ही सुविधा निर्माण झाली आहे. १४ व्या वित्त आयोगातून या ‘वॉटर मीटर’ची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. भंडारा जिल्ह्यात सात तालुके असताना हा प्रयोग केवळ लाखनी तालुक्यात यशस्वी झाला आहे. तो जिल्ह्यासह राज्यातील पालिकांसाठी आदर्शवत ठरणारा आहे.१५ ग्रामपंचायतींमधील ३ हजार १३९ कुटुंबांनी वॉटरमीटर लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अन्य ग्रामपंचायतींमध्ये पाण्याच्या अन्य प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. शिवनी ग्रामपंचायत ही सर्व नळधारकांना वॉटर मीटर लावणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.शासनाच्या धोरणानुसार दरदिवशी प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर याप्रमाणे पाण्याचा पुरवठा होतो. त्यासाठी प्रति युनिट सात रूपये आकारणी केली जाते. त्यामुळे एका कुटुंबाला महिन्याला ४२ रूपये पाणीपट्टी कर आकारण्यात येत आहे. ही आकारणी पाण्याच्या वापरावर अवलंबून आहे. पूर्वी वॉटर मीटर नसल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याने गावातील पाण्याची टाकी ३५ मिनिटात रिकामी होत होती. आता ती रिकामी होण्याला ७५ मिनिटांचा अवधी लागतो.सालेभाट्यात सार्वजनिक नळांना ‘वॉटर मीटर’सालेभाटा येथे ११ सार्वजनिक नळांना ‘वॉटर मीटर’ लावेले आहे. ज्या कुटुंबाकडे जागा किंवा नविन नळजोडणी करण्याची आर्थिक परिस्थिती नाही, अशा प्रत्येकी आठ ते १० कुटुंबांना ग्रामपंचायतीने करारनामा करून पाण्याचा लाभ दिला आहे. त्याकरिता मीटरच्या रिडिंगनुसार समप्रमाणात सामूहिकरित्या बील भरतात.‘वॉटर मीटर’चा खर्च अत्यल्पवीज व पाण्याच्या बचतीसह उंच सखल भागात समप्रमाणात पाणी वाटप व्हावे, यासाठी नळजोडणीला ‘वॉटर मीटर’ लावण्यात आले. यासाठी प्रति जोडणी १,८०० रूपये खर्च येतो. यात वॉटर मीटर, एक कॉक, अस्तित्वात असलेली जोडणी बंद करून नविन जोडणी व पाईप लावण्यात येतो.