शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

वैनगंगा नदीत वाहते दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 22:38 IST

पवित्र आणि जीवनदायी असलेली वैनगंगा नदीत आता अशुध्द पाणी दुर्गंधीयुक्त पाणी वाहू लागले आहे. गत काही वर्षांपासून नागपूरातून वाहणाऱ्या नाग नदीच्या प्रवाहासोबत रसायनयुक्त आणि मलमुत्राचे पाणी वैनगंगेत येत आहे. परिणामी आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शेती आणि फळबागानाही त्याचा फटका बसत आहे. हा सर्व प्रकार माहित असतानाही नदी शुध्दीकरणासाठी कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही.

ठळक मुद्देनाग नदीचा फटका : आरोग्यासह पिकांवरही परिणाम

अशोक पारधी।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : पवित्र आणि जीवनदायी असलेली वैनगंगा नदीत आता अशुध्द पाणी दुर्गंधीयुक्त पाणी वाहू लागले आहे. गत काही वर्षांपासून नागपूरातून वाहणाऱ्या नाग नदीच्या प्रवाहासोबत रसायनयुक्त आणि मलमुत्राचे पाणी वैनगंगेत येत आहे. परिणामी आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शेती आणि फळबागानाही त्याचा फटका बसत आहे. हा सर्व प्रकार माहित असतानाही नदी शुध्दीकरणासाठी कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही.भंडारा जिल्ह्याला सुपिक करणारी वैनगंगा नदीचे विशाल पात्र आहे. बारमाही वाहणारी या नदीमुळे जिल्ह्यात समृध्दी आली. वैनगंगेच्या तिरावर धान शेती फुलली. फळबागा व इतर पिकेही मोठ्या प्रमाणात होवू लागली. जणू वैनगंगा भंडारा जिल्ह्याची जीवनदायीनी ठरली. मात्र गत काही वर्षांपासून वैनगंगेत अशुध्द पाणी येऊन मिळत आहे. गोसेखुर्द प्रकल्प झाल्यापासून त्यात आणखी भर पडली. नागपूरातून वाहणारी नाग नदी आंभोराजवळ वैनगंगेला मिळते. नागपूरातून वाहत येणाºया नागनदीत मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त व मलमुत्राचे पाणी असते. तेच पाणी वैनगंगेच्या पाण्यात मिसळून अशुध्द आणि दुर्गंधी युक्त होत आहे. राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणात पाणी साठते. धरणातील दुषीत पाणी वैनगंगा नदी पात्रात डाव्या, उजव्या कालव्याच्या माध्यमातून नागरिकांना पिण्यासाठी व शेती उपयोगासाठी सोडले जाते. तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भंडारा शहरासह अनेक गावांनाही या दुषीत पाण्याचा फटका सहन करावा लागतो. दुर्गंधीयुक्त पाण्यामध्ये नागपुरातील विविध कारखान्यातील रसायने असतात. या रसायनाचा परिणाम मानवी जीवनावर होऊ शकतो. परंतु याकडे अद्यापपर्यंत कुणाचेही लक्ष नाही. नदी पात्रातील पाणी प्रयोगशाळेत पाठविल्यास हा प्रकार उघडकीस येवू शकतो. परंतु यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही. शुध्द पाण्यासाठी नागरिक प्रशासनाच्या नावाने ओरड करीत आहेत. परंतु कोणत्याही उपाययोजना होत नाही. शेतातील पिकेही या पाण्यामुळे रोगग्रस्त होत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींना सांगुनही उपयोग झाला नाही.नाग नदीचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यापुर्वी ते शुध्द करण्यात यावे, किंवा नदीजवळ प्रकल्पाअंतर्गत नाग नदीचे प्रवाह इतरत्र वळून दुषीत होणाऱ्या वैनगंगेला वाचविता येवू शकते. यासाठी गरज आहे ते इच्छाशक्तीची.युवाशक्ती संघटनेचे अर्धदफन आंदोलनवैनगंगा नदीच्या शुध्दीकरणासाठी पवनी येथील युवाशक्ती संघटनेच्या वतीने अर्धदफन आंदोलन महिन्याभरापुर्वी करण्यात आले होते. तरुणांनी वैनगंगेच्या नदीपात्रात स्वत:ला अर्धेअधिक गाडून घेतले होते. या आंदोलनानंतर वैनगंगा शुध्दीकरणाचा प्रश्न एरणीवर येईल असे वाटत होते. परंतु प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. आजही दररोज लाखो लिटर अशुध्द पाणी नागनदीच्या माध्यमातून गोसे प्रकल्पात साचले जात आहे.विविध आजाराला आमंत्रणरसायनयुक्त आणि मलमुत्राचे पाणी नकळत नागरिकांपर्यंत पोहचत असल्याने आजाराला आमंत्रण मिळत आहे. खाजेसह विषाणुजन्य आजार आणि डायरिया नदीतिरावरील अनेक गावांमध्ये दिसून येत आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पवनी परिसरातील अशा रुग्णांची संख्या मोठी असते. आजारावर उपचार करताना नागरिकांच्या नाकीनऊ आले आहे. गावागावांत वैनगंगेच्या दुषित पाण्यामुळे रुग्ण दिसत आहे. आरोग्याच्या समस्येकडे लक्ष देण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आहे.