शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नासाडी पाण्याची; प्रकल्पातून सोडलेला प्रवाह जातो थेट रेतीच्या खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 11:47 IST

भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नदीपात्रात सोडलेले पाणी रेती उत्खननासाठी खोदलेल्या खड्ड्यातच जिरत असल्याने वैनगंगा नदी तीरावरील पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींमध्ये ठणठणाट झाला आहे.

ठळक मुद्देवैनगंगा तीरावरील पाणीपुरवठा विहिरी कोरड्या

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नदीपात्रात सोडलेले पाणी रेती उत्खननासाठी खोदलेल्या खड्ड्यातच जिरत असल्याने वैनगंगा नदी तीरावरील पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींमध्ये ठणठणाट झाला आहे. बावनथडी प्रकल्पाचे २० दलघमी पाणी सोडल्यानंतरही वैनगंगेचे पात्र वाळवंटासारखे भासत आहे. परिणामी गावागावांत पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. रेती उत्खननावर कोणतेही निर्बंध नसल्याने त्याचा अप्रत्यक्ष परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.भंडारा जिल्ह्याची जीवनदायी वैनगंगा नदी तापत्या उन्हामुळे कोरडी पडली आहे. त्यामुळे नदी तीरावरील गावात पाण्यासाठी हाहाकार निर्माण झाला आहे. आंतरराज्यीय प्रकल्प असलेल्या बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी नागरिक करीत होते. त्यावरून २३ एप्रिल ते १० मे पर्यंत बावनथडी प्रकल्पातून २० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले. परंतु या पाण्याचा हवा तसा फायदाच झाला नाही. प्रकल्पातून सोडलेले पाणी वैनगंगेच्या पात्रात सोडलेले पाणी रेती उत्खननासाठी खोदलेल्या खड्ड्यातच जिरले. सध्या नदीपात्र पुन्हा वाळवंट झाले आहे.कवलेवाडा बॅरेजमधून वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या बॅरेजमधून तिरोडा तालुक्यातील अदानी वीज प्रकल्प आणि सिंचन प्रकल्पाला पाणी देण्यात येते. उन्हाळ्यात बावनथडी प्रकल्पातून महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील गावांसाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. बावनथडी नदी बपेराजवळ वैनगंगेला येवून मिळते. कोरड्या पडलेल्या नदीपात्रात धरणातून पाणी विसर्ग केल्यानंतर कोरडी नदी पाणी गिळंकृत करीत आहे. रेती उपस्याच्या खड्ड्यात पाणी भरले जात आहे. त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचतच नाही. पावसाळा लांबल्यास वैनगंगा नदीतिरावर असलेल्या पाणीपुरवठा योजना बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीटंचाईला रेती उत्खननही कारणीभूत असल्याचे या प्रकाराने सिद्ध होत आहे. मात्र कुणीही या गंभीर विषयाकडे पहायला तयार नाही.बावनथडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. २० दलघमी पाणी सोडण्यात आले. परंतु आता बावनथडी प्रकल्पात केवळ मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यानंतर पाण्याचा विसर्ग केला जावू शकत नाही.-आर. आर. बडोले, अभियंता, बावनथडी प्रकल्प, तुमसर.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई