शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
4
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
5
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
6
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
7
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
8
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
9
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
10
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
11
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
12
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
14
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
15
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
16
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
17
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
18
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
19
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
20
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...

नासाडी पाण्याची; प्रकल्पातून सोडलेला प्रवाह जातो थेट रेतीच्या खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 11:47 IST

भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नदीपात्रात सोडलेले पाणी रेती उत्खननासाठी खोदलेल्या खड्ड्यातच जिरत असल्याने वैनगंगा नदी तीरावरील पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींमध्ये ठणठणाट झाला आहे.

ठळक मुद्देवैनगंगा तीरावरील पाणीपुरवठा विहिरी कोरड्या

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नदीपात्रात सोडलेले पाणी रेती उत्खननासाठी खोदलेल्या खड्ड्यातच जिरत असल्याने वैनगंगा नदी तीरावरील पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींमध्ये ठणठणाट झाला आहे. बावनथडी प्रकल्पाचे २० दलघमी पाणी सोडल्यानंतरही वैनगंगेचे पात्र वाळवंटासारखे भासत आहे. परिणामी गावागावांत पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. रेती उत्खननावर कोणतेही निर्बंध नसल्याने त्याचा अप्रत्यक्ष परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.भंडारा जिल्ह्याची जीवनदायी वैनगंगा नदी तापत्या उन्हामुळे कोरडी पडली आहे. त्यामुळे नदी तीरावरील गावात पाण्यासाठी हाहाकार निर्माण झाला आहे. आंतरराज्यीय प्रकल्प असलेल्या बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी नागरिक करीत होते. त्यावरून २३ एप्रिल ते १० मे पर्यंत बावनथडी प्रकल्पातून २० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले. परंतु या पाण्याचा हवा तसा फायदाच झाला नाही. प्रकल्पातून सोडलेले पाणी वैनगंगेच्या पात्रात सोडलेले पाणी रेती उत्खननासाठी खोदलेल्या खड्ड्यातच जिरले. सध्या नदीपात्र पुन्हा वाळवंट झाले आहे.कवलेवाडा बॅरेजमधून वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या बॅरेजमधून तिरोडा तालुक्यातील अदानी वीज प्रकल्प आणि सिंचन प्रकल्पाला पाणी देण्यात येते. उन्हाळ्यात बावनथडी प्रकल्पातून महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील गावांसाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. बावनथडी नदी बपेराजवळ वैनगंगेला येवून मिळते. कोरड्या पडलेल्या नदीपात्रात धरणातून पाणी विसर्ग केल्यानंतर कोरडी नदी पाणी गिळंकृत करीत आहे. रेती उपस्याच्या खड्ड्यात पाणी भरले जात आहे. त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचतच नाही. पावसाळा लांबल्यास वैनगंगा नदीतिरावर असलेल्या पाणीपुरवठा योजना बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीटंचाईला रेती उत्खननही कारणीभूत असल्याचे या प्रकाराने सिद्ध होत आहे. मात्र कुणीही या गंभीर विषयाकडे पहायला तयार नाही.बावनथडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. २० दलघमी पाणी सोडण्यात आले. परंतु आता बावनथडी प्रकल्पात केवळ मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यानंतर पाण्याचा विसर्ग केला जावू शकत नाही.-आर. आर. बडोले, अभियंता, बावनथडी प्रकल्प, तुमसर.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई