शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

नासाडी पाण्याची; प्रकल्पातून सोडलेला प्रवाह जातो थेट रेतीच्या खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 11:47 IST

भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नदीपात्रात सोडलेले पाणी रेती उत्खननासाठी खोदलेल्या खड्ड्यातच जिरत असल्याने वैनगंगा नदी तीरावरील पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींमध्ये ठणठणाट झाला आहे.

ठळक मुद्देवैनगंगा तीरावरील पाणीपुरवठा विहिरी कोरड्या

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नदीपात्रात सोडलेले पाणी रेती उत्खननासाठी खोदलेल्या खड्ड्यातच जिरत असल्याने वैनगंगा नदी तीरावरील पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींमध्ये ठणठणाट झाला आहे. बावनथडी प्रकल्पाचे २० दलघमी पाणी सोडल्यानंतरही वैनगंगेचे पात्र वाळवंटासारखे भासत आहे. परिणामी गावागावांत पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. रेती उत्खननावर कोणतेही निर्बंध नसल्याने त्याचा अप्रत्यक्ष परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.भंडारा जिल्ह्याची जीवनदायी वैनगंगा नदी तापत्या उन्हामुळे कोरडी पडली आहे. त्यामुळे नदी तीरावरील गावात पाण्यासाठी हाहाकार निर्माण झाला आहे. आंतरराज्यीय प्रकल्प असलेल्या बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी नागरिक करीत होते. त्यावरून २३ एप्रिल ते १० मे पर्यंत बावनथडी प्रकल्पातून २० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले. परंतु या पाण्याचा हवा तसा फायदाच झाला नाही. प्रकल्पातून सोडलेले पाणी वैनगंगेच्या पात्रात सोडलेले पाणी रेती उत्खननासाठी खोदलेल्या खड्ड्यातच जिरले. सध्या नदीपात्र पुन्हा वाळवंट झाले आहे.कवलेवाडा बॅरेजमधून वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या बॅरेजमधून तिरोडा तालुक्यातील अदानी वीज प्रकल्प आणि सिंचन प्रकल्पाला पाणी देण्यात येते. उन्हाळ्यात बावनथडी प्रकल्पातून महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील गावांसाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. बावनथडी नदी बपेराजवळ वैनगंगेला येवून मिळते. कोरड्या पडलेल्या नदीपात्रात धरणातून पाणी विसर्ग केल्यानंतर कोरडी नदी पाणी गिळंकृत करीत आहे. रेती उपस्याच्या खड्ड्यात पाणी भरले जात आहे. त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचतच नाही. पावसाळा लांबल्यास वैनगंगा नदीतिरावर असलेल्या पाणीपुरवठा योजना बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीटंचाईला रेती उत्खननही कारणीभूत असल्याचे या प्रकाराने सिद्ध होत आहे. मात्र कुणीही या गंभीर विषयाकडे पहायला तयार नाही.बावनथडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. २० दलघमी पाणी सोडण्यात आले. परंतु आता बावनथडी प्रकल्पात केवळ मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यानंतर पाण्याचा विसर्ग केला जावू शकत नाही.-आर. आर. बडोले, अभियंता, बावनथडी प्रकल्प, तुमसर.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई