शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

सावधान, भंडारा शहरात पाण्याची पातळी खालावतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:53 IST

शहरातील पाण्याची समस्या हा काही नवीन विषय नसला तरी भविष्यकालीन समस्येला आव्हान देणारा ज्वलंत प्रश्न बनला आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून भंडारा शहराचा जलस्तर सातत्याने घटत असून यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देउपाय योजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष । जलपुनर्रभरणावर लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील पाण्याची समस्या हा काही नवीन विषय नसला तरी भविष्यकालीन समस्येला आव्हान देणारा ज्वलंत प्रश्न बनला आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून भंडारा शहराचा जलस्तर सातत्याने घटत असून यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. ऐकेकाळी भंडारा जिल्ह्यात १५ हजारांपेक्षा जास्त तलाव व बोड्यांची संख्या होती. मात्र आज घडीला भंडारा व गोंदिया जिल्ह्यात तीन हजार ५०० पेक्षा अधिक तलाव व बोडी आहेत. त्यातही अतिक्रमण,निधीचा वानवा व अन्य स्थानिक समस्या भर घालून आहेत. भंडारा शहरातील खामतलाव या तलावाची स्थितीही फारशी चांगली नाही. एकेकाळी पाण्याच्या बाबतीत समृद्ध असलेला खामतलावही समस्येच्या गर्तेत सापडला आहे. या तलावात पाणी साठा असल्याने परिसरातील भागातही जलसाठा विपूल प्रमाणात राहायचा. मात्र कालांतराने तलावाची खोलीकरण व अन्य बाबींमुळे पाणीसाठा कमी झाला आहे. तर दुसरीकडे भूगर्भाची पातळीही खालावल्याने परिसरातील विहिरी विंधन विहिरी व बोअरवेलची पातळीही खाली गेली आहे. त्यामुळे उन्हाळ्यासह ऐन पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी चिंतेत राहावे लागत आहे. ८०-९० फुटांवर पाणी लागत असल्याने नागरिक बोअरवेल कमी खोदायचे. मात्र विद्यमान स्थितीत अडीचशे ते तीनशे फुट बोअर करावी लागत आहे. असाच प्रत्यय भंडारा शहरातील अन्य भागांमध्येही दिसू लागला आहे.पाण्याची पातळी खालावत असल्याने पाण्याच्या बाबतीत भंडारा शहरातील भविष्य संकटमय दिसत आहे. परिणामी आजपासूनच यावर कायमस्वरुपी तोडगा काढून जलपुनर्भरणावर लक्ष केंद्रीत करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तरच भविष्यकालीन पिढीला त्याचा उपयोग होऊ शकेल. नदीत पाणी व गावात बोंब अशी विचित्र स्थिती होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात