शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

सावधान, भंडारा शहरात पाण्याची पातळी खालावतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:53 IST

शहरातील पाण्याची समस्या हा काही नवीन विषय नसला तरी भविष्यकालीन समस्येला आव्हान देणारा ज्वलंत प्रश्न बनला आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून भंडारा शहराचा जलस्तर सातत्याने घटत असून यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देउपाय योजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष । जलपुनर्रभरणावर लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील पाण्याची समस्या हा काही नवीन विषय नसला तरी भविष्यकालीन समस्येला आव्हान देणारा ज्वलंत प्रश्न बनला आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून भंडारा शहराचा जलस्तर सातत्याने घटत असून यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. ऐकेकाळी भंडारा जिल्ह्यात १५ हजारांपेक्षा जास्त तलाव व बोड्यांची संख्या होती. मात्र आज घडीला भंडारा व गोंदिया जिल्ह्यात तीन हजार ५०० पेक्षा अधिक तलाव व बोडी आहेत. त्यातही अतिक्रमण,निधीचा वानवा व अन्य स्थानिक समस्या भर घालून आहेत. भंडारा शहरातील खामतलाव या तलावाची स्थितीही फारशी चांगली नाही. एकेकाळी पाण्याच्या बाबतीत समृद्ध असलेला खामतलावही समस्येच्या गर्तेत सापडला आहे. या तलावात पाणी साठा असल्याने परिसरातील भागातही जलसाठा विपूल प्रमाणात राहायचा. मात्र कालांतराने तलावाची खोलीकरण व अन्य बाबींमुळे पाणीसाठा कमी झाला आहे. तर दुसरीकडे भूगर्भाची पातळीही खालावल्याने परिसरातील विहिरी विंधन विहिरी व बोअरवेलची पातळीही खाली गेली आहे. त्यामुळे उन्हाळ्यासह ऐन पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी चिंतेत राहावे लागत आहे. ८०-९० फुटांवर पाणी लागत असल्याने नागरिक बोअरवेल कमी खोदायचे. मात्र विद्यमान स्थितीत अडीचशे ते तीनशे फुट बोअर करावी लागत आहे. असाच प्रत्यय भंडारा शहरातील अन्य भागांमध्येही दिसू लागला आहे.पाण्याची पातळी खालावत असल्याने पाण्याच्या बाबतीत भंडारा शहरातील भविष्य संकटमय दिसत आहे. परिणामी आजपासूनच यावर कायमस्वरुपी तोडगा काढून जलपुनर्भरणावर लक्ष केंद्रीत करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तरच भविष्यकालीन पिढीला त्याचा उपयोग होऊ शकेल. नदीत पाणी व गावात बोंब अशी विचित्र स्थिती होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात