शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग की वॉर्ड?

By admin | Updated: July 23, 2015 00:25 IST

नगरपालिकांमध्ये राबवली जाणारी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करून एका वॉडार्तून एकच नगरसेवक निवडून देण्याची...

नगरसेवक संभ्रमातअध्यादेश अद्याप जारी नाही : सहा महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळाचा निर्णयभंडारा : नगरपालिकांमध्ये राबवली जाणारी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करून एका वॉडार्तून एकच नगरसेवक निवडून देण्याची जुनी पद्धत पुन्हा अंमलात आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने सहा महिन्यांपूर्वी हिवाळी अधिवेशन काळात घेतला होता. मात्र, या निर्णयाचा अध्यादेश अद्याप जारी झालेला नाही. त्यामुळे नगरपालिकेची आगामी निवडणूक वॉर्ड पद्धतीने होणार की प्रभाग पद्धतीने, असा संभ्रम विद्यमान नगरसेवक व इच्छुक उमेदवारांमध्ये निर्माण झाला आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी वॉर्डनिहाय निवडणूक पद्धत बंद करून एका प्रभागातून दोन-तीन नगरसेवक निवडून देण्याची पद्धत सुरू केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण लागू केल्यानंतरही वॉर्ड रचनेच्या थेट निवडणुकीत महिला उमेदवार पराभूत होतात. त्यामुळे महिलांचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील प्रमाण वाढवण्याकरिता प्रभाग रचनेचा निर्णय झाला होता. मात्र मागील १0 वर्षांत विविध नगरपालिकांमध्ये एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडून येत असल्याने, त्या प्रभागांची जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. राज्य सरकारने पुन्हा जुनी वॉर्ड पद्धत अंमलात आणण्याचे ठरवले व मंत्रिमंडळात तसा निर्णयही घेतला. यामुळे एका वॉडार्तून एकच नगरसेवक निवडून येईल व जनतेला नागरी सुविधा पुरवण्यास बांधील राहील. नगर पालिकांमधील नगरसेवकांनी प्रभाग रचनेची पद्धत बंद करण्याची मागणी केली होती. मागील काँग्रेस सरकारच्या काळात तसा प्रस्ताव तयार झाला होता. मात्र त्या सरकारने निर्णय घेतला नव्हता. आता भाजप सरकारने निर्णय घेतला, पण अध्यादेश जारी केलेला नाही. (जिल्हा प्रतिनिधी) राज्य शासनाने वॉर्डनिहाय निवडणुका घेण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेतला आहे. परंतु अद्याप अध्यादेश आलेले नाहीत. भंडारा जिल्ह्यात २०१७ मध्ये निवडणूक होणार आहे. शासनाकडून अध्यादेश येताच त्यांच्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल. - रविंद्र देवतळे,मुख्याधिकारी, भंडारा. वॉर्ड पद्धतीत गटबाजीचा धोकागटबाजी व असंतुष्टांच्या बंडखोरीमुळे वॉर्ड पद्धतीत काँग्रेसला धक्का बसायचा. त्यामुळे प्रभाग पद्धत केली तर क्षेत्र वाढेल व बंडखोरीचा फटका बसणार नाही, हा प्रभाग पद्धत लागू करण्यामागे काँग्रेसचा हेतू होता. मात्र आता उलट परिस्थिती भाजपमध्ये निर्माण झाली नाही. पक्ष वाढला आहे. पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंगही झाले आहे. प्रत्येक वॉर्डात निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांची मोठी फौज भाजपकडे आहे. यामुळे वॉर्ड पद्धतीने निवडणूक झाल्यास मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याचा धोका आहे.