शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

प्रभाग की वॉर्ड?

By admin | Updated: July 23, 2015 00:25 IST

नगरपालिकांमध्ये राबवली जाणारी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करून एका वॉडार्तून एकच नगरसेवक निवडून देण्याची...

नगरसेवक संभ्रमातअध्यादेश अद्याप जारी नाही : सहा महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळाचा निर्णयभंडारा : नगरपालिकांमध्ये राबवली जाणारी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करून एका वॉडार्तून एकच नगरसेवक निवडून देण्याची जुनी पद्धत पुन्हा अंमलात आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने सहा महिन्यांपूर्वी हिवाळी अधिवेशन काळात घेतला होता. मात्र, या निर्णयाचा अध्यादेश अद्याप जारी झालेला नाही. त्यामुळे नगरपालिकेची आगामी निवडणूक वॉर्ड पद्धतीने होणार की प्रभाग पद्धतीने, असा संभ्रम विद्यमान नगरसेवक व इच्छुक उमेदवारांमध्ये निर्माण झाला आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी वॉर्डनिहाय निवडणूक पद्धत बंद करून एका प्रभागातून दोन-तीन नगरसेवक निवडून देण्याची पद्धत सुरू केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण लागू केल्यानंतरही वॉर्ड रचनेच्या थेट निवडणुकीत महिला उमेदवार पराभूत होतात. त्यामुळे महिलांचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील प्रमाण वाढवण्याकरिता प्रभाग रचनेचा निर्णय झाला होता. मात्र मागील १0 वर्षांत विविध नगरपालिकांमध्ये एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडून येत असल्याने, त्या प्रभागांची जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. राज्य सरकारने पुन्हा जुनी वॉर्ड पद्धत अंमलात आणण्याचे ठरवले व मंत्रिमंडळात तसा निर्णयही घेतला. यामुळे एका वॉडार्तून एकच नगरसेवक निवडून येईल व जनतेला नागरी सुविधा पुरवण्यास बांधील राहील. नगर पालिकांमधील नगरसेवकांनी प्रभाग रचनेची पद्धत बंद करण्याची मागणी केली होती. मागील काँग्रेस सरकारच्या काळात तसा प्रस्ताव तयार झाला होता. मात्र त्या सरकारने निर्णय घेतला नव्हता. आता भाजप सरकारने निर्णय घेतला, पण अध्यादेश जारी केलेला नाही. (जिल्हा प्रतिनिधी) राज्य शासनाने वॉर्डनिहाय निवडणुका घेण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेतला आहे. परंतु अद्याप अध्यादेश आलेले नाहीत. भंडारा जिल्ह्यात २०१७ मध्ये निवडणूक होणार आहे. शासनाकडून अध्यादेश येताच त्यांच्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल. - रविंद्र देवतळे,मुख्याधिकारी, भंडारा. वॉर्ड पद्धतीत गटबाजीचा धोकागटबाजी व असंतुष्टांच्या बंडखोरीमुळे वॉर्ड पद्धतीत काँग्रेसला धक्का बसायचा. त्यामुळे प्रभाग पद्धत केली तर क्षेत्र वाढेल व बंडखोरीचा फटका बसणार नाही, हा प्रभाग पद्धत लागू करण्यामागे काँग्रेसचा हेतू होता. मात्र आता उलट परिस्थिती भाजपमध्ये निर्माण झाली नाही. पक्ष वाढला आहे. पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंगही झाले आहे. प्रत्येक वॉर्डात निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांची मोठी फौज भाजपकडे आहे. यामुळे वॉर्ड पद्धतीने निवडणूक झाल्यास मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याचा धोका आहे.