शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

वैनगंगेने केली ४२ हेक्टर शेती गिळंकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST

तुमसर तालुक्यातून विशालपात्र असलेली वैनगंगा नदी वाहते. या नदीच्या तिरावर अनेक गावे आहेत. त्यापैकी बपेरा, रेेंगेपार, मांडवी, उमरवाडा, बोरी, कोष्टी, ब्राम्हणी, चारगाव, ढोरवाडा या गावातील नदीतीरावरील शेतजमीन नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. शासन दरबारी ४२ हेक्टर शेती गिळंकृत झाल्याची नोंद आहे. राज्य शासनाने सुमारे १५ वर्षापुर्वी याची दखल घेतली होती. परंतु कागदी घोडे नाचविण्यापलिकडे दुसरे काहीही झाले नाही.

ठळक मुद्देरेती उपस्याचा परिणाम : १५ वर्षांपासून नदीचा प्रवाह गावाच्या दिशेने, संरक्षक भिंतीची गरज

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातून वाहणाऱ्या जीवनदायी वैनगंगा नदीत बेसुमार रेतीचे उत्खनन सुरू असून यामुळे नदीचा प्रवाह गावाच्या दिशेने वाहत आहे. नदीतीरावरील सुमारे १० ते १२ गावातील ४२ हेक्टर शेतजमीन वैनगंगेने गिळंकृत केली आहे. या शेतकऱ्यांना अद्याप कोणताही मोबदला मिळाला नाही. तसेच संरक्षक भिंतीसाठीही कोणत्याच उपाययोजना करण्यात आल्या नाही.तुमसर तालुक्यातून विशालपात्र असलेली वैनगंगा नदी वाहते. या नदीच्या तिरावर अनेक गावे आहेत. त्यापैकी बपेरा, रेेंगेपार, मांडवी, उमरवाडा, बोरी, कोष्टी, ब्राम्हणी, चारगाव, ढोरवाडा या गावातील नदीतीरावरील शेतजमीन नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. शासन दरबारी ४२ हेक्टर शेती गिळंकृत झाल्याची नोंद आहे. राज्य शासनाने सुमारे १५ वर्षापुर्वी याची दखल घेतली होती. परंतु कागदी घोडे नाचविण्यापलिकडे दुसरे काहीही झाले नाही.अलिकडे वैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमा नदीने ठरल्या आहेत. दोन्ही जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव केले जाते. वाहतुकीसाठी सोयीस्कर व्हावे म्हणून नदीची नैसर्गिंक संरक्षक भिंत थडी खचविली जात आहे. तसेच नदीपात्रात मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असल्याने नदीचा प्रवाह बदलत आहे. परिणामी नदी गावाच्या दिशेने वाहत आहे. नदीकाठावरील गावातील सुपीक व गाळाची जमीन नदीने गिळंकृत केली आहे. पाणीपुरवठा योजना विहिरी जलकुंभाला जलसमाधी मिळाली आहे.संरक्षक भिंतीवर कोट्यवधींचा खर्च अपेक्षिततुमसर तालुक्यातील नदीकाठावरील गावशिवारातील शेती गिळंकृत होवू नये, यासाठी संरक्षक भिंती बांधण्याची गरज आहे. मात्र त्यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकार व राज्य शासनाकडून निधी मिळावा लागणार आहे. परंतु याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. काही वर्षांपुर्वी राज्य शासनाने या गावांचे सर्व्हेक्षण करून अहवाल शासनाला पाठविला आहे. त्यावर कोणत्याच उपाय योजना करण्यात आल्या नाही.तीरावरील शेती नदीपात्र गिळंकृत करीत आहे. पुढे नदीचा प्रवाह गावाच्या दिशेने येत आहे. गावाला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. शासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.-शिशुपाल गौपाले, उपसभापती पंचायत समिती, तुमसर.

टॅग्स :riverनदी