शहरं
Join us  
Trending Stories
1
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
2
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
3
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
4
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
5
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
6
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
7
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
8
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
9
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
10
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
11
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
12
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
13
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
14
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
15
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
16
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
17
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
18
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
19
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
20
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेने केली ४२ हेक्टर शेती गिळंकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST

तुमसर तालुक्यातून विशालपात्र असलेली वैनगंगा नदी वाहते. या नदीच्या तिरावर अनेक गावे आहेत. त्यापैकी बपेरा, रेेंगेपार, मांडवी, उमरवाडा, बोरी, कोष्टी, ब्राम्हणी, चारगाव, ढोरवाडा या गावातील नदीतीरावरील शेतजमीन नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. शासन दरबारी ४२ हेक्टर शेती गिळंकृत झाल्याची नोंद आहे. राज्य शासनाने सुमारे १५ वर्षापुर्वी याची दखल घेतली होती. परंतु कागदी घोडे नाचविण्यापलिकडे दुसरे काहीही झाले नाही.

ठळक मुद्देरेती उपस्याचा परिणाम : १५ वर्षांपासून नदीचा प्रवाह गावाच्या दिशेने, संरक्षक भिंतीची गरज

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातून वाहणाऱ्या जीवनदायी वैनगंगा नदीत बेसुमार रेतीचे उत्खनन सुरू असून यामुळे नदीचा प्रवाह गावाच्या दिशेने वाहत आहे. नदीतीरावरील सुमारे १० ते १२ गावातील ४२ हेक्टर शेतजमीन वैनगंगेने गिळंकृत केली आहे. या शेतकऱ्यांना अद्याप कोणताही मोबदला मिळाला नाही. तसेच संरक्षक भिंतीसाठीही कोणत्याच उपाययोजना करण्यात आल्या नाही.तुमसर तालुक्यातून विशालपात्र असलेली वैनगंगा नदी वाहते. या नदीच्या तिरावर अनेक गावे आहेत. त्यापैकी बपेरा, रेेंगेपार, मांडवी, उमरवाडा, बोरी, कोष्टी, ब्राम्हणी, चारगाव, ढोरवाडा या गावातील नदीतीरावरील शेतजमीन नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. शासन दरबारी ४२ हेक्टर शेती गिळंकृत झाल्याची नोंद आहे. राज्य शासनाने सुमारे १५ वर्षापुर्वी याची दखल घेतली होती. परंतु कागदी घोडे नाचविण्यापलिकडे दुसरे काहीही झाले नाही.अलिकडे वैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमा नदीने ठरल्या आहेत. दोन्ही जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव केले जाते. वाहतुकीसाठी सोयीस्कर व्हावे म्हणून नदीची नैसर्गिंक संरक्षक भिंत थडी खचविली जात आहे. तसेच नदीपात्रात मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असल्याने नदीचा प्रवाह बदलत आहे. परिणामी नदी गावाच्या दिशेने वाहत आहे. नदीकाठावरील गावातील सुपीक व गाळाची जमीन नदीने गिळंकृत केली आहे. पाणीपुरवठा योजना विहिरी जलकुंभाला जलसमाधी मिळाली आहे.संरक्षक भिंतीवर कोट्यवधींचा खर्च अपेक्षिततुमसर तालुक्यातील नदीकाठावरील गावशिवारातील शेती गिळंकृत होवू नये, यासाठी संरक्षक भिंती बांधण्याची गरज आहे. मात्र त्यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकार व राज्य शासनाकडून निधी मिळावा लागणार आहे. परंतु याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. काही वर्षांपुर्वी राज्य शासनाने या गावांचे सर्व्हेक्षण करून अहवाल शासनाला पाठविला आहे. त्यावर कोणत्याच उपाय योजना करण्यात आल्या नाही.तीरावरील शेती नदीपात्र गिळंकृत करीत आहे. पुढे नदीचा प्रवाह गावाच्या दिशेने येत आहे. गावाला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. शासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.-शिशुपाल गौपाले, उपसभापती पंचायत समिती, तुमसर.

टॅग्स :riverनदी