शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

पाणीटंचाई आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: February 25, 2015 01:09 IST

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अनेक गावांमध्ये पाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी अनेक गावात मिळत नाही तसेच विहीरी कोरड्या पडत आहेत.

चंदन मोटघरे लाखनीफेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अनेक गावांमध्ये पाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी अनेक गावात मिळत नाही तसेच विहीरी कोरड्या पडत आहेत. तालुक्यात पाणी टंचाई बहृद आराखडा तयार करण्यात आला आहे. खंडविकास अधिकारी व तहसिलदार यांनी जानेवारी ते मार्च २०१५ पर्यंत टंचाई निवारनार्थ ३ गावांची निवड केली आहे तर एप्रिल ते जुन २०१५ पर्यंतसाठी टंचाई निवारनार्थ ९ गावांची निवड प्रशासनाने केली आहे. तालुक्यात १०२ गावे आहेत यापैकी निम्म्यापेक्षा जास्त गावात पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. जानेवारी ते मार्चपर्यंत पेंढरी येथे नळयोजना कार्यान्वित करण्यासाठी १ लक्ष रुपयाचे कामांची मागणी करण्यात आली आहे. पोहरा येथे नळ योजना पाईप लाईन दुरुस्तीसाठी २ लक्ष रुपयाचा खर्च अपेक्षित आहेत. मुरमाडी (तुपकर) येथे नळ योजना पुरवठा व विहीरीतील गाळ उपसणे यासाठी एक लक्ष रुपयांची गरज आहे. तिन्ही गावात सद्या हातपंप, सार्वजनिक विहीरी व नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु उन्हाळ्यात वरील गावात पाण्याची तिव्र टंचाई भासते पाणी टंचाई बृहद आराखड्यानुसार एप्रिल ते जुन महिण्यात ९ गावात पाणीटंचाईसाठी पुरक कामे करावयाची आहेत. यात खराशी येथिल धानला टोली येथे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी १ विंधन विहीर तयार करणे व विहीरीतल खोलीकरण करून गाळ काढणे यासाठी १ लक्ष १० हजार रुपयाचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. मानेगाव येथे ९० हजार रुपयाचे १ विंधन विहीर प्रस्तावित केली आहे. पाथरी येथे दोन विहीरीचे खोलीकरण व गाळ काढण्यासाठी ४० हजार रुपयाची मागणी केली आहे. नरव्हा येथे ९० हजार रुपयाचे १ हातपंप, गोंडसावरी येथे २ विहीरीचे खोलीकरण, पिंपळगाव (सडक) येथे टोलीवर विहीर खोल करणे व गाळ काढण्यासाठी ४० हजाराची मागणी केली आहे. तालुक्यातील किन्ही येथे टोलीवरील विहीर खोल करणे, चान्ना येथे नळयोजनेची पुरवठा विहीर खोल करणे गाळ काढण्यासाठी एक लक्ष रुपयाची कामे प्रस्तावित आहेत. परसोडी (पवार) येथे विंधन विहीर व दोन विहीर खोल करण्यासाठी ४० हजार रुपयांची कामे प्रस्तावित आहेत.तालुक्यातिल १२ गावात पाणी टंचाई निवारनार्थ कामासाठी ९ लक्ष ७० हजार रुपयाची गरज आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागा जिल्हा परिषद भंडारा यांनी टंचाई निवारनार्थ कामांना अद्यापही मंजुरी मिळाली नाही. पाणीप्रश्न बिकट बनल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का हा प्रश्न नागरिकांना निर्माण होत आहे.