शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: February 25, 2015 01:09 IST

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अनेक गावांमध्ये पाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी अनेक गावात मिळत नाही तसेच विहीरी कोरड्या पडत आहेत.

चंदन मोटघरे लाखनीफेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अनेक गावांमध्ये पाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी अनेक गावात मिळत नाही तसेच विहीरी कोरड्या पडत आहेत. तालुक्यात पाणी टंचाई बहृद आराखडा तयार करण्यात आला आहे. खंडविकास अधिकारी व तहसिलदार यांनी जानेवारी ते मार्च २०१५ पर्यंत टंचाई निवारनार्थ ३ गावांची निवड केली आहे तर एप्रिल ते जुन २०१५ पर्यंतसाठी टंचाई निवारनार्थ ९ गावांची निवड प्रशासनाने केली आहे. तालुक्यात १०२ गावे आहेत यापैकी निम्म्यापेक्षा जास्त गावात पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. जानेवारी ते मार्चपर्यंत पेंढरी येथे नळयोजना कार्यान्वित करण्यासाठी १ लक्ष रुपयाचे कामांची मागणी करण्यात आली आहे. पोहरा येथे नळ योजना पाईप लाईन दुरुस्तीसाठी २ लक्ष रुपयाचा खर्च अपेक्षित आहेत. मुरमाडी (तुपकर) येथे नळ योजना पुरवठा व विहीरीतील गाळ उपसणे यासाठी एक लक्ष रुपयांची गरज आहे. तिन्ही गावात सद्या हातपंप, सार्वजनिक विहीरी व नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु उन्हाळ्यात वरील गावात पाण्याची तिव्र टंचाई भासते पाणी टंचाई बृहद आराखड्यानुसार एप्रिल ते जुन महिण्यात ९ गावात पाणीटंचाईसाठी पुरक कामे करावयाची आहेत. यात खराशी येथिल धानला टोली येथे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी १ विंधन विहीर तयार करणे व विहीरीतल खोलीकरण करून गाळ काढणे यासाठी १ लक्ष १० हजार रुपयाचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. मानेगाव येथे ९० हजार रुपयाचे १ विंधन विहीर प्रस्तावित केली आहे. पाथरी येथे दोन विहीरीचे खोलीकरण व गाळ काढण्यासाठी ४० हजार रुपयाची मागणी केली आहे. नरव्हा येथे ९० हजार रुपयाचे १ हातपंप, गोंडसावरी येथे २ विहीरीचे खोलीकरण, पिंपळगाव (सडक) येथे टोलीवर विहीर खोल करणे व गाळ काढण्यासाठी ४० हजाराची मागणी केली आहे. तालुक्यातील किन्ही येथे टोलीवरील विहीर खोल करणे, चान्ना येथे नळयोजनेची पुरवठा विहीर खोल करणे गाळ काढण्यासाठी एक लक्ष रुपयाची कामे प्रस्तावित आहेत. परसोडी (पवार) येथे विंधन विहीर व दोन विहीर खोल करण्यासाठी ४० हजार रुपयांची कामे प्रस्तावित आहेत.तालुक्यातिल १२ गावात पाणी टंचाई निवारनार्थ कामासाठी ९ लक्ष ७० हजार रुपयाची गरज आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागा जिल्हा परिषद भंडारा यांनी टंचाई निवारनार्थ कामांना अद्यापही मंजुरी मिळाली नाही. पाणीप्रश्न बिकट बनल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का हा प्रश्न नागरिकांना निर्माण होत आहे.