शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या प्रतीक्षेत रूग्ण ताटकळत

By admin | Updated: March 29, 2015 00:59 IST

ग्रामीण भागात नागरिकांना वेळेवर उपचारासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने शासनाने रावणवाडी येथे ...

रावणवाडी : ग्रामीण भागात नागरिकांना वेळेवर उपचारासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने शासनाने रावणवाडी येथे कोट्यवधी रूपयांच्या खर्चातून प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली. मात्र या आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध तर होतच नाही. शिवाय रुग्णांना सतत डॉक्टरांचीच प्रतीक्षा करीत जिवंतपणीच मरण यातना सहन कराव्या लागत आहेत.सामान्य जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासन वेळोवेळी प्रयत्नशील असते. परंतु जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव नसणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सामान्य जनतेच्या आरोग्याशी काहीच देणे घेणे नाही. पूर्वीच आरोग्य केंद्रातील पदे रिक्त असल्याने त्यांचा दैनंदिन काम काजावर विपरीत परिणाम होत आहे. दोन मंजूर वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी डॉ. शिल्पा शहारे ह्या वरिष्ठांच्या विना परवाणगीने मागील १०-१२ दिवसांपासून स्वत:च्या मर्जीने रजेवर गेल्याचे आढळून आले आहे. सदर वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी न राहता स्वत:च्या सोयीनुसार नागपूरवरुन अपडाऊन करतात. अशात रुग्णांनी उपचारासाठी कुणाकडे जावे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. आरोग्य केंद्राच्या आवारातच अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता सुसज्ज अशी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. परंतु बहुतांश निवासस्थाने रिकामेच पडून आहेत. वैद्यकीय अधिकारीच अपडाऊन करीत असल्यामुळे कर्मचारीही स्वयंमर्जीनुसार अपडाऊन करतात. अशा कार्यपद्धतीमुळे रुग्णांना हवा असलेले उपचार मिळणे कसे शक्य होणार? याची जाणिवसुद्धा वरिष्ठांना नाही. सध्या संपूर्ण राज्यात स्वाईन फ्लू आजाराची धास्ती पसरली आहे. या आजारांनी मृत्यू होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रत्येक आठवड्यात हवामानात बदल होत आहे. उन्हाळा सुरु झाला असला तरी अवकाळी पावसाच्या कहराने हवामानातही फपाट्याने परिवर्तन होत आहे. यामुळे रुग्णसंख्येत वाढ होणे स्वाभाविक आहे. मात्र आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने आरोग्य केंद्र निराधार झाले आहे. वैद्यकीय अधिकारी आपल्या कर्तव्याची जान नसल्यासारखे कृत्य करीत असल्याने याचा फटका सरळ सर्वसामान्य नागरिकांवर होत आहे. काही कर्मचारी कागद काळे करण्यातच मस्त आहेत. अशात सामान्य नागरिकांनी उपचार करावे तरी कुठे, असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे. या प्रकाराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (वार्ताहर)