शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
3
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
4
तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
5
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
6
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
7
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
8
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
9
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
10
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
11
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
12
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
13
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
14
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू
15
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
16
आंध्र प्रदेशात देवरगट्टू बन्नी उत्सवादरम्यान दोन जणांचा मृत्यू, ९० जण जखमी
17
Video: छातीत झाडल्या तीन गोळ्या, मित्राच्या हत्येचा बनवला व्हिडीओ; पोलिसांची उडाली झोप
18
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
19
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
20
Neena Kulkarni: ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

दहा हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:56 IST

सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३२८ शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. आता १६ वी ग्रीनलिस्ट प्रसिद्ध होणार असून त्यानंतर या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे१६ वी ग्रीन लिस्टयेणार : दोन वर्षात भंडारा जिल्ह्यातील ७९ हजार १२३ शेतकऱ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३२८ शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. आता १६ वी ग्रीनलिस्ट प्रसिद्ध होणार असून त्यानंतर या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. दोन वर्षात या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८९ हजार ६२६ कर्जदार शेतकऱ्यांपैकी ७९ हजार १२३ शेतकºयांना लाभ मिळाला आहे.नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीची घोषणा केली होती. २८ जून २०१७ रोजी याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला.कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज भरुन घेण्यात आले. जिल्ह्यातील ८९ हजार ६२६ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज सादर केले. राज्य सरकारने आतापर्यंत १५ ग्रीनलिस्ट जारी केल्या असून त्यानुसार जिल्ह्यातील ७९ हजार ३२८ शेतकऱ्यांना २२१ कोटी ६२ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली.थकीत शेतकऱ्यांमध्ये जिल्हा बँकेच्या २४ हजार १०२ शेतकऱ्यांना ९४ कोटी ९६ लाख, राष्ट्रीयकृत बँकाच्या ५४५३ शेतकऱ्यांना २७ कोटी ७१ लाख आणि ग्रामीण बँकेच्या १५८५ शेतकºयांना ८ कोटी ४५ लाख रुपयांची अशी ३१ हजार १४० शेतकऱ्यांना १३० कोटी ९२ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. तर प्रोत्साहनपर लाभ देण्यात आलेल्यांमध्ये जिल्हा बँकेचे ४१ हजार ७९० शेतकऱ्यांना ६३ कोटी ६४ लाख राष्ट्रीयकृत बँकेच्या २९३३ शेतकऱ्यांना ७ कोटी २० लाख, ग्रामीण बँकेच्या २०५९ शेतकऱ्यांना ३ कोटी ६६ लाख असे ४६ हजार ७९२ शेतकऱ्यांना ७४ कोटी ५ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.एकरकमी योजनेअंतर्गत जिल्हा बँकेच्या ६४४ शेतकऱ्यांना ८ कोटी २ हजार, राष्ट्रीयकृत बँकेच्या ५१८ शेतकऱ्यांना ५ कोटी ११ लाख आणि याशिवाय ग्रामीण बँकेच्या २१४ शेतकऱ्यांना १ कोटी ६४ लाख असे १३७६ शेतकऱ्यांना १४ कोटी ७७ लाख रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे.एकरकमी कर्ज भरणाऱ्या थकीत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची ही मोठी संधी आहे. नवीन आदेशानुसार ३१ आॅक्टोंबरपर्यंत अंतीम मुदत वाढविण्यात आली आहे. कर्जमाफी आणि पीक कर्जाबाबत असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तालुकास्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या आहे.- मनोज देशकरजिल्हा उपनिबंधक, भंडारानव्या आदेशाने व्याप्ती वाढलीकर्जमाफी योजनेत सुरुवातीला १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१७ पर्यंतच्या थकीत आणि नियमित कर्ज भरणाऱ्या अशा दोन श्रेणी शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार होता. यात थकीत कर्जदारांना संपूर्ण कर्जमाफी आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत होता. मात्र गत वर्षी यात नविन अध्यादेश काढण्यात आला. १ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००९ पर्यंतच्या शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आला. योजनेची व्याप्ती वाढविल्याने योजनेच्या लाभ घेणाऱ्यांच्या तक्रारीतही वाढ झाली होती. भंडारा जिल्ह्यात थकीत कर्जदारांपेक्षा नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना या योजनेचा अधिक लाभ मिळाला. जून अखेरपर्यंत ३१ हजार १४० थकीत शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांना १३० कोटी ९२ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. तर दुसरीकडे नियमित कर्ज भरणाऱ्या ४६ हजार ७८२ शेतकऱ्यांना ७४ कोटी ५ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज