शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:56 IST

सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३२८ शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. आता १६ वी ग्रीनलिस्ट प्रसिद्ध होणार असून त्यानंतर या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे१६ वी ग्रीन लिस्टयेणार : दोन वर्षात भंडारा जिल्ह्यातील ७९ हजार १२३ शेतकऱ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३२८ शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. आता १६ वी ग्रीनलिस्ट प्रसिद्ध होणार असून त्यानंतर या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. दोन वर्षात या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८९ हजार ६२६ कर्जदार शेतकऱ्यांपैकी ७९ हजार १२३ शेतकºयांना लाभ मिळाला आहे.नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीची घोषणा केली होती. २८ जून २०१७ रोजी याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला.कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज भरुन घेण्यात आले. जिल्ह्यातील ८९ हजार ६२६ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज सादर केले. राज्य सरकारने आतापर्यंत १५ ग्रीनलिस्ट जारी केल्या असून त्यानुसार जिल्ह्यातील ७९ हजार ३२८ शेतकऱ्यांना २२१ कोटी ६२ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली.थकीत शेतकऱ्यांमध्ये जिल्हा बँकेच्या २४ हजार १०२ शेतकऱ्यांना ९४ कोटी ९६ लाख, राष्ट्रीयकृत बँकाच्या ५४५३ शेतकऱ्यांना २७ कोटी ७१ लाख आणि ग्रामीण बँकेच्या १५८५ शेतकºयांना ८ कोटी ४५ लाख रुपयांची अशी ३१ हजार १४० शेतकऱ्यांना १३० कोटी ९२ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. तर प्रोत्साहनपर लाभ देण्यात आलेल्यांमध्ये जिल्हा बँकेचे ४१ हजार ७९० शेतकऱ्यांना ६३ कोटी ६४ लाख राष्ट्रीयकृत बँकेच्या २९३३ शेतकऱ्यांना ७ कोटी २० लाख, ग्रामीण बँकेच्या २०५९ शेतकऱ्यांना ३ कोटी ६६ लाख असे ४६ हजार ७९२ शेतकऱ्यांना ७४ कोटी ५ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.एकरकमी योजनेअंतर्गत जिल्हा बँकेच्या ६४४ शेतकऱ्यांना ८ कोटी २ हजार, राष्ट्रीयकृत बँकेच्या ५१८ शेतकऱ्यांना ५ कोटी ११ लाख आणि याशिवाय ग्रामीण बँकेच्या २१४ शेतकऱ्यांना १ कोटी ६४ लाख असे १३७६ शेतकऱ्यांना १४ कोटी ७७ लाख रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे.एकरकमी कर्ज भरणाऱ्या थकीत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची ही मोठी संधी आहे. नवीन आदेशानुसार ३१ आॅक्टोंबरपर्यंत अंतीम मुदत वाढविण्यात आली आहे. कर्जमाफी आणि पीक कर्जाबाबत असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तालुकास्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या आहे.- मनोज देशकरजिल्हा उपनिबंधक, भंडारानव्या आदेशाने व्याप्ती वाढलीकर्जमाफी योजनेत सुरुवातीला १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१७ पर्यंतच्या थकीत आणि नियमित कर्ज भरणाऱ्या अशा दोन श्रेणी शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार होता. यात थकीत कर्जदारांना संपूर्ण कर्जमाफी आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत होता. मात्र गत वर्षी यात नविन अध्यादेश काढण्यात आला. १ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००९ पर्यंतच्या शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आला. योजनेची व्याप्ती वाढविल्याने योजनेच्या लाभ घेणाऱ्यांच्या तक्रारीतही वाढ झाली होती. भंडारा जिल्ह्यात थकीत कर्जदारांपेक्षा नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना या योजनेचा अधिक लाभ मिळाला. जून अखेरपर्यंत ३१ हजार १४० थकीत शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांना १३० कोटी ९२ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. तर दुसरीकडे नियमित कर्ज भरणाऱ्या ४६ हजार ७८२ शेतकऱ्यांना ७४ कोटी ५ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज