शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांपासून मोबदल्याची प्रतीक्षा

By admin | Updated: December 18, 2015 00:58 IST

तालुक्यात हरितक्रांती घडवून आणण्यासाठी शासनातर्फे चुलबंद नदीवर २० वर्षांपूर्वी निम्नचुलबंद प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले.

प्रकरण निम्न चुलबंद प्रकल्पाचेसंजय साठवणे साकोली तालुक्यात हरितक्रांती घडवून आणण्यासाठी शासनातर्फे चुलबंद नदीवर २० वर्षांपूर्वी निम्नचुलबंद प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. मात्र या २० वर्षात हा प्रकल्पही पूर्ण झाला नाही. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदलाही मिळाला नाही. एकीकडे शासन जलयुक्त शिवार योजनेवर भर देत आहे. मात्र हा प्रकल्प पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असतानाही या प्रकल्पाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.साकोली जवळील कुंभली येथील चुलबंद नदीवर, निम्नचुलबंद प्रकल्पाला महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे २९ एप्रिल १९९५ रोजी ४ हजार १६७.७३ लक्ष रूपयाचे अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यात आले. या प्रकल्पाकरिता ९० हेक्टर खाजगी जमिनीची आवश्यकता असल्याने नदीकाठाजवळील जमिनीचे भूसंपादन करण्यात आले. यात गडकुंभली, वडद, लवारी या गावातील शेतीचा समावेश आहे. यापैकी वडद येथील २९.४२ हेक्टर शेतजमीन वडद येथील शेतकऱ्यांची आहे. शासनातर्फे गडकुंभली, लवारी या गावातील शेतकऱ्याकडे जमिनीचा मोबदला दिला असून वडद येथील शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला अजूनपर्यंत दिला नाही.या प्रकल्पासाठी चुलबंद नदीवर दोन्ही तिरावर मातीचे घरत व नदीचे पात्रात १०८ मीटर लांबीचे धरण बांधून १२ बाय ६ मीटरचे ७ दरवाजे बसविण्यात आले आहे. या प्रकल्पापासून साकोली तालुक्यातील कुंभली, धर्मापुरी, सावरबंध, बोंडे, खंडाळा, वडद, सुकळी, महालगाव, शिवनीबांध, साखरा, वटेटेकर, सासरा, नेहारवानी, कटंगधरा, विहीरगाव, गडकुंभली, सेंदुरवाफा, पाथरी, खैरलांजी, साकोली, जमनापुर, पिंडकेपार, बोदरा या २३ गावातील ५ हजार ९९ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. तसेच साकोली व लाखनी तालुक्यातील १९ गावांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. सद्यस्थितीला या प्रकल्पाचे काम ६० ते ७० टक्के काम पूर्ण झाले असले तरी उर्वरित कामासाठी अजुन जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. यात पंपहाऊसचे काम अर्धे बाकी असून कॅनलसह काही कामे अपूर्ण आहेत. तलावात सोडले जाणार पाणीया प्रकल्पातून अडविलेले पाणी पंपहाऊस द्वारे पाणी कालव्यात टाकण्यात येईल व कालव्याद्वारे हे पाणी तलावात सोडून शेतीला मिळणार आहे.पाणी अडविलेसण २०१२-१३ ला या प्रकल्पात पाणी अडविण्यात आले होते. त्यावेळी वडद परिसरातील शेती पूर्णता पाण्यात बुडाली होती. त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी शेतीचा मोबदला व नुकसान भरपाई मागितली होती. मात्र २० वर्षापासून शेतीचा मोबदलाही मिळाले नाही आणि नुकसान भरपाईची सुद्धा मिळाली नाही.अधिकारी प्रभारी साकोली येथील पाटबंधारे विभागात मागील तीन वर्षापासून उपविभागीय अभियंता हे प्रभारी आहे. प्राभारी अधिकाऱ्यांमुळेही या प्रकल्पाला ग्रहण लागले. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळालेली नाही. शासनाने या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी पुर्णवेळ अभियंता द्यावा.