शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

२० वर्षांपासून मोबदल्याची प्रतीक्षा

By admin | Updated: December 18, 2015 00:58 IST

तालुक्यात हरितक्रांती घडवून आणण्यासाठी शासनातर्फे चुलबंद नदीवर २० वर्षांपूर्वी निम्नचुलबंद प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले.

प्रकरण निम्न चुलबंद प्रकल्पाचेसंजय साठवणे साकोली तालुक्यात हरितक्रांती घडवून आणण्यासाठी शासनातर्फे चुलबंद नदीवर २० वर्षांपूर्वी निम्नचुलबंद प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. मात्र या २० वर्षात हा प्रकल्पही पूर्ण झाला नाही. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदलाही मिळाला नाही. एकीकडे शासन जलयुक्त शिवार योजनेवर भर देत आहे. मात्र हा प्रकल्प पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असतानाही या प्रकल्पाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.साकोली जवळील कुंभली येथील चुलबंद नदीवर, निम्नचुलबंद प्रकल्पाला महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे २९ एप्रिल १९९५ रोजी ४ हजार १६७.७३ लक्ष रूपयाचे अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यात आले. या प्रकल्पाकरिता ९० हेक्टर खाजगी जमिनीची आवश्यकता असल्याने नदीकाठाजवळील जमिनीचे भूसंपादन करण्यात आले. यात गडकुंभली, वडद, लवारी या गावातील शेतीचा समावेश आहे. यापैकी वडद येथील २९.४२ हेक्टर शेतजमीन वडद येथील शेतकऱ्यांची आहे. शासनातर्फे गडकुंभली, लवारी या गावातील शेतकऱ्याकडे जमिनीचा मोबदला दिला असून वडद येथील शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला अजूनपर्यंत दिला नाही.या प्रकल्पासाठी चुलबंद नदीवर दोन्ही तिरावर मातीचे घरत व नदीचे पात्रात १०८ मीटर लांबीचे धरण बांधून १२ बाय ६ मीटरचे ७ दरवाजे बसविण्यात आले आहे. या प्रकल्पापासून साकोली तालुक्यातील कुंभली, धर्मापुरी, सावरबंध, बोंडे, खंडाळा, वडद, सुकळी, महालगाव, शिवनीबांध, साखरा, वटेटेकर, सासरा, नेहारवानी, कटंगधरा, विहीरगाव, गडकुंभली, सेंदुरवाफा, पाथरी, खैरलांजी, साकोली, जमनापुर, पिंडकेपार, बोदरा या २३ गावातील ५ हजार ९९ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. तसेच साकोली व लाखनी तालुक्यातील १९ गावांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. सद्यस्थितीला या प्रकल्पाचे काम ६० ते ७० टक्के काम पूर्ण झाले असले तरी उर्वरित कामासाठी अजुन जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. यात पंपहाऊसचे काम अर्धे बाकी असून कॅनलसह काही कामे अपूर्ण आहेत. तलावात सोडले जाणार पाणीया प्रकल्पातून अडविलेले पाणी पंपहाऊस द्वारे पाणी कालव्यात टाकण्यात येईल व कालव्याद्वारे हे पाणी तलावात सोडून शेतीला मिळणार आहे.पाणी अडविलेसण २०१२-१३ ला या प्रकल्पात पाणी अडविण्यात आले होते. त्यावेळी वडद परिसरातील शेती पूर्णता पाण्यात बुडाली होती. त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी शेतीचा मोबदला व नुकसान भरपाई मागितली होती. मात्र २० वर्षापासून शेतीचा मोबदलाही मिळाले नाही आणि नुकसान भरपाईची सुद्धा मिळाली नाही.अधिकारी प्रभारी साकोली येथील पाटबंधारे विभागात मागील तीन वर्षापासून उपविभागीय अभियंता हे प्रभारी आहे. प्राभारी अधिकाऱ्यांमुळेही या प्रकल्पाला ग्रहण लागले. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळालेली नाही. शासनाने या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी पुर्णवेळ अभियंता द्यावा.