शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

उन्हाळ्यापूर्वीच वैनगंगा कोरडी

By admin | Updated: March 8, 2017 00:34 IST

तुमसर तालुक्यातून वाहणारी वैनगंगा उन्हाळ्यापूर्वीच कोरडी पडली आहे.

तीन महिने भीषण जलसंकटाची चाहूल : चारगाव शिवारात नदीचा प्रवाह बंद होण्याच्या मार्गावरतुमसर : तुमसर तालुक्यातून वाहणारी वैनगंगा उन्हाळ्यापूर्वीच कोरडी पडली आहे. मुख्य जलस्त्रोत कोरडा पडल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. चारगाव (दे) शिवारात नदीची धार शेवटची घटका मोजत आहे. येत्या दहा दिवसात नदी प्रवाह बंद होण्याचे संकेत आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून धापेवाडा वाहणी बॅरेजमधून वक्रद्वार उघडण्याची गरज आहे.मध्यप्रदेशातून उगम पावणारी वैनगंगा नदी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील एक प्रमुख नदी आहे. बारमाही वाहणारी ही नदी असून मागील काही वर्षापासून वैनगंगा नदी उन्हाळ्यापूर्वीच कोरडी पडत आहे. बावनथडी नदीवर सीतेकसा येथे धरण बांधण्यात आला तर वैनगंगा नदीवर वाहणी मांडवी येथे बॅरेज तयार करण्यात आले. धापेवाडा सिंचन योजना तथा अदानी पॉवरला येथून पाणी पुरवठा करण्यात येतो. पाणी अडविल्याने वाहनीनंतर वैनगंगेचे पात्र कोरडे पडले आहे.वैनगंगा नदी जीवनदायीनी आहे. अनेक गावांना नदीतून पाणी पुरवठा केला जातो. वैनगंगा कोरडी पडल्याने अनेक पाणी पुरवठा योजना ठप्प पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चारगाव शिवारात वैनगंगेचा प्रवाह शेवटची घटका मोजत आहे. येत्या दहा दिवसात चारगाव (दे.) येथे पाण्याचा प्रवाह बंद पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अनेक वर्षापासून तालुक्यातील नदीकाठावरील गावातील कोळी बांधव नदीपात्रात उन्हाळ्यात पालेभाज्या, टरबूज, काकड्यांची शेती करीत होते. परंतु पाण्याची पातळी राहत नसल्याने अनेकांनी ही शेती व्यवसाय बंद केला आहे. कोळी बांधवांवर सध्या मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे.हिवाळा व उन्हाळ्यात नदी पात्रातून प्रचंड रेती उपसा केला जातो. यामुळे नदी पात्रात मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यात पाणीसाठा असतो. यामुळे नदीचा प्रवाह सुरु राहण्यास अडचण निर्माण होतो. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच वैनगंगेसारखी मोठी नदी कोरडी पडत आहे. ही धोक्याची घंटा निश्चितच आहे. येथे शासनाने पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. जलसाठा यामुळे कमालीचा खाली जाण्याची शक्यता आहे. पाणी समस्येवर शासकीय अधिकाऱ्यांनी बैठका सुद्धा घेतल्या नाही हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)