अशा या शेतकऱ्याच्या स्वप्नपूर्तीला महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने आणखी बळ दिले आहे. पुरस्कार घोषित झाल्यापासून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आमदार राजू कारेमोरे, गटविकास अधिकारी रवींद्र वंजारी, कृषी विस्तार अधिकारी भाग्यवान भोयर, कृषी पर्यवेक्षक भारत समरीत, तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, सुरगंगा कंपनीचे संचालक अभिजित गजभिये यांनी त्यांचे कौतुक केले. लवकरच शासनस्तरावर पुरस्कार दिला जाणार आहे.
बॉक्स
दुधाची उच्च दरात विक्री
विष्णू आथिलकर यांच्याकडे निर्माण होणाऱ्या दुधाला मोठी मागणी असते. बाजारभावापेक्षा अधिक किंमत देऊन त्यांच्याकडील दूध ग्राहक खरेदी करतात. भंडारा शहरात आथिलकर यांच्या दुधाला मोठी मागणी असते. अनेक ग्राहक तर शेतात येऊनच दूध घेऊन जातात. गुणवत्तापूर्ण शेतीमाल तयार केला की, त्याला ग्राहक मिळतातच, असा त्यांचा विश्वास आहे. बाजारात जाऊन शेतमाल कुणीही विकताे. मात्र, विष्णू आथिलकर यांच्या विश्वासार्हतेने ग्राहक शेतात येऊन खरेदी करतात.
बॉक्स
उद्ध्वस्त व्यवसायाला बळ देणारा शेतकरी
सन २००२ मध्ये पिंपळगाव परिसरात मोठे वादळ आले होते. या वादळात आथिलकर यांची संपूर्ण फळबाग उद्ध्वस्त झाली होती. पाच एकरांत पिकाचा सडा पडला होता. मोठे नुकसान झाले होते. अशा परिस्थितीतही आथिलकर यांनी धीर सोडला नाही. सातत्याने संकटावर मात करीत स्वप्नपूर्तीसाठी ते एकनिष्ठ राहिले आणि प्रगतीचे यशस्वीकरण गाठले.
बॉक्स
शेती व्यवसाय करताना सामाजिक भानही आथिलकर जोपासत आहेत. लगतच्या नेरी येथे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होते. गतवर्षी आथिलकर यांनी पिकाला पाण्याची पर्वा न करता स्वत:च्या शेतातील बोअरवेलचे पाणी नागरिकांना दिले. जवळपास चार महिने त्यांचा हा उपक्रम नि:शुल्क सुरू होता. उलट पिकातून पाण्याचे टँकर जात असल्याने त्यांना नुकसान सहन करावा लागले.