शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

ग्रामस्थांना वेठीस धरण्याचा डाव

By admin | Updated: September 16, 2016 01:24 IST

मांगली चौरास येथे २९ आॅगस्ट रोजी ग्रामसभेत काही गावकऱ्यांनी ग्रामपंचायत सचिवाला मारहाण करून

भंडारा : मांगली चौरास येथे २९ आॅगस्ट रोजी ग्रामसभेत काही गावकऱ्यांनी ग्रामपंचायत सचिवाला मारहाण करून शासकीय दस्तावेज फाडला असा आरोप करून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. ही तक्रार तथ्यहीन असून राजकीय द्वेषभावनेतून आम्हाला फसविण्यात येत असल्याचा आरोप ग्रामसभेच्या अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अनुसया मधु पडोळे यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला. पवनी तालुक्यातील मांगली येथे २९ आॅगस्ट रोजी ग्रामसभेत तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदाची निवडणूक होती. त्यासाठी हनुमान मंदिरात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ठरल्यानुसार गावकरी उपस्थित होते. परंतु सभास्थळी विद्युत व पंख्याची सुविधा नसल्यामुळे ही सभा दुसऱ्या ठिकाणी घेण्यात यावी, अशी गावकऱ्यांची मागणी होती मात्र गावात दोन गट असल्याने सरपंचांना दुसरे स्थळ मान्य नव्हते़ ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी ६ उमेदवारांनी अर्ज केला होता़ त्यामुळे आपल्याच उमेदवाराची अध्यक्षपदी निवड व्हावी, अशी इच्छा असल्याने स्थळ बदलविण्यासाठी सरपंच्यानी विरोध करून ते सभेतून निघून गेले़ त्यामुळे सचिवाने दुसऱ्यास्थळी सभा घेतली़. सभा सुरळीत पार पडली त्यात कुठलाही गोंधळ किंवा हाणामारी झाली नाही़ गावकऱ्यांच्या स्वाक्षरी घेताना एकमेकांच्या प्रोसेडिंग बुकची ओढताण झाली, परंतु प्रोसिडींग किंवा कोणतेही दस्तावेज फाटले नाही़ खुद्द सचिवांनी दिलेले प्रोसीडींग बुक फाटलेले नसल्याचे पत्रपरिषदेत दाखविण्यात आले. सचिवाचे सरपंचांशी सलोख्याचे संबध असून काही दिवसापुर्वी रेतीघाटाच्या रस्त्यावरून बिनसल्यामुळे बदनाम करण्याचा कट रचून आणि खोटा आरोप लावून पोलीस ठाण्यात तक्रारी करून पुरूषोत्तम वैद्य, खुशाल वैद्य, डागेश्वर पडोळे यांचेविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले़ हा त्यांना बदनाम करण्याचा कट आहे़ मांगलीचे ग्रामसेवक दत्ता जाधव हे सरपंचाच्या गटाचे असून विरोधी गटाचा अध्यक्ष झाल्याने सचिव हा कर्मचारी युनियनला अंधारात ठेवून सर्व गावकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील ग्रामविकासाची कामे ठप्प झाली आहेत़ त्यामुळे प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या ग्रामसेवक दत्ता जाधव यांना सेवेतून निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी केली. अन्यथा रस्त्यावर येऊन जनआंदोलन करण्याचा ईशारा सुरेंद्र आमतुलवार, तेजराम वैद्य, अतुल मुलतलवार, के.डी. मोटघरे, हिरालाल वैद्य, गोवर्धन बावनकर, मनोरमा भुरे, डागेश्वर पडोळे, हिरालाल वैद्य यांनी दिला. (जिल्हा प्रतिनिधी)