लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : दिवाळी सणाच्या तोंडावर मागील १३ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने संतप्त गावरकऱ्यांनी ग्राम पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील कोच्ची येथे घडली.माहितीनुसार, तालुका जलस्वराज्य योजनेअंतर्गत सबंधित गावाला पिण्याच्या पाण्याच्या टाकीसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार गावात पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुद्धा करण्यात आले होते. यात टाकीचे बांंधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याची ओरड नागरिकांनी केली होती. यानंतर पाण्याची मोटर पूर्ववत ठिकाणी लावण्यात येऊन पाणी पुरवठा योजना त्यावेळी पूर्ववत सुरु करण्यात आली होती.दरम्यान मागील १३ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने येथील महिला पुरुषांसह ग्राम पंचायतीवर घागर मोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात नागरिकांनी संबंधित ग्राम पंचायत प्रशासनाला विचारणा केली असता त्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याने संतप्त नागरिकांनी ग्राम पंचायतीला कुलूप ठोकले.मागील १३ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने येथील नागरिक पिण्यासह वापरण्यासाठी लागणारा पाणी नजीकच्या नदी, तळयांसह शेतातील विहीरीचे पाणी वापरू लागल्याने नागरिकांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची ओरड नागरिकांत आहे. शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन बंद असलेली पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरु करावी अशी मागणी गावातील संपूर्ण नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात येथील नागरिक भरत वघारे म्हणाले, मागील दोन आठवड्यापासून बंद असलेला पाणीपुरवठा कोणत्या कारणामुळे बंद आहे तसेच कधी पूर्ववत सुरु करण्यात येईल, अशी विचारणा ग्राम पंचायत प्रशासनाला केली असता उडवाउडवीची देण्यात आली.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असतानाही नियोजनाच्या अभावामुळे नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित आहे. ग्रामीण भागात आजही विहीर किंवा बोअरवेल तसेच नदीचे पाणी थेट जलकुंभात आणून तेच गावात वितरित केले जाते. परिणामी नागरिकांच्या आरोग्यालाही बाधा पोहचत असते. याबाबत जिल्हा प्रशासनाने गंभीर पाऊले उचललेली नाहीत. परिणामी नागरिकांना आजही दूषित पाणी प्यावे लागत आहे.शुद्ध पाणीपुरवठा होणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. मात्र सांगूनही स्थानिक प्रशासन लक्ष देत नसल्यामुळेच कोच्ची येथील नागरिकांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला. संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला.
पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांनी ठोकले ग्राम पंचायतीला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST
१३ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने येथील महिला पुरुषांसह ग्राम पंचायतीवर घागर मोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात नागरिकांनी संबंधित ग्राम पंचायत प्रशासनाला विचारणा केली असता त्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याने संतप्त नागरिकांनी ग्राम पंचायतीला कुलूप ठोकले.
पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांनी ठोकले ग्राम पंचायतीला कुलूप
ठळक मुद्देमहिलांनी काढला घागर मोर्चा ; लाखांदूर तालुक्यातील कोच्ची येथील प्रकार