शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांनी ठोकले ग्राम पंचायतीला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST

१३ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने येथील महिला पुरुषांसह ग्राम पंचायतीवर घागर मोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात नागरिकांनी संबंधित ग्राम पंचायत प्रशासनाला विचारणा केली असता त्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याने संतप्त नागरिकांनी ग्राम पंचायतीला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देमहिलांनी काढला घागर मोर्चा ; लाखांदूर तालुक्यातील कोच्ची येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : दिवाळी सणाच्या तोंडावर मागील १३ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने संतप्त गावरकऱ्यांनी ग्राम पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील कोच्ची येथे घडली.माहितीनुसार, तालुका जलस्वराज्य योजनेअंतर्गत सबंधित गावाला पिण्याच्या पाण्याच्या टाकीसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार गावात पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुद्धा करण्यात आले होते. यात टाकीचे बांंधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याची ओरड नागरिकांनी केली होती. यानंतर पाण्याची मोटर पूर्ववत ठिकाणी लावण्यात येऊन पाणी पुरवठा योजना त्यावेळी पूर्ववत सुरु करण्यात आली होती.दरम्यान मागील १३ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने येथील महिला पुरुषांसह ग्राम पंचायतीवर घागर मोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात नागरिकांनी संबंधित ग्राम पंचायत प्रशासनाला विचारणा केली असता त्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याने संतप्त नागरिकांनी ग्राम पंचायतीला कुलूप ठोकले.मागील १३ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने येथील नागरिक पिण्यासह वापरण्यासाठी लागणारा पाणी नजीकच्या नदी, तळयांसह शेतातील विहीरीचे पाणी वापरू लागल्याने नागरिकांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची ओरड नागरिकांत आहे. शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन बंद असलेली पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरु करावी अशी मागणी गावातील संपूर्ण नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात येथील नागरिक भरत वघारे म्हणाले, मागील दोन आठवड्यापासून बंद असलेला पाणीपुरवठा कोणत्या कारणामुळे बंद आहे तसेच कधी पूर्ववत सुरु करण्यात येईल, अशी विचारणा ग्राम पंचायत प्रशासनाला केली असता उडवाउडवीची देण्यात आली.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असतानाही नियोजनाच्या अभावामुळे नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित आहे. ग्रामीण भागात आजही विहीर किंवा बोअरवेल तसेच नदीचे पाणी थेट जलकुंभात आणून तेच गावात वितरित केले जाते. परिणामी नागरिकांच्या आरोग्यालाही बाधा पोहचत असते. याबाबत जिल्हा प्रशासनाने गंभीर पाऊले उचललेली नाहीत. परिणामी नागरिकांना आजही दूषित पाणी प्यावे लागत आहे.शुद्ध पाणीपुरवठा होणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. मात्र सांगूनही स्थानिक प्रशासन लक्ष देत नसल्यामुळेच कोच्ची येथील नागरिकांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला. संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. 

टॅग्स :Waterपाणी