शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांनी ठोकले ग्राम पंचायतीला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST

१३ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने येथील महिला पुरुषांसह ग्राम पंचायतीवर घागर मोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात नागरिकांनी संबंधित ग्राम पंचायत प्रशासनाला विचारणा केली असता त्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याने संतप्त नागरिकांनी ग्राम पंचायतीला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देमहिलांनी काढला घागर मोर्चा ; लाखांदूर तालुक्यातील कोच्ची येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : दिवाळी सणाच्या तोंडावर मागील १३ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने संतप्त गावरकऱ्यांनी ग्राम पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील कोच्ची येथे घडली.माहितीनुसार, तालुका जलस्वराज्य योजनेअंतर्गत सबंधित गावाला पिण्याच्या पाण्याच्या टाकीसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार गावात पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुद्धा करण्यात आले होते. यात टाकीचे बांंधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याची ओरड नागरिकांनी केली होती. यानंतर पाण्याची मोटर पूर्ववत ठिकाणी लावण्यात येऊन पाणी पुरवठा योजना त्यावेळी पूर्ववत सुरु करण्यात आली होती.दरम्यान मागील १३ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने येथील महिला पुरुषांसह ग्राम पंचायतीवर घागर मोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात नागरिकांनी संबंधित ग्राम पंचायत प्रशासनाला विचारणा केली असता त्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याने संतप्त नागरिकांनी ग्राम पंचायतीला कुलूप ठोकले.मागील १३ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने येथील नागरिक पिण्यासह वापरण्यासाठी लागणारा पाणी नजीकच्या नदी, तळयांसह शेतातील विहीरीचे पाणी वापरू लागल्याने नागरिकांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची ओरड नागरिकांत आहे. शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन बंद असलेली पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरु करावी अशी मागणी गावातील संपूर्ण नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात येथील नागरिक भरत वघारे म्हणाले, मागील दोन आठवड्यापासून बंद असलेला पाणीपुरवठा कोणत्या कारणामुळे बंद आहे तसेच कधी पूर्ववत सुरु करण्यात येईल, अशी विचारणा ग्राम पंचायत प्रशासनाला केली असता उडवाउडवीची देण्यात आली.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असतानाही नियोजनाच्या अभावामुळे नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित आहे. ग्रामीण भागात आजही विहीर किंवा बोअरवेल तसेच नदीचे पाणी थेट जलकुंभात आणून तेच गावात वितरित केले जाते. परिणामी नागरिकांच्या आरोग्यालाही बाधा पोहचत असते. याबाबत जिल्हा प्रशासनाने गंभीर पाऊले उचललेली नाहीत. परिणामी नागरिकांना आजही दूषित पाणी प्यावे लागत आहे.शुद्ध पाणीपुरवठा होणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. मात्र सांगूनही स्थानिक प्रशासन लक्ष देत नसल्यामुळेच कोच्ची येथील नागरिकांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला. संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. 

टॅग्स :Waterपाणी