शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

वैनगंगेच्या पात्रामुळे ग्रामस्थांचा जीव मुठीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2022 05:00 IST

वैनगंगा नदीचे पात्र दरवर्षी विस्तारत असून पावसाळ्यात तीरावरील गावांतील नागरिकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते. तालुक्यातील रेंगेपार येथे तर भयावर स्थिती आहे. थोडे-थोडे करत आता वैनगंगेचे पात्र गावाजवळ पोहचत आहे. पावसाळ्यात थडी खचत आहे. हा प्रकार गत २० वर्षांपासून होत असला तरी प्रशासनाला केवळ पावसाळ्यात जाग येते. सार्वजनिक बांधकाम विभाग वाहतूक बंदचा फलक लावते. मात्र प्रभावी उपाययोजना केल्या जात नाही.

मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आधीच विशाल असलेले वैनगंगा नदीचे पात्र दरवर्षी विस्तारत असून पावसाळ्यात तीरावरील गावांतील नागरिकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते. तालुक्यातील रेंगेपार येथे तर भयावर स्थिती आहे. थोडे-थोडे करत आता वैनगंगेचे पात्र गावाजवळ पोहचत आहे. पावसाळ्यात थडी खचत आहे. हा प्रकार गत २० वर्षांपासून होत असला तरी प्रशासनाला केवळ पावसाळ्यात जाग येते. सार्वजनिक बांधकाम विभाग वाहतूक बंदचा फलक लावते. मात्र प्रभावी उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे रेंगेपार येथे नदी तीरावर अनेक कुटुंब जीव धोक्यात घालून वास्तव्य करीत आहे. तुमसर तालुक्यातील रेंगेपार गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. दरवर्षी पाण्याचा प्रवाह गावाच्या दिशेने वेगाने येत आहे. त्यामुळे गावातील मुख्य रस्ता नदीजवळ आला. नदी तीरावर नागरिकांची घरे आहेत. काही नागरिक येथून सुरक्षित स्थळी गेले आहेत. तर काही नागरिकांचे वास्तव्य आजही आहे. त्यांना येथे जीव धोक्यात घालून वास्तव्य करावे लागते. गुलाब कावळे, विनोद मारबते पंचफुला मते, मेश्राम या कुटुंबांचे वास्तव नदी तीरावरील घरात आहे. 

अपघातानंतरच प्रशासनाला जाग येईल का?- दरवर्षी पावसाळ्यात प्रशासनाला जाग येते. मात्र जुजबी दुरुस्ती व कारवाई करून सोपस्कार पार पडले जातात. सार्वजनिक बांधकाम विभागाने नदी तीरावर धोक्याच्या सूचनेचा फलक लावलेला आहे. फलकावर जड वाहतूक करू नये, अशा सूचना दिल्या आहे. पूरसदृश परिस्थितीत नदी तीरावर भूस्खलन होऊन काठावरील घरे व रस्ता नदीपात्रात समाविष्ट होण्याची भीती येथे कायम आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा शासन व प्रशासनाला निवेदन दिली. आंदोलने केली. परंतु त्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे कायम दुर्लक्ष होत आहे. अपघातानंतरच प्रशासनाला जाग येईल का असा सवाल गावकरी करीत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात नदीतीरावरील कुटुंब जीव मुठीत घेवून आहेत.

रेंगेपार येथे वैनगंगा नदीपात्र रस्त्याच्या कडेपर्यंत पोहोचले आहे. परंतु अद्यापही नदी तीरावर काही कुटुंबाचे वास्तव्य आहे. प्रशासनाने दाखल घ्यावी. आतापर्यंत अनेकदा तहसीलदारांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि आमदारापासून मंत्र्यांपर्यंत सर्वाना निवेदने दिली. परंतु अद्याप यावर कुणी उपाय योजले नाही.- बन्सीलाल नागपुरे, सरपंच, रेंगेपार.

रेंगेपार येथे पावसाळ्यात अतिशय धोकादायक स्थितीत मार्गक्रमण करावे लागते. गावाच्या दिशेने वैनगंगा नदी झपाट्याने येत आहे. याची माहिती शासन व प्रशासनाला दिली आहे. गावाला बायपास रस्ता नाही. प्रस्ताव पडून आहे. प्रशासनाने उपाययोजना केल्या नाही तर आंदोलन करण्यात येईल. - हिरालाल नागपुरे, उपसभापती, पंचायत समिती तुमसर.

 

टॅग्स :riverनदी