शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

पोलीस तपासावर गावकऱ्यांचा अविश्वास

By admin | Updated: December 29, 2014 01:01 IST

तालुक्यातील खुटसावरी येथे ६ डिसेंबरला झालेल्या हत्या प्रकरणात मोहाडी पोलिस तपास योग्यरित्या करीत नसुन गावकऱ्यांचे म्हणणे ऐकायला तयार नाहीत.

मोहाडी : तालुक्यातील खुटसावरी येथे ६ डिसेंबरला झालेल्या हत्या प्रकरणात मोहाडी पोलिस तपास योग्यरित्या करीत नसुन गावकऱ्यांचे म्हणणे ऐकायला तयार नाहीत. आरोपी महिलेने केलेले दुष्कृत्य बघून तिला जामिन मिळाल्या नंतर गावात राहु देणार नाही. सर्व आरोपिंना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, खुटसावरी येथे पोलिसांची गस्त सुरू करावी आदी मागण्या खुटसावरी येथील गावकऱ्यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केल्या आहेत.पत्र परिषदेला सरपंच देवदास लिल्हारे, तंटामुक्ती अध्यक्ष विजयकुमार पशिने, मिलींद लोणारे, निलुबाई बशिने, बचत गट अध्यक्षा रत्नमाला लिल्हारे, वासुदेव धांडे, रविंद्र धांडे, हिरामण धांडे, लिलाधर वैद्य, तारा उके, रविशा धांडे, गुलाब सेलोकर, शंकर दमाहे सह गावातील नागरिक व बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवुन आरोपींना २४ तासात अटक केली. त्या बद्दल त्यांचे कौतुक करावे से वाटते. मात्र त्यानंतर चौकशीत पोलीसांनी वेळकाढु धोरण अवलंबिले. हत्या झाली त्या दिवशी मृतकाचा साळा घरी होता व त्यानेच खुन झाल्याचे सकाळी सांगितले. मात्र त्याची चौकशी न करता त्याला सोडण्यात आले. मृतकाचा मोबाईल पोलीसांना हस्तगत करता आला नाही. मृतकाच्या पत्नीने आपली साडी लपवून ठेवली होती व त्या साडीवर रक्ताचे डाग होते हे काही गावकऱ्यांनी पाहिले आहे. त्या दिशेने तपास करण्यात आला नाही. मृतकाकडे गळ््यातील गोफ, मंगळसूत्र, दोन आंगठ्या, टॉप्स होते ते कुठे गेले हे पोलीसांनी तपासून बघितले नाही. ते दागीने पोलिसांनी मिळवून द्यावे. मृतकाच्या साळ्याने मोटारसायकल घेवून गेला ती मोटारसायकल मिळवून याची खबरदारी घ्यावी, तसेच या प्रकरणाचा निकाल जलदगतीने लावून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. मृतकाच्या तीन वर्षीय मुलीला शासकीय मदत देण्यात यावी, मातामाय मंदिरात हत्या झाल्याने या मंदिराचे शासकीय खर्चाने शुध्दीकरण करण्यात यावे. तसेच या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा. गावातील प्रत्यक्षदर्शीचे बयाण घेण्यात आलेले नाहीत ते बयाण लवकर घेण्यात यावे. बिट अंमलदार चोपराम निरगुळे यांनी गावात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात यावे आदी मागण्या पत्रपरिषदेत करण्यात आल्या. या मागण्या मंजूर झाल्या नाही तर संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. या प्रकरणात गावकऱ्यांत मोठा रोष असल्याचे जाणवत होते. (शहर प्रतिनिधी)