शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पोलीस तपासावर गावकऱ्यांचा अविश्वास

By admin | Updated: December 29, 2014 01:01 IST

तालुक्यातील खुटसावरी येथे ६ डिसेंबरला झालेल्या हत्या प्रकरणात मोहाडी पोलिस तपास योग्यरित्या करीत नसुन गावकऱ्यांचे म्हणणे ऐकायला तयार नाहीत.

मोहाडी : तालुक्यातील खुटसावरी येथे ६ डिसेंबरला झालेल्या हत्या प्रकरणात मोहाडी पोलिस तपास योग्यरित्या करीत नसुन गावकऱ्यांचे म्हणणे ऐकायला तयार नाहीत. आरोपी महिलेने केलेले दुष्कृत्य बघून तिला जामिन मिळाल्या नंतर गावात राहु देणार नाही. सर्व आरोपिंना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, खुटसावरी येथे पोलिसांची गस्त सुरू करावी आदी मागण्या खुटसावरी येथील गावकऱ्यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केल्या आहेत.पत्र परिषदेला सरपंच देवदास लिल्हारे, तंटामुक्ती अध्यक्ष विजयकुमार पशिने, मिलींद लोणारे, निलुबाई बशिने, बचत गट अध्यक्षा रत्नमाला लिल्हारे, वासुदेव धांडे, रविंद्र धांडे, हिरामण धांडे, लिलाधर वैद्य, तारा उके, रविशा धांडे, गुलाब सेलोकर, शंकर दमाहे सह गावातील नागरिक व बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवुन आरोपींना २४ तासात अटक केली. त्या बद्दल त्यांचे कौतुक करावे से वाटते. मात्र त्यानंतर चौकशीत पोलीसांनी वेळकाढु धोरण अवलंबिले. हत्या झाली त्या दिवशी मृतकाचा साळा घरी होता व त्यानेच खुन झाल्याचे सकाळी सांगितले. मात्र त्याची चौकशी न करता त्याला सोडण्यात आले. मृतकाचा मोबाईल पोलीसांना हस्तगत करता आला नाही. मृतकाच्या पत्नीने आपली साडी लपवून ठेवली होती व त्या साडीवर रक्ताचे डाग होते हे काही गावकऱ्यांनी पाहिले आहे. त्या दिशेने तपास करण्यात आला नाही. मृतकाकडे गळ््यातील गोफ, मंगळसूत्र, दोन आंगठ्या, टॉप्स होते ते कुठे गेले हे पोलीसांनी तपासून बघितले नाही. ते दागीने पोलिसांनी मिळवून द्यावे. मृतकाच्या साळ्याने मोटारसायकल घेवून गेला ती मोटारसायकल मिळवून याची खबरदारी घ्यावी, तसेच या प्रकरणाचा निकाल जलदगतीने लावून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. मृतकाच्या तीन वर्षीय मुलीला शासकीय मदत देण्यात यावी, मातामाय मंदिरात हत्या झाल्याने या मंदिराचे शासकीय खर्चाने शुध्दीकरण करण्यात यावे. तसेच या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा. गावातील प्रत्यक्षदर्शीचे बयाण घेण्यात आलेले नाहीत ते बयाण लवकर घेण्यात यावे. बिट अंमलदार चोपराम निरगुळे यांनी गावात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात यावे आदी मागण्या पत्रपरिषदेत करण्यात आल्या. या मागण्या मंजूर झाल्या नाही तर संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. या प्रकरणात गावकऱ्यांत मोठा रोष असल्याचे जाणवत होते. (शहर प्रतिनिधी)