शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पोलीस तपासावर गावकऱ्यांचा अविश्वास

By admin | Updated: December 29, 2014 01:01 IST

तालुक्यातील खुटसावरी येथे ६ डिसेंबरला झालेल्या हत्या प्रकरणात मोहाडी पोलिस तपास योग्यरित्या करीत नसुन गावकऱ्यांचे म्हणणे ऐकायला तयार नाहीत.

मोहाडी : तालुक्यातील खुटसावरी येथे ६ डिसेंबरला झालेल्या हत्या प्रकरणात मोहाडी पोलिस तपास योग्यरित्या करीत नसुन गावकऱ्यांचे म्हणणे ऐकायला तयार नाहीत. आरोपी महिलेने केलेले दुष्कृत्य बघून तिला जामिन मिळाल्या नंतर गावात राहु देणार नाही. सर्व आरोपिंना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, खुटसावरी येथे पोलिसांची गस्त सुरू करावी आदी मागण्या खुटसावरी येथील गावकऱ्यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केल्या आहेत.पत्र परिषदेला सरपंच देवदास लिल्हारे, तंटामुक्ती अध्यक्ष विजयकुमार पशिने, मिलींद लोणारे, निलुबाई बशिने, बचत गट अध्यक्षा रत्नमाला लिल्हारे, वासुदेव धांडे, रविंद्र धांडे, हिरामण धांडे, लिलाधर वैद्य, तारा उके, रविशा धांडे, गुलाब सेलोकर, शंकर दमाहे सह गावातील नागरिक व बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवुन आरोपींना २४ तासात अटक केली. त्या बद्दल त्यांचे कौतुक करावे से वाटते. मात्र त्यानंतर चौकशीत पोलीसांनी वेळकाढु धोरण अवलंबिले. हत्या झाली त्या दिवशी मृतकाचा साळा घरी होता व त्यानेच खुन झाल्याचे सकाळी सांगितले. मात्र त्याची चौकशी न करता त्याला सोडण्यात आले. मृतकाचा मोबाईल पोलीसांना हस्तगत करता आला नाही. मृतकाच्या पत्नीने आपली साडी लपवून ठेवली होती व त्या साडीवर रक्ताचे डाग होते हे काही गावकऱ्यांनी पाहिले आहे. त्या दिशेने तपास करण्यात आला नाही. मृतकाकडे गळ््यातील गोफ, मंगळसूत्र, दोन आंगठ्या, टॉप्स होते ते कुठे गेले हे पोलीसांनी तपासून बघितले नाही. ते दागीने पोलिसांनी मिळवून द्यावे. मृतकाच्या साळ्याने मोटारसायकल घेवून गेला ती मोटारसायकल मिळवून याची खबरदारी घ्यावी, तसेच या प्रकरणाचा निकाल जलदगतीने लावून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. मृतकाच्या तीन वर्षीय मुलीला शासकीय मदत देण्यात यावी, मातामाय मंदिरात हत्या झाल्याने या मंदिराचे शासकीय खर्चाने शुध्दीकरण करण्यात यावे. तसेच या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा. गावातील प्रत्यक्षदर्शीचे बयाण घेण्यात आलेले नाहीत ते बयाण लवकर घेण्यात यावे. बिट अंमलदार चोपराम निरगुळे यांनी गावात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात यावे आदी मागण्या पत्रपरिषदेत करण्यात आल्या. या मागण्या मंजूर झाल्या नाही तर संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. या प्रकरणात गावकऱ्यांत मोठा रोष असल्याचे जाणवत होते. (शहर प्रतिनिधी)