शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

कालवा दुरुस्तीसाठी ग्रामस्थ एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST

अनेक वर्षाचा कालावधी लोटूनही रावणवाडी कालव्याची दुरुस्ती न झाल्याने गावकऱ्यांनी कंटाळून स्वत: लोकवर्गणीतून कालव्याची दुरुस्ती केली आहे. काही प्रमाणात तरी पाण्याचा अपव्यय टळला आहे. मात्र तरीदेखील सुस्ताव्यवस्थेत झालेल्या पाटबंधारे विभागाला जाग आलेली दिसून येत नाही.

ठळक मुद्देवाकेश्वरच्या नागरिकांचा पुढाकार : पाटबंधारे विभागाच्या मदतीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानाच्या गर्भावस्थेत पाण्याची नितांत गरज असून वाकेश्वर येथील अनेक शेतकरी पाटबंधारे विभागाकडे पाण्याच्या अपव्यय टाळण्यासाठी विनवणी करीत आहे. परंतु अनेक वर्षाचा कालावधी लोटूनही रावणवाडी कालव्याची दुरुस्ती न झाल्याने गावकऱ्यांनी कंटाळून स्वत: लोकवर्गणीतून कालव्याची दुरुस्ती केली आहे. काही प्रमाणात तरी पाण्याचा अपव्यय टळला आहे. मात्र तरीदेखील सुस्ताव्यवस्थेत झालेल्या पाटबंधारे विभागाला जाग आलेली दिसून येत नाही.अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी असतांना देखील यातून मार्ग निघत नसल्याने गावातील बापू डहाके यांनी पुढाकार घेत गावकºयांना मनातील संकल्पना बोलून दाखविली. त्यानुसार गावातील मंदिरात एकत्र येत अनेकानी लोकवर्गणी जमा करुन स्वत: पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पुढाकार घेतला. गावातील गावकºयांच्या पुढाकाराने मुख्य कालव्या वितरिकेला पडलेल्या भगदाडासह इतर ठिकाणच्या दुरुस्तीसाठी जेसीबी बोलावून स्वत: गावकऱ्यांनी श्रमदान करत दोन दिवसात काम पूर्ण केले. गावातील अनेक तरुणांनी यामध्ये उत्स्फुर्त सहभाग घेतला.गावकºयांनी तात्पुरत्या स्वरुपाची जरी दुरुस्ती केली असली तरी लाखो लिटर होणारा पाण्याच्या अपव्यय थांबविण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सरकार पाणी अडवा पाणी जिरवासाठी जनजागृती करीत असले तरी देखील वाकेश्वर येथील गावकऱ्यांनी स्वत:चा आचरणातून कालव्याची दुरुस्ती करीत प्रशासनापुढे एक आदर्श ठेवला आहे. पाटबंधारे विभागाला आतातरी शेतकऱ्यांच्या दु:खाची जाणीव होणार काय? असा प्रश्न शेतकरी विचारीत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक