शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

कालवा दुरुस्तीसाठी ग्रामस्थ एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST

अनेक वर्षाचा कालावधी लोटूनही रावणवाडी कालव्याची दुरुस्ती न झाल्याने गावकऱ्यांनी कंटाळून स्वत: लोकवर्गणीतून कालव्याची दुरुस्ती केली आहे. काही प्रमाणात तरी पाण्याचा अपव्यय टळला आहे. मात्र तरीदेखील सुस्ताव्यवस्थेत झालेल्या पाटबंधारे विभागाला जाग आलेली दिसून येत नाही.

ठळक मुद्देवाकेश्वरच्या नागरिकांचा पुढाकार : पाटबंधारे विभागाच्या मदतीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानाच्या गर्भावस्थेत पाण्याची नितांत गरज असून वाकेश्वर येथील अनेक शेतकरी पाटबंधारे विभागाकडे पाण्याच्या अपव्यय टाळण्यासाठी विनवणी करीत आहे. परंतु अनेक वर्षाचा कालावधी लोटूनही रावणवाडी कालव्याची दुरुस्ती न झाल्याने गावकऱ्यांनी कंटाळून स्वत: लोकवर्गणीतून कालव्याची दुरुस्ती केली आहे. काही प्रमाणात तरी पाण्याचा अपव्यय टळला आहे. मात्र तरीदेखील सुस्ताव्यवस्थेत झालेल्या पाटबंधारे विभागाला जाग आलेली दिसून येत नाही.अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी असतांना देखील यातून मार्ग निघत नसल्याने गावातील बापू डहाके यांनी पुढाकार घेत गावकºयांना मनातील संकल्पना बोलून दाखविली. त्यानुसार गावातील मंदिरात एकत्र येत अनेकानी लोकवर्गणी जमा करुन स्वत: पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पुढाकार घेतला. गावातील गावकºयांच्या पुढाकाराने मुख्य कालव्या वितरिकेला पडलेल्या भगदाडासह इतर ठिकाणच्या दुरुस्तीसाठी जेसीबी बोलावून स्वत: गावकऱ्यांनी श्रमदान करत दोन दिवसात काम पूर्ण केले. गावातील अनेक तरुणांनी यामध्ये उत्स्फुर्त सहभाग घेतला.गावकºयांनी तात्पुरत्या स्वरुपाची जरी दुरुस्ती केली असली तरी लाखो लिटर होणारा पाण्याच्या अपव्यय थांबविण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सरकार पाणी अडवा पाणी जिरवासाठी जनजागृती करीत असले तरी देखील वाकेश्वर येथील गावकऱ्यांनी स्वत:चा आचरणातून कालव्याची दुरुस्ती करीत प्रशासनापुढे एक आदर्श ठेवला आहे. पाटबंधारे विभागाला आतातरी शेतकऱ्यांच्या दु:खाची जाणीव होणार काय? असा प्रश्न शेतकरी विचारीत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक