शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

विविध मागण्यांसाठी विदर्भवादी शेतकरी संघर्ष समिती आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 05:00 IST

परतीच्या पावसाने जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच धान पिकाचेही रोग व किडीमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच धानाचा बोनस जाहीर करावा, धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे, कर्जमुक्ती योजना चालू खातेदार शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन देण्याच्या आश्वासनानुसार तत्काळ लाभ देण्याची मागणी विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यातच परतीच्या पावसाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच जिल्ह्यातील उमेद अभियानांतर्गत काम करणाऱ्या स्थानिक पातळीवरील कर्मचाऱ्यांचे पंधरा महिन्यांचे मानधन तत्काळ देण्यात यावे, तसेच वृद्ध श्रावणबाळ लाभार्थी, दिव्यांग निराधारांचे थकीत मानधन दिवाळीपूर्वी तत्काळ देण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी विदर्भवादीशेतकरी संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारासमोर आंदोलन केले होते. यावेळी सल्लागार ईश्वर नंदागवळी यांनी शासनाला वारंवार निवेदन देऊनही निराधारांचे मानधन, तसेच उमेद अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी टाळाटाळ होत असल्याचे सांगितले. यावेळी शासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक अडचणी महिलांना येत असून, विदर्भवादीशेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी यावेळी संतप्त झाले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी राज्यस्तरावर या समस्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी संदीप कदम यांना विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सदानंद धारगावे, उपाध्यक्ष यादव मेंगरे, सल्लागार ईश्वर नंदागवळी, धनराज इखार, दिगंबर गिरडकर, बाबूराव सुखदेवे, सहसचिव बबन सहारे, सदस्य देवीदास धारगावे, यादव इखार, मुन्ना मुंडले, राजू मेश्राम, सुनीता मेश्राम, चंदू मेश्राम, चंदू सावरबांधे, वामन रामटेके, रवी गणवीर यांच्या उपस्थितीत  शेतकरी, महिला, उमेदच्या कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले. भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने केलेल्या आंदोलनामध्ये उमेद अभियानांतर्गत काम करणाऱ्या ग्राम प्रेरिका बँक, सखी, पशूसखी, सखी, वर्धिनी, प्रवर कृषी व्यवस्थापक यांचे गेल्या वर्षभरापासूनचे मानधन तत्काळ दिवाळीपूर्वी देण्यात यावे, तसेच वृद्ध निराधार, श्रावणबाळ, दिव्यांग, निराधारांचे तीन चार महिन्यांपासूनचे थकीत मानधन तत्काळ द्यावे, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच धान पिकाचेही रोग व किडीमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच धानाचा बोनस जाहीर करावा, धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे, कर्जमुक्ती योजना चालू खातेदार शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन देण्याच्या आश्वासनानुसार तत्काळ लाभ देण्याची मागणी विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. यावेळी शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या विविध मागण्या जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे तत्काळ पोहोचवून शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील उमेद अभियान कर्मचारी, तसेच वृद्ध निराधारांना दिवाळीपूर्वी मानधन द्यावे, अन्यथा पुन्हा एकदा विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

 

टॅग्स :Vidarbhaविदर्भFarmerशेतकरी