शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

रिफ्लेक्टरविना धावताहेत वाहने

By admin | Updated: October 30, 2014 22:46 IST

वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने होत असलेल्या अपघाताची संख्या लक्षणीय आहे. एकूण अपघातांपैकी ७0 ते ८0 टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याचे एका सर्वेक्षणात उघड झाले आहे.

भंडारा : वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने होत असलेल्या अपघाताची संख्या लक्षणीय आहे. एकूण अपघातांपैकी ७0 ते ८0 टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याचे एका सर्वेक्षणात उघड झाले आहे. हे अपघात टाळता येणे शक्य आहे. असे असतानाही वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळत आहे. भंडारा शहर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असून या मार्गावर अनेक वाहने विनारिफ्लेक्टर धावतात. यावर कारवाईची मागणी होत आहे.शहरात चौकाचौकात उभे राहणारे पोलीसही या छोट्या-छोटया परंतु महत्त्वाच्या गोंष्टींकडे दुर्लक्ष करीत असल्याने अपघातात वाढच होत आहे. शहरातील रस्त्यांवर व महामार्गावर अनेक जड वाहनांना पुढचे किंवा मागचे दिवे नसतात. मागे परावर्तक (रिफ्लेक्टर) नसतात. काहींच्या वाहनातील लोखंडी सळ्या किंवा वाहनातील अवजड यंत्राचा लांबुळका भाग बाहेर आलेला असतो आणि तो रात्री अगदी जवळ आल्याशिवाय मागच्या वाहनचालकाच्या लक्षात येत नाही. नियमानुसार वाहनाच्या दोन्ही बाजूंनी किंवा मोठे वाहन असल्यास चारही बाजूंनी रिफ्लेक्टर किंवा रेडियम पट्टी लावणे अत्यावश्यक आहे. पण प्रत्येक टप्प्यावर समांतर पोलीस व्यवस्थेचा खासगी कर भरल्यामुळे अशा वाहनांना कुणीच अडवत नाही. याउलट दिवसा चौकाचौकात आणि महामार्गावर उभे राहणारे पोलिसही याकडे विशेष लक्ष देत नाही. यामुळे टेललॅम्प बंद असलेल्या व रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना मागील बाजूने दुसऱ्या वाहनांने धडक देण्याच्या घटना वाढतच आहे. तज्ज्ञाच्या मते, जकात नाक्यावर किंवा शहरात चौररस्त्यावर वाहन थांबते, तेव्हा टेललॅम्प किंवा रिफ्लेक्टरची तपासणी करायची व ते बंद असतील तर तातडीने दंड आकारून ते सुरू करुन देण्याची व बसविण्याची मोहीम राबविणे आवश्यक आहे, मात्र संबंधित विभाग याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व वाहतूक विभाग रस्ता सुरक्षा पंधरवड्यातच वाहतुकीचे नियम पाळण्याचा आग्रह करतात. या दिवसांत रेडियम पट्टी लावण्याची मोहिमही राबविली जाते. ज्या वाहनांना ही पट्टी किंवा रिफ्लेक्टर नसतात अशा वाहनांना थांबवून ते लावतात. परंतु त्याचवेळी त्या वाहनांवर कारवाई होताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे हा पंधरवाडा आटोपताच हे दोन्ही, विभाग महसूल गोळा करण्यात व्यस्त होतात. यामुळे वाहनचालकांनी जबाबदारी म्हणून स्वत:हूनच याची दक्षता घेण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)