शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

भाजीपाला पिकाचे दर घसरले, शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:34 IST

शीर्षक हेच वास्तव आहे. चाळीस हजारांपासून एक लाख किलोपर्यंत टोमॅटोचे बियाणे विकत घेऊन रोपवाटिका तयार करून शेतकरी लागवड करतात. ...

शीर्षक हेच वास्तव आहे. चाळीस हजारांपासून एक लाख किलोपर्यंत टोमॅटोचे बियाणे विकत घेऊन रोपवाटिका तयार करून शेतकरी लागवड करतात. यासाठी शेतकऱ्यांना अतोनात खर्च येतो. रासायनिक खत, कीटकनाशक, मजुरी आदी खर्चाने शेतकऱ्यांचे खिसे खाली होतात. आशा एकच असते, पीक विकून दोन पैसे मिळतील. परंतु तेही नाही. कारण सध्या टोमॅटोचा भाव ३० ते ५० रुपये कॅरेट बाजारात आहे, जवळपास एक ते दीड रुपये किलो. त्यामागेही तोडण्यासाठी मजुरी, बाजारात नेण्याकरिता गाडी भाडे, बाजार चिठ्ठी, हमाली अशा विविध खर्चाने शेतकऱ्याच्या हातात एकही पैसा उरत नाही व त्याचा माल फुकट जातो. काहींचा टोमॅटो शेतातच सडतोय. याकडे शासनाचे लक्ष जाईल काय?

त्याला कष्टाचा मोबदलाही धड मिळत नाही. टोमॅटोप्रमाणे पत्ताकोबी, वांग्याचेही बेहाल आहेत. पीक विकावे तरी कुठे? या विवंचनेत शेतकरी गुंतला असून कर्जबाजारी झाला आहे. आता करावे तरी काय, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे सतत भेडसावत आहे.

शेतकरी समोर न जाता मागेच येत आहे. पाच एकर जमिनीच्या उत्पन्नात शेतकरी वर्षभर परिवारासह उदरनिर्वाह करू शकत नाही, उलट मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होतो. कारण एक रुपयाचे उत्पन्न तर दीड रुपये खर्च, अशी स्थिती आहे. शंभरातून दोन शेतकऱ्यांना फायदा व अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना नुकसान म्हणून शेतकऱ्यांची लेकरे लहान-मोठी नोकरीच बरी म्हणतात. शेतकऱ्यांच्या वाली कुणी नाही. त्यांचे अश्रू पुसायला कोण धावेल, कुणी नाही. उलट एखाद्या वेळी भाजीपाला बाजार भाव वाढले, तर जिकडे-तिकडे हाहाकार, याबाबत पवनारा, बघेडा, लोहारा आदी गावांतील शेतकऱ्यांच्या मुखातून वास्तविकता ऐकायला मिळाली आहे.