शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

भाजीपाला पिकाचे दर घसरले, शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:34 IST

शीर्षक हेच वास्तव आहे. चाळीस हजारांपासून एक लाख किलोपर्यंत टोमॅटोचे बियाणे विकत घेऊन रोपवाटिका तयार करून शेतकरी लागवड करतात. ...

शीर्षक हेच वास्तव आहे. चाळीस हजारांपासून एक लाख किलोपर्यंत टोमॅटोचे बियाणे विकत घेऊन रोपवाटिका तयार करून शेतकरी लागवड करतात. यासाठी शेतकऱ्यांना अतोनात खर्च येतो. रासायनिक खत, कीटकनाशक, मजुरी आदी खर्चाने शेतकऱ्यांचे खिसे खाली होतात. आशा एकच असते, पीक विकून दोन पैसे मिळतील. परंतु तेही नाही. कारण सध्या टोमॅटोचा भाव ३० ते ५० रुपये कॅरेट बाजारात आहे, जवळपास एक ते दीड रुपये किलो. त्यामागेही तोडण्यासाठी मजुरी, बाजारात नेण्याकरिता गाडी भाडे, बाजार चिठ्ठी, हमाली अशा विविध खर्चाने शेतकऱ्याच्या हातात एकही पैसा उरत नाही व त्याचा माल फुकट जातो. काहींचा टोमॅटो शेतातच सडतोय. याकडे शासनाचे लक्ष जाईल काय?

त्याला कष्टाचा मोबदलाही धड मिळत नाही. टोमॅटोप्रमाणे पत्ताकोबी, वांग्याचेही बेहाल आहेत. पीक विकावे तरी कुठे? या विवंचनेत शेतकरी गुंतला असून कर्जबाजारी झाला आहे. आता करावे तरी काय, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे सतत भेडसावत आहे.

शेतकरी समोर न जाता मागेच येत आहे. पाच एकर जमिनीच्या उत्पन्नात शेतकरी वर्षभर परिवारासह उदरनिर्वाह करू शकत नाही, उलट मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होतो. कारण एक रुपयाचे उत्पन्न तर दीड रुपये खर्च, अशी स्थिती आहे. शंभरातून दोन शेतकऱ्यांना फायदा व अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना नुकसान म्हणून शेतकऱ्यांची लेकरे लहान-मोठी नोकरीच बरी म्हणतात. शेतकऱ्यांच्या वाली कुणी नाही. त्यांचे अश्रू पुसायला कोण धावेल, कुणी नाही. उलट एखाद्या वेळी भाजीपाला बाजार भाव वाढले, तर जिकडे-तिकडे हाहाकार, याबाबत पवनारा, बघेडा, लोहारा आदी गावांतील शेतकऱ्यांच्या मुखातून वास्तविकता ऐकायला मिळाली आहे.