शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

भाजीपाला पिकाचे दर घसरले, शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:34 IST

शीर्षक हेच वास्तव आहे. चाळीस हजारांपासून एक लाख किलोपर्यंत टोमॅटोचे बियाणे विकत घेऊन रोपवाटिका तयार करून शेतकरी लागवड करतात. ...

शीर्षक हेच वास्तव आहे. चाळीस हजारांपासून एक लाख किलोपर्यंत टोमॅटोचे बियाणे विकत घेऊन रोपवाटिका तयार करून शेतकरी लागवड करतात. यासाठी शेतकऱ्यांना अतोनात खर्च येतो. रासायनिक खत, कीटकनाशक, मजुरी आदी खर्चाने शेतकऱ्यांचे खिसे खाली होतात. आशा एकच असते, पीक विकून दोन पैसे मिळतील. परंतु तेही नाही. कारण सध्या टोमॅटोचा भाव ३० ते ५० रुपये कॅरेट बाजारात आहे, जवळपास एक ते दीड रुपये किलो. त्यामागेही तोडण्यासाठी मजुरी, बाजारात नेण्याकरिता गाडी भाडे, बाजार चिठ्ठी, हमाली अशा विविध खर्चाने शेतकऱ्याच्या हातात एकही पैसा उरत नाही व त्याचा माल फुकट जातो. काहींचा टोमॅटो शेतातच सडतोय. याकडे शासनाचे लक्ष जाईल काय?

त्याला कष्टाचा मोबदलाही धड मिळत नाही. टोमॅटोप्रमाणे पत्ताकोबी, वांग्याचेही बेहाल आहेत. पीक विकावे तरी कुठे? या विवंचनेत शेतकरी गुंतला असून कर्जबाजारी झाला आहे. आता करावे तरी काय, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे सतत भेडसावत आहे.

शेतकरी समोर न जाता मागेच येत आहे. पाच एकर जमिनीच्या उत्पन्नात शेतकरी वर्षभर परिवारासह उदरनिर्वाह करू शकत नाही, उलट मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होतो. कारण एक रुपयाचे उत्पन्न तर दीड रुपये खर्च, अशी स्थिती आहे. शंभरातून दोन शेतकऱ्यांना फायदा व अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना नुकसान म्हणून शेतकऱ्यांची लेकरे लहान-मोठी नोकरीच बरी म्हणतात. शेतकऱ्यांच्या वाली कुणी नाही. त्यांचे अश्रू पुसायला कोण धावेल, कुणी नाही. उलट एखाद्या वेळी भाजीपाला बाजार भाव वाढले, तर जिकडे-तिकडे हाहाकार, याबाबत पवनारा, बघेडा, लोहारा आदी गावांतील शेतकऱ्यांच्या मुखातून वास्तविकता ऐकायला मिळाली आहे.