शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

नवीन राष्ट्रीय महामार्ग ठरतोय वृक्षांचा कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 21:30 IST

रस्त्यामुळे दळणवळणाच्या सोयी उपलब्ध होवून विकासात महत्वपूर्ण भूमिका बजविते. सध्या मनसर-गोंदिया दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम जोमात सुरू आहे. दरम्यान रस्त्यालगतच्या झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. रामटेक-खापा रस्त्यावर हा प्रकार दिसत आहे. सातपुडा पर्वत रांगामधून हा रस्ता जात असल्याने हजारो वृक्षांचा बळी करावा लागणार काय, असा प्रश्न पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देरस्त्यालगतच्या झाडांची कत्तल : रामटेक-तुमसर रस्त्यावरील प्रकार, विकासाकरिता वृक्षांचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रस्त्यामुळे दळणवळणाच्या सोयी उपलब्ध होवून विकासात महत्वपूर्ण भूमिका बजविते. सध्या मनसर-गोंदिया दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम जोमात सुरू आहे. दरम्यान रस्त्यालगतच्या झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. रामटेक-खापा रस्त्यावर हा प्रकार दिसत आहे. सातपुडा पर्वत रांगामधून हा रस्ता जात असल्याने हजारो वृक्षांचा बळी करावा लागणार काय, असा प्रश्न पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे.मनसर-रामटेक-तुमसर-गोंदिया हा यापूर्वी राज्यमार्ग होता. सदर रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ करण्यात आला. मनसर ते बालाघाट-शिवनी असा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. सध्या रस्ता बंद करण्याकरिता दोन्ही बाजूला खोदकाम करणे सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लहान मोठी वृक्ष आहेत. सदर वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. रामटेकपासून सातपुडा पर्वत रांगा सुरू होतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला येथे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने वृक्ष असल्याने त्यांची कत्तल केली जात असल्याने पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.तुमसर तालुक्यातील खापा-तुमसर-गोंदिया रस्त्याशेजारी यापूर्वी सामाजिक वनीकरण व वनविभागाने वृक्ष लागवड केली होती. सदर वृक्ष राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथडा येत असल्याने कापण्यात आले. गावातील शेतजमिनी, घरे यांची शासनस्तरावरून भुसंपादनाची कारवाई संथगतीने सुरू आहे. खापा चौकातील लहान मोठे हॉटेल व्यावसायीकांचे धाबे दणाणले असून काही घरमालकांचे घरे पाडणार व संसार उघड्यावर येईल काय, याची चिंता त्यांना भेडसावित आहे. खापा, मांगली, देव्हाडी, माडगी, काटेबाम्हणी, उसर्रा, धोप या गावांना जास्त फटका बसणार आहे.पर्यावरणाला धोका पोहोचू नये याकरिता पर्यावरणपूरक बाबीकडे वृक्ष लागवड लक्ष देण्याची गरज आहे.रस्त्या शेजारील वृक्षांची कत्तल करण्यात आली. सध्या रस्त्याचे कामे सुरू करण्यात आली. कामादरम्यान नागरिकांना धुळीचा आरोग्यावर परिणाम होणार नाही. त्याकरिता उपाययोजना करावी, जेवढ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली तेवढ्याच वृक्षाची लागवड करावी.-विठ्ठलराव कहालकर,अध्यक्ष, राकाँ, तुमसर- मोहाडी