शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

नवीन राष्ट्रीय महामार्ग ठरतोय वृक्षांचा कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 21:30 IST

रस्त्यामुळे दळणवळणाच्या सोयी उपलब्ध होवून विकासात महत्वपूर्ण भूमिका बजविते. सध्या मनसर-गोंदिया दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम जोमात सुरू आहे. दरम्यान रस्त्यालगतच्या झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. रामटेक-खापा रस्त्यावर हा प्रकार दिसत आहे. सातपुडा पर्वत रांगामधून हा रस्ता जात असल्याने हजारो वृक्षांचा बळी करावा लागणार काय, असा प्रश्न पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देरस्त्यालगतच्या झाडांची कत्तल : रामटेक-तुमसर रस्त्यावरील प्रकार, विकासाकरिता वृक्षांचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रस्त्यामुळे दळणवळणाच्या सोयी उपलब्ध होवून विकासात महत्वपूर्ण भूमिका बजविते. सध्या मनसर-गोंदिया दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम जोमात सुरू आहे. दरम्यान रस्त्यालगतच्या झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. रामटेक-खापा रस्त्यावर हा प्रकार दिसत आहे. सातपुडा पर्वत रांगामधून हा रस्ता जात असल्याने हजारो वृक्षांचा बळी करावा लागणार काय, असा प्रश्न पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे.मनसर-रामटेक-तुमसर-गोंदिया हा यापूर्वी राज्यमार्ग होता. सदर रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ करण्यात आला. मनसर ते बालाघाट-शिवनी असा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. सध्या रस्ता बंद करण्याकरिता दोन्ही बाजूला खोदकाम करणे सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लहान मोठी वृक्ष आहेत. सदर वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. रामटेकपासून सातपुडा पर्वत रांगा सुरू होतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला येथे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने वृक्ष असल्याने त्यांची कत्तल केली जात असल्याने पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.तुमसर तालुक्यातील खापा-तुमसर-गोंदिया रस्त्याशेजारी यापूर्वी सामाजिक वनीकरण व वनविभागाने वृक्ष लागवड केली होती. सदर वृक्ष राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथडा येत असल्याने कापण्यात आले. गावातील शेतजमिनी, घरे यांची शासनस्तरावरून भुसंपादनाची कारवाई संथगतीने सुरू आहे. खापा चौकातील लहान मोठे हॉटेल व्यावसायीकांचे धाबे दणाणले असून काही घरमालकांचे घरे पाडणार व संसार उघड्यावर येईल काय, याची चिंता त्यांना भेडसावित आहे. खापा, मांगली, देव्हाडी, माडगी, काटेबाम्हणी, उसर्रा, धोप या गावांना जास्त फटका बसणार आहे.पर्यावरणाला धोका पोहोचू नये याकरिता पर्यावरणपूरक बाबीकडे वृक्ष लागवड लक्ष देण्याची गरज आहे.रस्त्या शेजारील वृक्षांची कत्तल करण्यात आली. सध्या रस्त्याचे कामे सुरू करण्यात आली. कामादरम्यान नागरिकांना धुळीचा आरोग्यावर परिणाम होणार नाही. त्याकरिता उपाययोजना करावी, जेवढ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली तेवढ्याच वृक्षाची लागवड करावी.-विठ्ठलराव कहालकर,अध्यक्ष, राकाँ, तुमसर- मोहाडी