शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नवीन राष्ट्रीय महामार्ग ठरतोय वृक्षांचा कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 21:30 IST

रस्त्यामुळे दळणवळणाच्या सोयी उपलब्ध होवून विकासात महत्वपूर्ण भूमिका बजविते. सध्या मनसर-गोंदिया दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम जोमात सुरू आहे. दरम्यान रस्त्यालगतच्या झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. रामटेक-खापा रस्त्यावर हा प्रकार दिसत आहे. सातपुडा पर्वत रांगामधून हा रस्ता जात असल्याने हजारो वृक्षांचा बळी करावा लागणार काय, असा प्रश्न पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देरस्त्यालगतच्या झाडांची कत्तल : रामटेक-तुमसर रस्त्यावरील प्रकार, विकासाकरिता वृक्षांचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रस्त्यामुळे दळणवळणाच्या सोयी उपलब्ध होवून विकासात महत्वपूर्ण भूमिका बजविते. सध्या मनसर-गोंदिया दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम जोमात सुरू आहे. दरम्यान रस्त्यालगतच्या झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. रामटेक-खापा रस्त्यावर हा प्रकार दिसत आहे. सातपुडा पर्वत रांगामधून हा रस्ता जात असल्याने हजारो वृक्षांचा बळी करावा लागणार काय, असा प्रश्न पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे.मनसर-रामटेक-तुमसर-गोंदिया हा यापूर्वी राज्यमार्ग होता. सदर रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ करण्यात आला. मनसर ते बालाघाट-शिवनी असा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. सध्या रस्ता बंद करण्याकरिता दोन्ही बाजूला खोदकाम करणे सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लहान मोठी वृक्ष आहेत. सदर वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. रामटेकपासून सातपुडा पर्वत रांगा सुरू होतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला येथे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने वृक्ष असल्याने त्यांची कत्तल केली जात असल्याने पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.तुमसर तालुक्यातील खापा-तुमसर-गोंदिया रस्त्याशेजारी यापूर्वी सामाजिक वनीकरण व वनविभागाने वृक्ष लागवड केली होती. सदर वृक्ष राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथडा येत असल्याने कापण्यात आले. गावातील शेतजमिनी, घरे यांची शासनस्तरावरून भुसंपादनाची कारवाई संथगतीने सुरू आहे. खापा चौकातील लहान मोठे हॉटेल व्यावसायीकांचे धाबे दणाणले असून काही घरमालकांचे घरे पाडणार व संसार उघड्यावर येईल काय, याची चिंता त्यांना भेडसावित आहे. खापा, मांगली, देव्हाडी, माडगी, काटेबाम्हणी, उसर्रा, धोप या गावांना जास्त फटका बसणार आहे.पर्यावरणाला धोका पोहोचू नये याकरिता पर्यावरणपूरक बाबीकडे वृक्ष लागवड लक्ष देण्याची गरज आहे.रस्त्या शेजारील वृक्षांची कत्तल करण्यात आली. सध्या रस्त्याचे कामे सुरू करण्यात आली. कामादरम्यान नागरिकांना धुळीचा आरोग्यावर परिणाम होणार नाही. त्याकरिता उपाययोजना करावी, जेवढ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली तेवढ्याच वृक्षाची लागवड करावी.-विठ्ठलराव कहालकर,अध्यक्ष, राकाँ, तुमसर- मोहाडी