शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

वरठी-भंडारा महामार्ग ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

भंडारा ते वरठी या मार्गावर आयएमए हॉल, नवीन टाकळी (आयटीआय), गणेश नगरी, दाभा मोड, पाचगाव फाटा, जगनाडे चौक ते रेल्वेस्थानका पर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना अडथळ्याची शर्यत पार करावा लागते. वेळेवर पोहोचणे अवघड झाले आहे . वरठी येथे जिल्ह्याचे मुख्य रेल्वे स्टेशन व सनफ्लॅग स्टील कारखाना आहे. या मार्गावर दिवसभर रहदारी असते.

ठळक मुद्देअपघाताची शक्यता : मार्गाची दुरवस्था, रहदारीला त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : भंडारा ते वरठी व मोहाडी हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून दररोज शेकडो वाहने या रस्त्याने धावतात. दररोज विविध कामाने नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागते. परंतु, या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून अपघाताची शक्यता बळावली आहे. मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.भंडारा ते वरठी या मार्गावर आयएमए हॉल, नवीन टाकळी (आयटीआय), गणेश नगरी, दाभा मोड, पाचगाव फाटा, जगनाडे चौक ते रेल्वेस्थानका पर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना अडथळ्याची शर्यत पार करावा लागते. वेळेवर पोहोचणे अवघड झाले आहे . वरठी येथे जिल्ह्याचे मुख्य रेल्वे स्टेशन व सनफ्लॅग स्टील कारखाना आहे. या मार्गावर दिवसभर रहदारी असते.हा राज्यमार्ग तुमसरवरून मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यांना जोडतो. त्यामुळे वाहनांचा सतत राबता असतो. भंडारा- वरठीचे अंतर ११ किलोमीटर आहे. या रस्त्याची ठिकठिकाणी चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनांचे टायर पंक्चर होण्याचा प्रकार दररोज बडत आहे. या समस्येमुळे दुचाकीचालक अस्त झाले आहेत. बहुतेक ठिकाणी एका बाजूने रस्ता खराब असल्याने वाहन चालक चुकीच्या बाजूने वाहने चालवतात. त्यामुळे किरकोळ अपघातही घडले आहेत. पावसामुळे खड्ड्यांचा अंदाजही येत नाही. या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरीक करीत आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता खराब झाला असून, या मार्गावरून प्रवास करणे त्रासदायक ठरत आहे. वाहनचालक नवीन वाहन घेताना रोड टॅक्स भरतात. शासन आमच्याकडून रस्त्यासाठी पैसे वसूल करते, मग खड्डे का बुजवत नाही. खराब रस्त्यांमुळे दररोज या परीसरात मोठे अपघात होत आहेत. अपघातास कारणीभूत ठरणाºया, दुरुस्तीकडे निष्काळजीपणा दाखविणान्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा.- धनपाल सार्वे, वरठी

टॅग्स :highwayमहामार्ग