शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शहीदांना वाहिली आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 05:00 IST

पोलीस अधीक्षक वसंत जाधव म्हणाले, आजचा दिवस पोलीस प्रशासनासाठी अत्याधिक महत्वाचा दिवस आहे. यावर्षी देखील संपुर्ण भारतातून एकुण २६८ पोलीस अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावीत असतांना आपल्या मातृभुमीच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिली आहे. त्यांना शतश: वंदन असे बोलून शहीद पोलीसांच्या स्मृतिंना उजाळा दिला.

ठळक मुद्देभंडारा येथे पोलीस हुतात्मा दिवस : ३० फैरी झाडून पोलीस मुख्यालयात दिली मानवंदना

लोकमत न्यूज नेटवर्कभंंडारा : कर्तव्य पथावर अग्रेसर होत असता हौतात्म्य पत्करणाऱ्या वीर पोलीस जवानांची आठवण म्हणून संपूर्ण देशभर पोलीस प्रशासनाद्वारे २१ ऑक्टोबर हा पोलीस हुताम्या स्मृती दिवस म्हणुन पाळला जातो. त्यानिमित्ताने बुधवारला पोलीस मुख्यालयातपोलीस हुतात्मा स्मारक स्मृतिस्तभं येथे सकाळी ८ वाजता श्रध्दांजली व शोक सलामीचे आयोजन करण्यात आले.जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या उपस्थितीत अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू, आर.पी. देशपांडे आदी उपस्थित होते.यावेळी पोलीस अधीक्षक वसंत जाधव म्हणाले, आजचा दिवस पोलीस प्रशासनासाठी अत्याधिक महत्वाचा दिवस आहे. यावर्षी देखील संपुर्ण भारतातून एकुण २६८ पोलीस अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावीत असतांना आपल्या मातृभुमीच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिली आहे. त्यांना शतश: वंदन असे बोलून शहीद पोलीसांच्या स्मृतिंना उजाळा दिला. तसेच २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लद्दाख हद्दीत भारत तिबेट सीमेवर १६ हजार फुट उंचावर कडाक्याच्या थंडीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे १० शिपाई गस्त घालत असताना हिंदी-चिनी भाई भाई असा नारा लावणाऱ्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर अकस्मात हल्ला केला. याची चाहूल लागताच सीमेच्या रक्षणार्थ अपुरे मनुष्यबळ व अपुरे शस्त्रे असल्याची पर्वा न करता जवानांनी मातृभूमीसाठी प्राणपणाने लढून हौतात्म्य पत्करले.त्यांच्यावर पोलिस इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना घडली. त्या हॉट्रस्प्रिंग येथे या वीरांचे स्मारक उभारले आहे. तेव्हापासून हा दिवस पोलिस हुतात्मादिन/ पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. तेथे संपूर्ण भारतातील पोलीसांनी या विराचे स्मारक उभारले आहेत. स्मारकावर शब्द अंकीत आहेत. सदर प्रसंगी पोलीस अधिक्षक वसंत जाधव व अपर पोलीस अनिकेत भारती, रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी पोलीस उपअधिक्षक देशपांडे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहीली.अग्नीशस्त्राद्वारे ३० काडतूसांच्या फैरी झाडून शोक सलामी देण्यात आली. तसेच पोलीस बॅन्ड पथक यांनी राष्ट्रभक्तीपर गितांच्या धुन वाजवुन श्रध्दांजली अर्पण केली. ह्यपोलीस हा समाजातील एकमेव घटक आहे. जो दिवस रात्र आपल्यासाठी सज्ज असतो. १५ ऑगस्ट १९४९ पासुन शहीद झालेल्या सर्व शूर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली देण्यात आली.सदर प्रसंगी कर्तव्य बजावतांना शहीद झालेल्या शहीदांची नावे रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी यांनी वाचन केले तसेच भंडारा जिल्ह्यातील शहीद पोलीस अधिकारी/कर्मचारी पोलीस उपनिरिक्षक दिपक सखराम रहिले, पोलीस हवालदार योगेश्वर हेडावू, पोलीस शिपाई शिवलाल बरैया, पोलीस शिपाई दामोधर वडतकर, रविकुमार जौंजाळ, ईशांतकुमार भुरे, भोजराज शंकर बांभरे, मुलचंद भोयर, मनोज गिऱ्हेपुंजे, पोलीस हवालदार . विश्वनाथ बोरकर, पोलीस शिपाई जयपाल शेळके, स.फौ. शराफा हुसैन पठाण, पो.हवा. सुनिल मेश्राम यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हातील शहिद अधिकारी व कर्मचारी यांचे कुटूंबीय सदर कार्यक्रमात उपस्थित होते.सदर कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक मानकर, पोलीस निरिक्षक स्थागुशाखेचे गजानन कंकाळे, बन्सोडे, ताजणे, चंद्रशेखर चकाटे, पाटील, क्रिष्णा हत्तीमारे, गायकवाड, पवार, कतलाम, प्रशांत मिसाळे, तुरकुडे, माळी, वर्मा, पवनसिंग, सर्व शाखेचे, पोलीस मुख्यालय येथील कर्मचारी तसेच पोलीसांचे कुटूंबिय हजर होते.

टॅग्स :Policeपोलिस