शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

वज्राघातापासून बचाव आवश्यक

By admin | Updated: June 23, 2017 00:25 IST

जिल्हयात मागील काही वषार्पासून वज्राघाताचे प्रमाण अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये

सतर्कता हवी : जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा जनजागृतीसाठी पुढाकारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हयात मागील काही वषार्पासून वज्राघाताचे प्रमाण अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये याबाबत सुरक्षिततेच्या दृष्टीने जागृती व्हावी व वज्राघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे व काय करु नये या विषयी सावधानता बाळगण्यासाठी काळजी याप्रमाणे घ्यावी.पावसाळयाच्या दिवसात शेतात असतांना शेता जवळील घराचा त्वरीत आसरा घ्यावा. पाण्यात असाल तर तात्काळ बाहेर या. झाडाच्या उंचीपेक्षा झाडापासून दुप्पट अंतरावर उभे रहा. ओल्या शेतात रोप लावण्याचे व अन्य काम करणाऱ्या व्यक्ती अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्ती यांनी तात्काळ कोरडया व सुरक्षित ठिकाणी जावे. शेतात काम करीता असाल तर सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतला नेसल तर शक्यतो जिथे आहात तिथेच रहा. शक्य असेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपट अशा वस्तु अथवा कोरडा पाला पाचोडा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवा, तथापि डोके जमिनीवर ठेवू नका. धातूपासून बनलेल्या वस्तु जसे कृषि यंत्रा पासून दुर रहा. गाव, शेत, आवार, बाग-बगीचा आणि घर यांच्या भोवती तारेचे कुंपन घालू नका. ते विजेला सहजतेने आकर्षित करतो. धातुची दांडीमुठ असलेल्या छत्रीचा उपयोग करु नका. विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका, झाडाखाली उभे राहू नका तसेच उंच जागेवर, झाडावर चढू नका. वीज वाहक वस्तूपासून दूर राहा उदा. रेडीयेटर, मेटल, लोखंडी पाईप, विद्युत उपकरणे बंद ठेवा. शक्यतो घरातच रहा. पाण्याचे नळ, फ्रिज टेलिफोन, मोबाईल यांना स्पर्श करु नका. त्यापासून दूर रहा आणि विजेवर चालणाऱ्या यंत्रापासूनही दूर रहा. कपडे वाळविण्यासाठी सुतळी अथवा दोरीचा वापर करा. तारेचा वापर करु नका. मजबूत असलेले पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपआपल्या घरी वीज अटकाव यंत्रणा बसवावी. टेलिफोनचे खांब, विजेचे खांब, टेलिफोन, टेलिव्हिजन टॉवर यापासून दूर रहा. प्लग जोडलेले विद्युत उपकरणे हाताळू नका तथा दूरध्वनीचा अथवा मोबाईलचा वापर करुन नका. दोन चाकी वाहन, सायकल, ट्रक, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा. अशा वेळी वाहनातून प्रवास करु नये. चारचाकी वाहनातून प्रवास करत असल्यास वाहनात रहावे. वाहनाच्या बाहेर थांबावे आवश्यक असल्यास, धातुचे कोणतेही उपकरण हातात बाळगू नका. वृक्ष, दलदलीची ठिकाणे तथा पाण्याचे स्त्रोत यापासून शक्यतो दूर रहा. मोकळया आकाशाखाली राहणे आवश्यकच असेल तर खोलगट ठिकाणी रहा. एकाच वेळी जास्त व्यक्ती एकत्र राहू नका, दोन व्यक्तीमधील अंतर किमान १५ फूट असावा. सावधानता बाळगल्यास जिवीत हानी होणार नाही, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी कळविले आहे.