शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
5
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
6
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
7
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
8
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
9
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
10
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
11
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
12
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
13
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
14
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
15
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
16
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
17
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
18
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
19
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
20
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा

विद्यार्थी व शिक्षकांना कोविड लसीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोविडला प्रतिबंध घालण्यासाठी प्राधान्याने विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी भंडारा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : कोविडला प्रतिबंध घालण्यासाठी प्राधान्याने विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाने शासनाकडे केली आहे.

नवीन वर्षातही कोरोना जिल्ह्यात पसरत आहे. जिल्ह्यात पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु झाले आहेत. सद्यस्थितीत शहर व खेड्यांमध्ये कोरोनाची धास्ती अधिक वाढली आहे. अशा परिस्थितीत मानसिकदृष्ट्या विद्यार्थी व शिक्षक सुदृढ राहावा तसेच मनात असणारी भीती व्हावी, यासाठी प्राधान्याने विद्यार्थी व सर्व शिक्षकांना मोफत लसीकरण करण्यात यावे. कारण पुढील महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. भीतीमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू तसेच प्रशासनातील आयुक्त (शिक्षण), शिक्षण संचालक, पुणे, शिक्षण उपसंचालक, नागपूर यांना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, भंडारा यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहे. आतापासून उन्हाळ्याच्या झळा सुरु झाल्या आहेत. एप्रिल महिन्यात उन्हाळा त्रासदायक राहणार आहे. त्यामुळे दहावी व बारावी परीक्षेची वेळ सकाळी ९ ते १२ अशी करण्यात यावी तसेच सुरु असणारे वर्ग सकाळ सत्रात भरविण्यासंबंधीच्या सूचना तत्काळ देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

दहावी व बारावीच्या परीक्षा लेखी पद्धतीने घेण्यात याव्यात, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के अंतर्गत गुण देण्यात यावेत, शाळा पातळीवरून गुण देण्याचे नियोजन शिक्षण विभागाला करण्याचे निर्देश शासनाने तातडीने द्यावेत तसेच सध्या कोरोनाचा काळ सुरु असल्याने परीक्षा व त्याचे मूल्यमापन कसे करावे, या गोंधळात शिक्षक सापडले आहेत. पाचवी ते नववी व अकरावी या वर्गांच्या लेखी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन याबाबत स्पष्टता करण्यात यावी, अशी मागणी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजकुमार बालपांडे, सचिव राजू बांते, उपाध्यक्ष प्रमोद धार्मिक, रेखा भेंडारकर, सहसचिव अर्चना बावणे, कोषाध्यक्ष राधेश्याम धोटे, विष्णूदास जगनाडे, गोपाल बुरडे, सुनीता तोडकर, कुंदा गोडबोले, रवी मेश्राम, विपीनचंद्र रायपूरकर, अतुल बारई, राजू भोयर, सुनील गोल्लर, अनमोल देशपांडे, जी. एन. टीचकुले, प्रदीप मुटकुरे, दामोदर काळे आदींनी केली आहे.