शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

मजुरांअभावी खोळंबली शेतीची कामे

By admin | Updated: March 5, 2016 00:42 IST

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सर्वत्र सुरु झालेली आहेत. या कामाकडे मजूरवर्ग आकर्षित झाल्यामुळे शेतीकामासाठी मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे.

लाखांदूर तालुक्यातील प्रकार : रोहयोची कामे बंद ठेवण्याची मागणीविरली (बु.) : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सर्वत्र सुरु झालेली आहेत. या कामाकडे मजूरवर्ग आकर्षित झाल्यामुळे शेतीकामासाठी मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी शेतातील रब्बी हंगामातील कामे खोळंबली आहेत. दरम्यान दोन आठवडे रोहयोची कामे बंद ठेवावी किंवा श्ोतीकामांचा या योजनेत समावेश करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.येथे रोहयोअंतर्गत नाला सरळीकरणाचे काम सुरु असून या कामावर २०० मजुर कार्यरत आहेत. सद्यास्थितीत रब्बी पिकांच्या कापणी व मळणीचा हंगाम सुरु आहे. त्याचप्रमाणे उन्हाळी धानाच्या रोवणीची कामेही सुरु आहेत. मात्र, मजुरवर्ग रोहयोकडे वळल्यामुळे या कामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. लहान शेतकरी आपल्या कुटूंबियासह कसेबसे हे काम आटोपत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी धडपड चालविली आहे. मात्र, त्या गावांमध्येही रोहयो कामे सुरु होत असल्यामुळे हा मार्गही बंद होण्याची चिन्हे आहेत. सध्याचे ढगाळ वातावरण आणि नुकत्याच बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे.दरम्यान येथील काही शेतकऱ्यांनी शेतीचा हंगाम संपेपर्यंत कीमान २ आठवडे रोहयोची कामे बंद ठेवण्याची विनंती ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली. याची मजूरांना कुणकुण लागताच सुमारे २०० मजुरांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठुन रोहयोचे काम सुरु ठेवण्यासाठी सरपंचांना निवेदन दिले. परिणामी येथील शेतकरी व शेतमजूरांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.या परिस्थितीवर उपाय म्हणून रोहयोच्या कामामध्ये शेतीकामाचा समावेश करावा अशी सुचना विलास महावाडे, राजेश महावाडे, शिवाजी ब्राम्हणकर, पोलीस पाटील एकनाथ भेंडारकर, संजू कोरे आदी शेतकऱ्यांनी केली आहे. सदर उपाययोजनेमुळे शेतीकामासाठी मजूर आणि मजूरांना काम अशा दोन्ही गोष्टी साध्य होतील अशी भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)