शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:01 IST

कोंढा येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी ११.४५ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही परिसरात बोरीच्या आकाराच्या गारा पडल्या. कौलारु तसेच सिमेंटचे पत्र असलेल्या घराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील साकोली, पवनी, लाखनी, मोहाडी व तुमसरातही पाऊस बरसल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देशहरासह ग्रामीण भागात दमदार पाऊस : कोंढा परिसरात बोरीच्या आकाराच्या गारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मेघ गर्जनेसह जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसला. विशेषत: उन्हाळी धानावर याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तव्दतच भाजीपाला पिकांवरही संक्रात आली आहे.यावर्षी हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. भंडारा शहरात रात्री ११.३५ वाजताच्या सुमारास मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. त्याचवेळी वीज पुरवठाही खंडीत झाला. पहाटे ५ वाजतापर्यंत अधूनमधुन ब्रेक घेत पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासून पुन्हा ऊन निघाली. दुपारी ३ वाजतानंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. रात्रीच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.कोंढा येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी ११.४५ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही परिसरात बोरीच्या आकाराच्या गारा पडल्या. कौलारु तसेच सिमेंटचे पत्र असलेल्या घराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील साकोली, पवनी, लाखनी, मोहाडी व तुमसरातही पाऊस बरसल्याचे वृत्त आहे.पालांदूर येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतमालाचे नुकसान झाले असून उन्हाळी धानाचा हंगाम प्रभावीत झाला आहे.कापणी केलेल्या धानाच्या कडपा ओलेचिंब झाले आहे. काही शेतशिवारात शेतकऱ्यांनी तुडतुड्याची लागल झाली म्हणून फवारणी सुध्दा केली होती. यात धानपीक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाºयासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.लाखांदुर येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, काल ९ मे रोजी झालेल्या गारपिटीसह वादळी पावसाने तालुक्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकरी बेजार झाले असून हाता पोटात आलेले उन्हाळी धान पिक नष्ट होण्याची भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे. या गारपीटीमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील काही घरांची तुरळक नुकसान देखील झाले आहे.यंदाच्या उन्हाळी हंगामात लाखांदूर तालुक्यातील चौरस भागासह अन्य भागात जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे व कीड रोगामुळे आधीच धानाचे उत्पादन घटण्याच्या मार्गावर असतांना ऐन पंधरवाड्याने कापणीला आलेल्या धानावर गारपिटीसह वादळी पावसाचा तडाखा बसल्याने अनेक शेतकºयांच्या शेतातील धानाच्या लोंबी झडल्या आहेत.तर काही धानाचा निसवा होण्यापुर्वीच गारपिटीने धान पिकावर किडीचा प्रादुर्भाव होऊन पेरवा या किडयुकित धानाच्या लोंबी बाहेर पडण्याची भिती देखील शेतकºयांत वर्तविली जात आहे. या गारपिटीमुळे ग्रामीण भागातील घरांच्या छपरावरील कवेलुंची देखील तुरळक प्रमाणात हाणी झाल्याचे देखील काही नागरिकांनी सांगीतले आहे मात्र कोरडवाहु शेतकºयांसाठी सदरचा अवकाळी पोषक ठरतांना ऊन्हाळी पिक उत्पादकांसाठी बाधक ठरल्याची बोंब आहे.महागडे बी बियाने व पिककर्ज घेऊन खरीप हंगामात परतीच्या पावसाने तर उन्हाळी हंगामात कधी अवकाळी व सध्याच्या गारपिटीसह वादळी पावसाने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.

टॅग्स :Rainपाऊस