शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:01 IST

कोंढा येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी ११.४५ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही परिसरात बोरीच्या आकाराच्या गारा पडल्या. कौलारु तसेच सिमेंटचे पत्र असलेल्या घराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील साकोली, पवनी, लाखनी, मोहाडी व तुमसरातही पाऊस बरसल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देशहरासह ग्रामीण भागात दमदार पाऊस : कोंढा परिसरात बोरीच्या आकाराच्या गारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मेघ गर्जनेसह जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसला. विशेषत: उन्हाळी धानावर याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तव्दतच भाजीपाला पिकांवरही संक्रात आली आहे.यावर्षी हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. भंडारा शहरात रात्री ११.३५ वाजताच्या सुमारास मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. त्याचवेळी वीज पुरवठाही खंडीत झाला. पहाटे ५ वाजतापर्यंत अधूनमधुन ब्रेक घेत पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासून पुन्हा ऊन निघाली. दुपारी ३ वाजतानंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. रात्रीच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.कोंढा येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी ११.४५ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही परिसरात बोरीच्या आकाराच्या गारा पडल्या. कौलारु तसेच सिमेंटचे पत्र असलेल्या घराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील साकोली, पवनी, लाखनी, मोहाडी व तुमसरातही पाऊस बरसल्याचे वृत्त आहे.पालांदूर येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतमालाचे नुकसान झाले असून उन्हाळी धानाचा हंगाम प्रभावीत झाला आहे.कापणी केलेल्या धानाच्या कडपा ओलेचिंब झाले आहे. काही शेतशिवारात शेतकऱ्यांनी तुडतुड्याची लागल झाली म्हणून फवारणी सुध्दा केली होती. यात धानपीक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाºयासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.लाखांदुर येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, काल ९ मे रोजी झालेल्या गारपिटीसह वादळी पावसाने तालुक्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकरी बेजार झाले असून हाता पोटात आलेले उन्हाळी धान पिक नष्ट होण्याची भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे. या गारपीटीमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील काही घरांची तुरळक नुकसान देखील झाले आहे.यंदाच्या उन्हाळी हंगामात लाखांदूर तालुक्यातील चौरस भागासह अन्य भागात जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे व कीड रोगामुळे आधीच धानाचे उत्पादन घटण्याच्या मार्गावर असतांना ऐन पंधरवाड्याने कापणीला आलेल्या धानावर गारपिटीसह वादळी पावसाचा तडाखा बसल्याने अनेक शेतकºयांच्या शेतातील धानाच्या लोंबी झडल्या आहेत.तर काही धानाचा निसवा होण्यापुर्वीच गारपिटीने धान पिकावर किडीचा प्रादुर्भाव होऊन पेरवा या किडयुकित धानाच्या लोंबी बाहेर पडण्याची भिती देखील शेतकºयांत वर्तविली जात आहे. या गारपिटीमुळे ग्रामीण भागातील घरांच्या छपरावरील कवेलुंची देखील तुरळक प्रमाणात हाणी झाल्याचे देखील काही नागरिकांनी सांगीतले आहे मात्र कोरडवाहु शेतकºयांसाठी सदरचा अवकाळी पोषक ठरतांना ऊन्हाळी पिक उत्पादकांसाठी बाधक ठरल्याची बोंब आहे.महागडे बी बियाने व पिककर्ज घेऊन खरीप हंगामात परतीच्या पावसाने तर उन्हाळी हंगामात कधी अवकाळी व सध्याच्या गारपिटीसह वादळी पावसाने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.

टॅग्स :Rainपाऊस