शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

गारपीट अन् अवकाळी पावसाचा लाखनी तालुक्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 19:12 IST

Bhandara news लाखनी तालुक्यातील काही भागांना अवकाळी पाऊस, वादळ-वारा आणि गारपिटीने दहा मार्चच्या दिवशी झोडपून काढले. यामुळे शेतशिवारातील रब्बी हंगामातील उभे असलेले धानपीक, कारले, भाजीपाला उत्पादकांनी भाजीपाल्यासाठी उभारलेल्या शेडनेटचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मेहनत मातीमोलमदतीची मागणी

 

लोकमत न्यूज नेटवर्क 

भंडारा : लाखनी तालुक्यातील काही भागांना अवकाळी पाऊस, वादळ-वारा आणि गारपिटीने दहा मार्चच्या दिवशी झोडपून काढले. यामुळे शेतशिवारातील रब्बी हंगामातील उभे असलेले धानपीक, कारले, भाजीपाला उत्पादकांनी भाजीपाल्यासाठी उभारलेल्या शेडनेटचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही गावांचे महसूल विभागाच्या वतीने पाहणीची कामे सुरू केली आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मेहनत मातीमोल झाली आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरामध्ये तसेच संपूर्ण तालुक्यात सायंकाळी १० मार्चला अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली. मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

लाखनी तालुक्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये रब्बी हंगामाचे उन्हाळी धान पीक लावले होते. धान पीक जोमात बहरुन आले होते. धान कापणीला सुरुवात झाली होती. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे कापणीच्या एक दिवस अगोदरच वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतात डौलात उभे असलेले धान पीक भुईसपाट झाले. तसेच काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये भाजीपाला पिकांच्या सुरक्षिततेसाठी शेडनेटची उभारणी केलेली असून या शेडनेटचे ही नुकसान झाले आहे. यात मिरची, टाेमाॅटाे, वांगे, भेंडी, कारले, झेंडू यासारख्या महागड्या पिकांची लागवड केलेली आहे. परंतु अचानक विजेच्या कडकडाटांसह झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केले. लाखनी तालुक्यातील व पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांची धान पिकांचे व शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेडनेट फाटले असून गारांचा खच शेतांमध्ये पडला होता. महागडी असलेली नेट फाटून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या उन्हाळी धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. धान पीक लोंबी विरहीत झाले असून कापणी योग्य ही राहिले नाहीत.

लाखनी तालुक्यातील खराशी,गुरढा, कनेरी, जेवनाळा, केसलवाडा/वाघ, गोंडेगाव, इसापूर आदी गावातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या धान पिकाची व आपल्या शेडनेटमध्ये कारले आणि टोमॅटो या पिकाची लागवड केली होती. परंतु अचानक आलेल्या गारपीट व पावसाने धान पीक जमीनदोस्त व शेडनेट फाटून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

लाखनी तालुक्यातील अन्य गावातही जोरदार गारांचा पाऊस झाल्यामुळे धान पिकांसह गहू, मका, कारली, टाेमाॅटाे, आंबा आदी फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. तालुक्यातील पालांदूर परिसरात गारांसह पावसाने थैमान घातल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

‘खरीप धान पिकाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा रब्बी धान पिकाकडे लागल्या होत्या. परंतु अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी धान पिकाचे खूपच नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या धान पिकाचे सर्व्हे आणि पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी’.

जितेंद्र बोंद्रे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस लाखनी.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस