शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:34 IST

जिल्ह्यात आठवड्याभरानंतर पुन्हा अवकाळी पावसाने रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील पाच तालुक्यात पाऊस बरसल्याची माहिती असून या पावसामुळे रबी पिकांना मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देरबी पिकांना फटका : बोथली गावाजवळ कोसळले वृक्ष, धानाची पोती भिजल्याने बळीराजाचे वाढले टेंशन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात आठवड्याभरानंतर पुन्हा अवकाळी पावसाने रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील पाच तालुक्यात पाऊस बरसल्याची माहिती असून या पावसामुळे रबी पिकांना मोठा फटका बसला आहे. यात लाख, लाखोरी, चणा, हरभरा, गहू पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. भंडारा शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.लाखांदूर, तुमसर, मोहाडी, साकोली तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. वादळामुळे वरठी ते मोहाडी राज्य मार्गावरील झाडे कोलमडून पडली. मोहाडी-भंडारा राज्यमार्गावरील बोथलीजवळ बाभळीचे झाड कोसळल्याने वाहतूक सकाळपासून ठप्प होती. क्रेनच्या सहायाने झाड बाजूला करून व मजुरांकरवी झाड कापून रस्ता मोकळा करण्यात आला.तुमसर : शनिवारी मध्यरात्री अवकाळी पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात धानाची पोती भिजली. शेतकरी वर्गाचे येथे मोठे नुकसान झाले. काही व्यापारी बाजार समितीतून धानाची खरेदी करतात. त्याचीही धान पोती भिजल्याचे समजते. पूर्व विदर्भात प्रसिध्द बाजार समिती असूनही शेतकऱ्यांचा धान येथे उघड्यावर ठेवला जातो.शनिवारी मध्यरात्री तुमसर शहर व तालुक्यात अवकाळी पाऊसाने सुमारे एक तास झोडपले. अचानक पाऊस बरसल्याने तारांबळ उडाली. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुल्या मार्केट यार्डात धानाची पोली ओलिचिंब झाली. सदर धान शेतकऱ्यांचे होते अशी माहिती आहे. धान ओले झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. पुन्हा ते धान उन्हात वाळू घालावे लागणार आहे. एकदा धान पाण्यात भिजले तर त्याची किंमत कमी होते. धान भरडाई वेळी तो तुटतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.बाजार समितीचा मार्केड यार्ड मोठा असून बाजार समिती श्रीमंत आहे. अनेक बांधकामे येथे करण्यात आली. प्रवेशद्वारावर येथे पैसा खर्च करण्यात येत आहे. किमान धान तथा इतर पिकांच्या सुरक्षेकरिता शेडची व्यवस्था करण्याचे नियोजन बाजार समितीने करण्याची गरज आहे. बाजार समितीने शेतकºयांचे हित जोपासने गरजेचे आहे.साकोली : रविवारी सकाळी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे रबी पिकाचे नुकसान झाले आहे. आधीच सुलतानी संकट डोक्यावर असतांनी त्यातच अस्मानी संकटाचा सामना बळीराजाला करावा लागत आहे.रविवारी पहाटे साकोली तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे हरभरा, उडीद, मुंग, लाख-लाखोरी आदी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. साकोली तालुक्यातील धान खरेदी केंद्र हाऊसफुल झाले आहेत. नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी धानाला ५०० रुपये प्रती क्विंटल बोनसची घोषणा केली. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी धान विक्रीस पुन्हा सुरुवात केली. त्यामुळे आधीच हाऊसफुल झालेले धानाच्या गोडाऊनमध्ये जागा अपूरी असल्यामुळे बऱ्याच धान केंद्रावर बाहेर ढेवलेले धान ओले झाले. तर बºयाच शेतकºयांनी गहु तोडला आहे. या पावसामुळे जमा केलेला गहू खराब होण्याची शक्यता आहे.मागील महिन्याभरापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसन्याची ही तिसरी वेळ आहे. वारंवार अस्मानी संकटाला सामना देत बळीराजाचे टेन्शन वाढत आहे. दुसरीकडे उन्हाळा सुरुहोताच विटा व्यवसायीकांचेही चांगले दिवस येतात. मात्र अवकाळी पावसामुळे विटाभट्टी चालकांचे नुकसान झाले आहे.शासनाने शेतकऱ्यांसह विटभट्टी चालकांच्या नुकसानी संदर्भात पंचनामा करुन आर्थिक मदत द्यावी, अशी मुख्य मागणी आहे. दुसरीकडे धान खरेदी केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :Rainपाऊस